शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वे चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

हरितक्रांतीसाठी लावलेला झाडांना घरघर!

By admin | Updated: May 4, 2017 00:29 IST

शेगाव- नगर परिषद, सामाजिक वनीकरण व सा.बां. विभागाच्या देखरेखीखाली असलेल्या झाडांमधील अनेक झाडे पाण्याअभावी सुकून शेवटच्या घटका मोजत आहेत.

नगरपालिका, सामाजिक वनीकरण विभागाचे दुर्लक्षशेगाव : मोठा गाजावाजा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार शहरात अनेक जागी झाडे लावण्यात आली. मात्र, नगर परिषद, सामाजिक वनीकरण व सा.बां. विभागाच्या देखरेखीखाली असलेल्या झाडांमधील अनेक झाडे पाण्याअभावी सुकून शेवटच्या घटका मोजत आहेत. मात्र, या विभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे संपूर्ण जग ग्लोबल वार्मिंगच्या परिणामांशी झुंज देत आहे. याचा परिणाम अतिशय हानीकारक होत असून, पावसाची सरासरी कमी झाली आहे. उन्हाळा वाजवीपेक्षा जास्त तापत आहे. या सर्व बाबींचा विचार करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरितक्रांतीचा नारा देऊन १० कोटी वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले होते. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचे अनुदानही देण्यात आले. अनुदान मुबलक मिळाल्यामुळे नगर परिषद, सामाजिक वनीकरण व सा.बां. विभागाकडून रस्त्याच्या कडेला वृक्षांची लागवड मोठा गाजावाजा करून करण्यात आली. मात्र, या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, की अभियानांतर्गत लावण्यात आलेल्या वृक्षांपैकी जवळपास ३० ते ४० टक्के वृक्ष पाणी व देखरेखीअभावी शेवटची घटका मोजत आहेत. शहरातील झाडेगाव रस्त्यालगतची अनेक झाडे सुकली आहेत. भुतबंगला रोडवर सा.बां. विभागाकडून लावण्यात आलेली झाडे लागवडीनंतर काही दिवसातच बकऱ्यांनी खावून टाकली आहेत. न.प.कडून लावण्यात आलेल्या अनेक ठिकाणच्या वृक्षांची अशीच परिस्थिती आहे. सामाजिक वनीकरणकडून ग्रामीण परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर लावण्यात आलेली झाडे पाण्याअभावी सुकत आहेत. झाडेगाव फाटा ते वाटिकापर्यंत असलेल्या दुभाजकामधील फुलझाडेही पाण्याअभावी सुकत आहेत. न.प.कडून या झाडांना पाणी दिल्या जाते. मात्र, ते कमी पडते. तरी संबंधितांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. तर झाडांना अजूनही मिळू शकते संजीवनीवृक्ष लागवडीनंतरची ही परिस्थिती पाहता शासनाचाच एक भाग असलेले हे सर्व विभाग शासनाच्या आदेशालाच खो देत असल्याचे दिसून येत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. मरणावस्थेकडे जात असलेल्या झाडांना पाणी देऊन संजीवनी देण्याचे काम आताही केले जाऊ शकते. त्यासाठी केवळ इच्छाशक्तीची गरज भासेल, एवढे मात्र खरे!