शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

साध्याभोळ्या देवासारखे त्याचे भक्तही साधेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 12:29 IST

बुलडाणा : आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी महिना ते दीड महिना पायी वारी करून पंढरपूरला जाणाºया पालखी सोहळ्यातील वारकºयांच्या सुविधांची वाणवा जाणवत आहे.

ठळक मुद्दे मानाच्या पहिल्या दोन पालख्या वगळता इतर मानाचे पालखी सोहळे दुर्लक्षीत राहत असल्याने  साध्याभोळ्या देवासारखे त्याचे भक्तही साधेच दिसून येत आहे.   दशमीला दुपारी सर्वात पुढे संत नामदेवांची पालखी तर त्यामागोमाग हे सर्व पालखी सोहळे पंढरपूरला येतात.

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा : आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी महिना ते दीड महिना पायी वारी करून पंढरपूरला जाणाºया पालखी सोहळ्यातील वारकºयांच्या सुविधांची वाणवा जाणवत आहे. दिंडी मार्गावरील रस्ते दुरूस्ती, निवारा, पंढरपूरचे वाळवंट, वारकºयांच्या मुक्कामाचे प्रत्येक ठिकाण, आरोग्य सुविधा यासारख्या बाबींकडे शासन प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. महाराष्ट्रातील मानाच्या पहिल्या दोन पालख्या वगळता इतर मानाचे पालखी सोहळे दुर्लक्षीत राहत असल्याने  साध्याभोळ्या देवासारखे त्याचे भक्तही साधेच दिसून येत आहे.  

 महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीच्या वाटेवर शेकडो वर्षापासून वारकऱ्यांच्या दिंढ्या जात आहेत. आषाढी एकादशीला मजल दरमजलवरून येणाऱ्या पालखी सोहळ्यामध्ये पिढ्यानपिढ्या चालतात. महाराष्ट्रात मानाच्या सात पालख्या मानल्या जातात. त्यामध्ये संत ज्ञानेश्वर (आळंदी ते पंढरपूर), संत तुकाराम (देहू ते पंढरपूर), संत एकनाथ (पैठण ते पंढरपूर), संत निवृत्तीनाथ (त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर), संत सोपानकाका (सासवड ते पंढरपूर), संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर ते पंढरपूर), संत निळोबाराय (पिंपळनेर ते पंढरपूर) या पालखी सोहळ्यांचा समावेश आहे. हे सर्व पालखी सोहळे नावमीच्या दिवशी वाखरी पालखी तळावर मुक्कामी येतात. दशमीला पंढरपूरहून संत नामदेव महाराजांची पालखी या सर्व मानाच्या सात पालख्यांना आणण्यासाठी सामोरी जाते. दशमीला दुपारी सर्वात पुढे संत नामदेवांची पालखी तर त्यामागोमाग हे सर्व पालखी सोहळे पंढरपूरला येतात. सर्वात शेवटी पहिल्यामानाची म्हणजे संत ज्ञानेश्वरांची पालखी रात्री आठच्या दरम्यान पंढरपूरात प्रवेश करते. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मंदिर समितीच्यावतीने या सर्व पालखी सोहळ्यांना त्यांच्या मानाच्या क्रमाने सत्कार, प्रसाद आणि पारंपारिक पूजन केले जाते. या सर्व पालखी सोहळ्यांमध्ये संत ज्ञानेश्वरांच्या पालखी सोहळ्यात सुमारे चार लाख तर संत तुकारामांच्यसा पाखली सोहळ्यात सुमारे तीन लाख भाविक सहभागी असतात. तर इतर सर्व मानाचे पालखी सोहळ्यात प्रत्येकी सुमारे एक लाखाच्या आत वारकरी सहभागी असतात. संख्येच्या दृष्टीने तुलनेने संत ज्ञानोबाराय व तुकोबाराय यांचे पालखी सोहळे मोठे असल्यामुळे प्रशासन व शासनाचे सर्व लक्ष या दोन सोहळ्यांकडेच केंद्रित होते; मात्र इतर सर्व पालखी सोहळे दुर्लक्षीतच राहत आहेत. शासन व प्रशासनाच्यावतीने दिंडी मार्गावरील विविध सुविधा, रस्ते दुरूस्ती, रस्ते रुंदिकरण, पालखी विसाव्यांचे बांधकाम, जमीन अधिग्रहण, पाणीपुरवठा, स्वच्छता, शौचालयांची (फिरत्या) व्यवस्था, वारकऱ्यांची आरोग्य सुविधा  आदी बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. मुलभूत सुविधा मिळत नसल्याची ओरड सोहळा प्रमुखांची दरवर्षी राहते. 

नाशिक येथे कुंभमेळ्यासाठी हजारो कोटींचा खर्च

नाशिक येथे भरणाºया कुंभमेळ्यासाठी शासनाकडून ३ हजार कोटी रुपयांपर्यंत खर्च करण्यात येतो. मात्र, कुंभमेळ्याप्रमाणे जिथे जास्त गर्दी होते त्या वारीकडे शासनाचे दुर्लक्ष  दिसून येते. दिंडीत चालणाऱ्या विठ्ठलभक्त वारकऱ्याला रस्त्यात निवारा, पाणी, शौचालय आदी मूलभूत गोष्टी सुद्धा दिल्या जात नाही. त्यांच्यासाठी सुसज्ज वाहनतळ, लाखो लोकांच्या स्वच्छतागृहाची सोय, चांगली निवासव्यवस्था आणि मोठे रुग्णालय उभारणे गरजेचे आहे. 

  

वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न 

दिंडीतील वाटचाल ते झोप ही वारकऱ्यांची सगळीच कामे उघड्यावर होतात, पण त्यातुलनेत त्यांच्या सुरक्षेकडे लक्ष दिल्या जात नाही. दिंडीतील वारकºयांचा अपघात होण्याच्या घटना वारंवार घडतात. अशा अपघातामध्ये आतापर्यंत अनेक वारकºयांचा मृत्यू सुद्धा झाला आहे. ५ फेब्रुवारी रोजी अकोला जिल्ह्यातील बाळापूर-पातूर मार्गावर पायदळ वारीतील चार वारकऱ्यांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे अशा अपघाताच्या घटनांमुळे वारकºयांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. 

अनेक पालख्या डोंगरदऱ्यातून जातात. काही मार्गांची दूरवस्था झालेली असल्याने अडचणी येतात. पालखीतील वारकºयांना  वेळेवर आरोग्य सुविधा मिळत नाही. पाण्याच्या टँकरची कमतरता भासते. पोलिस संरक्षण दिल्या जात नाही. त्यामुळे याकडे लक्ष देवून मानाच्या पालख्यांनातरी निधी देवून विविध सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. 

- रघुनाथबुवा गोसावी,  संत एकनाथ पालखी सोहळा प्रमुख, पैठण ते पंढरपूर.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAshadhi Ekadashiआषाढी एकादशी