शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

अंहकार मुक्तता हाच आध्यात्मिक जीवनाचा पाया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 14:57 IST

आध्यात्मिक जीवन हे खºया अर्थाने ईश्वरीय असतं. ईश्वर हा निर्गुण निराकार आहे. या ईश्वराप्रती कृतज्ञभाव प्रकट होणे आणि या ...

आध्यात्मिक जीवन हे खºया अर्थाने ईश्वरीय असतं. ईश्वर हा निर्गुण निराकार आहे. या ईश्वराप्रती कृतज्ञभाव प्रकट होणे आणि या ईश्वराला जीवन समर्पित करणे ही ईश्वर आणि मनुष्य जीवनातील आंतरक्रिया आहे. या प्रक्रियेत ईश्वर आणि मनुष्य यातील अंतर नाहीसे होते आणि म्हणूनच साधू...संत आणि सृजनशील व्यक्तींच्या मनाला कुणाचेही अहीत करण्याचा विचार स्पर्शत  नाही. आध्यात्मिक जीवनात मी ईश्वर रुप आहे. या आंतरिक भावाचे प्रकटीकरण होते. मनातील सर्व विकार, विषय, वासना आपोआप नाहीशा होतात. त्यामुळेच मनुष्य ब्रम्ह स्वरूप होते. भूतकाळ आठवणीत राहत नाही. तर भविष्यकाळाच्या बाबतीत अनिश्चितता असते. त्यामुळे आध्यात्मिक जीवनातील व्यक्ती वर्तमान काळालाच अधिक महत्व देते.  थोडक्यात भूत आणि भविष्य काळात ती गुरफटत नाही. मोक्षप्राप्तीसाठी त्यांची धडपड असते. 

सत्य हे शिव आहे आणि शिव हे सुंदर आहे. यावरच आध्यात्मिक जीवनातील व्यक्तीचा भर राहतो. सत्य  हेच शाश्वत जीवन असल्याचे ते मानतात. थोडक्यात अंहकार मुक्तता हाच आध्यात्मिक जीवनाचा पाया होय.

तुम्ही जर एखादा विचार करत असाल आणि काहीतरी वेगळीच कृती करणार असाल, तर तुम्हाला जाणवेल तेव्हा तुम्ही अशांत असाल, तुम्हाला थकवा जाणवेल. जेव्हा मन, वचन आणि कर्म जेव्हा एकरुप होते तेव्हा तुमचे मन प्रसन्न असते. जीवनात अशी प्रसन्नता असेल, समाधान असेल तर अशा आनंदामुळे आपला उत्साह द्विगुणित होतो.  हाच उत्साह एवढा बलवान होतो की प्रगतीच्या मार्गात कितीही अडथळे आले तरी त्याने काहीही बिघडत नाही. 

राग आणि अहंकार एकमेकांना पूरक आहेत. रागीट व्यक्ती फक्त आपला मी पणा सिद्ध करण्यासाठी राग व्यक्त करतो. राग अशासाठी येतो कारण ती व्यक्ती त्यातल्या अहंकाराला वाचविण्याचा प्रयत्न करते.  अहंकार ही माणसाची खोटी ओळख आहे.  तर खोट्या ओळखीसह जीवन जगणं म्हणजे जीवन निरर्थक आहे. आणि या खोट्या ओळखीपासून मुक्ती मिळवण्याचा मार्ग म्हणजे निस्वार्थ प्रेम भाव होय. आपण चांगल्या भावनेने निस्वार्थ भावनेने जीवन जगण्याचा प्रयत्न करतो तेव्हाच आपल्या जीवनाचे सार्थक झाले असे समजावे. व्यक्तीला शांती, आनंद आणि सुख हवे असेल तर त्याला आनंद सुखी करु शकतो. ज्ञान, निष्ठा त्याला शांत करेल आणि भक्तीमुळे त्याला आनंद होईल. आपण अशा प्रकारे कर्म करावे संसारात राहून सुखाचा आनंद कशाप्रकारे घ्यावा ही युक्ती आपल्याला कर्मयोगातून कळते.

-श्री राधे राधे महाराज, श्री बर्डेश्वर संस्थान, तरवाडी ता. नांदुरा, जि.बुलडाणा.

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक