शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
3
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
4
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
5
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
6
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
7
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
8
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
9
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
11
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
12
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
13
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
14
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
15
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
16
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
17
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
18
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
19
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
20
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच पावसात पैनगंगा नदीवरील पर्यायी पूल गेला वाहून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 16:02 IST

बुलडाणा : पहिल्याच पावसात पैनगंगा नदीवरील पळसखेड नागोनजीकचा पर्यायी पूल सोमवारी पहाटे सहा ते सात वाजेच्या दरम्यान वाहून गेला.

बुलडाणा : पहिल्याच पावसात पैनगंगा नदीवरील पळसखेड नागोनजीकचा पर्यायी पूल सोमवारी पहाटे सहा ते सात वाजेच्या दरम्यान वाहून गेला. त्यामुळे बुलडाणा- अजिंठा मार्गावरील वाहतूक पूणपणे ठप्प झाली होती.     गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत बुलडाणा - अजिंठा या ५० किलोमिटर मार्गाचे काम सुरु आहे. मात्र महामार्गाचे काम अत्यंत संथगतीने होत असल्याने या मार्गावरुन ये- जा करणाºया  हजारो वाहनधारकांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. दतपूर ते अजिंठा दरम्यान संपूर्ण मार्ग खोदलेला आहे. पावसामुळे सर्वत्र चिखल निर्माण झाल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. रविवारी रात्रीपासून जोरदार पावसाचे आगमन झाले. बुलडाणा  तालुक्यातील सर्व नदीनाले दुथडे भरुन वाहू लागले. बुलडाणापासून १२ किलोमिटर अंतरावरील पळसखेड नागोजवळून पैनगंगा नदी वाहते. या मार्गाचे काम सुरु असल्याने नदीवरील जूना पूल तोडण्यात आलेला आहे. तर त्याठिकाणी नवीन पुलाचे काम सुरु आहे. वाहतूक सुरळित राहावी याकरिता बाजूने वळण रस्ता तयार करुन नदीवर पर्यायी पुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र पाणी वाहून जाण्यासाठी केवळ दोनच पाईप टाकण्यात आले. परंतू याठिकाणी पैनगंगा नदीचा प्रवाह जोरात  असतो. असे असतांनासुध्दा ठेकेदाराने हलगर्जी केली. याचाच परिणाम रात्री पडलेल्या जोरदार पावसामुळे हा पर्यायी पूल वाहून गेला. यामुळे  वृत्त लिहेपर्यंत बुलडाणा - अजिंठा मार्गावरील वाहतूक बंद आहे. 

 एनएचएच्या निर्देशाकडे ठेकेदाराचे दुर्लक्षबुलडाणा- अजिंठा मार्गावरील पर्यायी पूलाचे बांधकाम करताना अधिक संख्येत पाईप टाकण्याचे  निर्देश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने ठेकेदाराला दिले होते. परंतू ठेकदाराने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पहिल्याच पावसात हा पूल वाहून गेला. सुदैवाने कुठलीच अनुचित घटना घडली नाही. वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

 दोन वर्षापूर्वी दोन जण गेले होते वाहून मागील दोन वर्षापूर्वी याच ठिकाणावरुन बुलडाणा येथील इंदिरा नगर भागातील दोन जण वाहून गेले होते.  पैनगंगा नदीच्या पाण्याचा प्रवाह येथे वेगात असतो. सोमवारी पूल वाहून गेला तेंव्हा कुठलेच वाहन पुलावरुन जात नव्हते. अन्यथा मोठी दुघर्टना घडली असती.  आता नवीन पर्यायी पूल बांधतांना नदीचा प्रवाह लक्षात घेण्याची गरज आहे. 

 संपूर्ण मार्ग चिखलमय बुलडाणा- अजिंठा मार्गाचे कंत्राट सुनील हायटेक या कंपनीला मिळाला होता. सदर कंपनीला आॅक्टोंबर २०१७ मध्ये वर्कआॅर्डर देऊन २४ महिन्यात काम पूर्ण करण्याचे निर्देश होते. परंतू या कंपनीने अगोदरचे आठ महिने केवळ पाच ते दहा टक्के काम केले. आपल्याकडे काम होणार नाही म्हणून दुसºया दोन कंपन्यांना काम वाटून देण्यात आले. सध्या दत्तपूर ते अजिंठ्यापर्यंत जवळपास ४० किलोमिटरचा मार्ग खोदलेला आहे. त्यावर मुरुम, माती टाकलेली असल्याने जोरदार पाऊस पडल्याने मार्गावर चिखल साचला. परिणामी वाहनधारकांना अपघातांचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्याचे दिवस आणि हा चिखलमय मार्ग यातून केंव्हा सुटका मिळते, असा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाriverनदीRainपाऊस