अखेर मेहकर बायपासवरुन धावली वाहने
By Admin | Updated: May 28, 2014 00:37 IST2014-05-27T23:31:04+5:302014-05-28T00:37:52+5:30
कित्येक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर २७ मे रोजी बायपासवरुन वाहनी धावली; मेहकरवासियांनी घेतला सुटकेचा निश्वास.

अखेर मेहकर बायपासवरुन धावली वाहने
मेहकर : शहरातील रस्त्यांवर तासन -तास खोळंबलेल्या रहदारीला मार्गदेण्यासाठी गत तीन वर्षापुर्वी बायपासचे काम सुरू करण्यात आले होते. ते काम पूर्ण होऊन शिवसेनेने घेतलेल्या पुढाकाराने मंगळवारला नागरिकांच्या सेवेत एका छोटीखानी कार्यक्रमाने बायपास सुरु करण्यात आला. कित्येक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर २७ मे रोजी या बायपासवरुन अखेर वाहनी धावली. त्यामुळे शहरवासियांनी शहरातील वाहतुकीपासून सुटकेचा निश्वास घेतला. औरंगाबाद नागपूर जाणारे सर्व वाहने शहरातुनच जात असल्याने वाहतूकीचा प्रश्न गंभीर रुप धारण करत होते. शहरातुन जाणार्या अवजड वाहणासाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था म्हणुन शासनाच्यावतीने बायपासचे काम के.टी. कंस्ट्रक्शन इंदोर यांच्याकडे २0११ मध्ये सोपविण्यात आले होते. शासन करारानुसार के.टी.कंस्ट्रक्शनने वेळेच्या आत म्हणजे १७ जानेवारी २0१३ मध्येच बायपासचे काम पुर्ण केले. बायपासवरील रस्त्याचे काम पुर्ण झाल्यानंतर पुलाच्या कामाला सुरूवात करण्यात आली. मात्र, काही तांत्रीक अडचणींमुळे तब्बल आठ महिने पुलाचे काम बंद राहिले. शिवसेनेच्यावतीने अनेक वेळ रास्तारोकोसह विविध आंदोलनेही करण्यात आले होते. आज सकाळी नागरिकांच्या सेवेत बायपास खुला झाला.