संपूर्ण कर्ज मुक्तीसाठी शेतकरी संघटनेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 20:01 IST2017-08-01T20:01:21+5:302017-08-01T20:01:55+5:30

Farmer's Organization for Full Debt Redemption | संपूर्ण कर्ज मुक्तीसाठी शेतकरी संघटनेचा मोर्चा

संपूर्ण कर्ज मुक्तीसाठी शेतकरी संघटनेचा मोर्चा

ठळक मुद्दे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा मोर्चात जिल्ह्यातील शेतक-यांसह महिलांचा लक्षणीय सहभागसंपूर्ण कर्जमुक्तीसह विजबिल माफ करण्याची प्रमुख मागणीजिल्हाधिका-यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शेतकºयांची संपूर्ण कर्जमुक्तीच्या व विजबिलमुक्तीच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने १ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चा गांधीभवन येथून निघून शहराच्या प्रमुख रस्त्यावरुन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.
मोर्चामध्ये जिल्हाभरातून बहुसंख्य शेतकरी सामील झाले होते. तर महिलांचा लक्षणीय सहभाग होता. मोर्चा दरम्यान संपूर्ण कर्जमुक्ती झालीच पाहिजे, विजबिल मुक्ती झालीच पाहिजे, स्वामिनाथन आयोग नको, शरद जोशी यांच्या कृषी कृती दलाचा अहवालाची अंमलबजावणी करा, शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, शेतमालाची आयात निर्यात धोरणात बदल करा, शेतातील सरकारी हस्तक्षेप बंद करा, अशा घोषणा देत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकला. त्यानंतर शेतकºयांच्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. निवेदनामध्ये विशेषता शेतकरी कायम स्वरुपी कसा कर्जमुक्त होईल, याचा मसुदा मुख्यमंत्री व पंतप्रधानांना देण्यात आला. मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाल्यावर शेतकरी संघटनेचे डॉ.हासनराव देशमुख, नामदेवराव जाधव, सुरेश सोनुने, दामोधर शर्मा, कैलास गाढवे, समाधान कणखर यांनी मार्गदर्शन केले. तसेच दासा पाटील यांनी शेतकरी आंदोलनावर कविता सादर केली. यावेळी बोलताना नामदेवराव जाधव म्हणाले की, शासनाची कर्जमुक्ती फसवी असून शेतकºयांना संपूर्ण सरसगट कर्जमुक्ती हवी आहे. स्वामिनाथन आयोगापेक्षा शरद जोशीनी सादर केलेला कृषी दलाचा अहवाल लागू करण्यात यावा, जर सरकारने या मागण्या मान्य केल्या नाही तर आंदोलन तिव्र करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. या मोर्चात एकनाथ पाटील थुट्टे, सुरेशदादा सोनुने, सुभाष गिरी, ज्ञानेश्वर जाधव, कौतीक जामदार, तेजराव मुंदे, तेजराव मुंढे, मधुकर देठे, बद्रीनाथ बुधवत, गजानन जाधव, संतोष राजपूत, शिवप्रसाद सारडा, शरद सावजी, रमेशसिंग चव्हाण, कमळाजी पाटील, सुगदेवराव नरोटे, विजयकुमार डागा, नाजीम बेग, दिनककराव टेकाळे, श्रीराम पाटील, हरिदास खांडेभराड, प्रकाश अंभोरे, मुरली महाराज येवले, तनवीर देशमुख, शिवाजी सवडे, राजु भगत, शिवाजी उबरहंडे, डॉ.बाबुराव पाटील, विजय जाधव, सुखदेवराव नरोटे, नामदेवराव म्हळसने, रमेश पागोरे, काशीनाथ मेहेत्रे, सादीक देशमुख, राजु शेटे, नरहरी थुट्टे आदी जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
 

Web Title: Farmer's Organization for Full Debt Redemption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.