शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

कापसाच्या गाठी घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग; २० टन माल जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 2:01 PM

 बुलडाणा : कापसाच्या गाठी घेऊन जाणाºया ट्रकला अचानक आग लागल्याने २० टन माल जळून खाक झाल्याची घटना बुधवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास राजूर घाटात घडली.

 बुलडाणा : कापसाच्या गाठी घेऊन जाणाºया ट्रकला अचानक आग लागल्याने २० टन माल जळून खाक झाल्याची घटना बुधवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास राजूर घाटात घडली. आगीत ट्रकचेही मोठे नुकसान झाले. सुदैवाने कुठलीच जीवीतहानी झाली नाही. मध्यप्रदेशमधील डेलची (ता. महेदपूर जि. उज्जैन) येथील ट्रक चालक राधाकिसन चौहान (वय ३२) व क्लिनर वरदीराम सुर्यवंशी (वय ३०) हे दोघे बीड जिल्ह्यातील सोनपेठ येथून कापसाच्या गाठी घेऊन मध्यप्रदेशातील मेहतवाडा येत जात होते. बुधवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास बुलडाणा नजीकच्या राजूर घाटात   आर-जे-जीसी-५३१७ क्रमांकाच्या ट्रकमधील कापसाच्या गाठींना अचानक आग लागली. पाठीमागून येणाºया वाहन चालकाने ही बाब ट्रक चालकास सांगितली. त्यामुळे त्याने रस्त्याच्या बाजूला वाहन थांबवले. परंतू एवढ्या रात्री आग विझविण्याचे कुठलेच साधन उपलब्ध नसल्याने आग वाढतच गेली. आगीमुळे ट्रकचे टायर फुटल्याने ट्रक डाव्या बाजूने उलटला. ट्रक चालकाने मोबाईलद्वारे घटनेची माहिती ट्रक मालकास दिली. मालकाने नगर पालिकेच्या अग्निशमन विभागाचा नंबर मिळवत त्यांना कळविले. अग्निशामक विभागाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले व कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत ट्रकमधील कापसाच्या गाठी जळून खाक झाल्या. आगीत ट्रकचेही मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख, पोलिस उपनिरीक्षक अमित जाधव यांनी दुपारी अग्निशामक विभागाला फोन करुन पुन्हा घटनास्थळी बोलावले. पेटलेल्या कापसाच्या गाठी पूर्णपणे विझविण्यात आल्या. वृत्त लिहेपर्यंत अग्निशामक विभाग व पोलिसांची कारवाई सुरु होती.

टॅग्स :buldhanaबुलडाणाfireआग