शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अंहकार मुक्तता हाच आध्यात्मिक जीवनाचा पाया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 14:57 IST

आध्यात्मिक जीवन हे खºया अर्थाने ईश्वरीय असतं. ईश्वर हा निर्गुण निराकार आहे. या ईश्वराप्रती कृतज्ञभाव प्रकट होणे आणि या ...

आध्यात्मिक जीवन हे खºया अर्थाने ईश्वरीय असतं. ईश्वर हा निर्गुण निराकार आहे. या ईश्वराप्रती कृतज्ञभाव प्रकट होणे आणि या ईश्वराला जीवन समर्पित करणे ही ईश्वर आणि मनुष्य जीवनातील आंतरक्रिया आहे. या प्रक्रियेत ईश्वर आणि मनुष्य यातील अंतर नाहीसे होते आणि म्हणूनच साधू...संत आणि सृजनशील व्यक्तींच्या मनाला कुणाचेही अहीत करण्याचा विचार स्पर्शत  नाही. आध्यात्मिक जीवनात मी ईश्वर रुप आहे. या आंतरिक भावाचे प्रकटीकरण होते. मनातील सर्व विकार, विषय, वासना आपोआप नाहीशा होतात. त्यामुळेच मनुष्य ब्रम्ह स्वरूप होते. भूतकाळ आठवणीत राहत नाही. तर भविष्यकाळाच्या बाबतीत अनिश्चितता असते. त्यामुळे आध्यात्मिक जीवनातील व्यक्ती वर्तमान काळालाच अधिक महत्व देते.  थोडक्यात भूत आणि भविष्य काळात ती गुरफटत नाही. मोक्षप्राप्तीसाठी त्यांची धडपड असते. 

सत्य हे शिव आहे आणि शिव हे सुंदर आहे. यावरच आध्यात्मिक जीवनातील व्यक्तीचा भर राहतो. सत्य  हेच शाश्वत जीवन असल्याचे ते मानतात. थोडक्यात अंहकार मुक्तता हाच आध्यात्मिक जीवनाचा पाया होय.

तुम्ही जर एखादा विचार करत असाल आणि काहीतरी वेगळीच कृती करणार असाल, तर तुम्हाला जाणवेल तेव्हा तुम्ही अशांत असाल, तुम्हाला थकवा जाणवेल. जेव्हा मन, वचन आणि कर्म जेव्हा एकरुप होते तेव्हा तुमचे मन प्रसन्न असते. जीवनात अशी प्रसन्नता असेल, समाधान असेल तर अशा आनंदामुळे आपला उत्साह द्विगुणित होतो.  हाच उत्साह एवढा बलवान होतो की प्रगतीच्या मार्गात कितीही अडथळे आले तरी त्याने काहीही बिघडत नाही. 

राग आणि अहंकार एकमेकांना पूरक आहेत. रागीट व्यक्ती फक्त आपला मी पणा सिद्ध करण्यासाठी राग व्यक्त करतो. राग अशासाठी येतो कारण ती व्यक्ती त्यातल्या अहंकाराला वाचविण्याचा प्रयत्न करते.  अहंकार ही माणसाची खोटी ओळख आहे.  तर खोट्या ओळखीसह जीवन जगणं म्हणजे जीवन निरर्थक आहे. आणि या खोट्या ओळखीपासून मुक्ती मिळवण्याचा मार्ग म्हणजे निस्वार्थ प्रेम भाव होय. आपण चांगल्या भावनेने निस्वार्थ भावनेने जीवन जगण्याचा प्रयत्न करतो तेव्हाच आपल्या जीवनाचे सार्थक झाले असे समजावे. व्यक्तीला शांती, आनंद आणि सुख हवे असेल तर त्याला आनंद सुखी करु शकतो. ज्ञान, निष्ठा त्याला शांत करेल आणि भक्तीमुळे त्याला आनंद होईल. आपण अशा प्रकारे कर्म करावे संसारात राहून सुखाचा आनंद कशाप्रकारे घ्यावा ही युक्ती आपल्याला कर्मयोगातून कळते.

-श्री राधे राधे महाराज, श्री बर्डेश्वर संस्थान, तरवाडी ता. नांदुरा, जि.बुलडाणा.

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक