शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी मिळाले ९ लाख ७५ हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 11:26 IST

Khamgaon News खामगाव तालुक्यातील शेतक-यांना यावर्षी ९ लाख ७५ हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळाली आहे. 

ठळक मुद्देअभयारण्यातील प्राणी जंगलालगत असलेल्या शेतांमधील पिकांचे नुकसान करतात. पिकांचे नुकसान केल्यास वन विभागाकडून शेतक-यांना नुकसानभरपाई देण्यात येते.

- विवेक चांदूरकरलोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : जिल्ह्यात वन्य प्राण्यांकडून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात येते. त्यामुळे शेतक-यांच्या उत्पादनात कमालीची घट येते; मात्र वन्य प्राण्यांनी नुकसान केले तर त्याची भरपाई वन विभागाकडून देण्यात येते. खामगाव तालुक्यातील शेतक-यांना यावर्षी ९ लाख ७५ हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळाली असून, ३ लाख ७३ हजार ६०५ रुपये मंजूर झाले आहे. गत काही वर्षांपासून जंगलांमध्ये मानवाने अतिक्रमण केल्यामुळे प्राण्यांचे अधिवास संपले. त्यामुळे रोही, हरीण, चितळ, जंगली डुकरांनी शेताकडे आपला मोर्चा वळविला असून, मोठ्या प्रमाणात पिके फस्त करतात. या अभयारण्यातील प्राणी जंगलालगत असलेल्या शेतांमधील पिकांचे नुकसान करतात. त्यामुळे शेतक-यांच्या उत्पन्नात घट येते.. वन्य प्राण्यांनी पिकांचे नुकसान केल्यास वन विभागाकडून शेतक-यांना नुकसानभरपाई देण्यात येते. त्याकरिता शेतक-यांना नुकसानाची माहिती ४८ तासाच्या आत वन विभागाला देणे आवश्यक आहे.  

व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मिळतात १५ लाख वाघ, बिबट, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, रानकुत्रे यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी झाल्यास १५ लाख रुपये भरपाई मिळते. तसेच व्यक्ती कायम अपंग झाल्यास ५ लाख रुपये व किरकोळ जखमी झाल्यास औषधोपचारासाठी येणारा खर्च देण्यात येतो. खासगी रुग्णालयात उपचार करणे अगत्याचे असल्यास २० हजार रुपये प्रती व्यक्ती देण्यात येते. 

पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाल्यास  गाय, म्हैस व बैल यांचा मृत्यू झाल्यास बाजारभाव किमतीच्या ७५ टक्के किंवा ४० हजार यापैकी कमी असणारी रक्कम मिळते. तसेच मेंढी, बकरी व इतर पशुधनाचा मृत्यू झाल्यास बाजारभाव किमतीच्या ७५ टक्के किंवा १० हजार रुपये यापैकी कमी असणारी रक्कम मिळते.   गाय, म्हैस, बैल या जनावरांना कायम अपंगत्व आल्यास बाजारभाव किमतीच्या ५० टक्के किंवा १२ हजार रुपये यापैकी कमी असणारी रक्कम मिळते.  

शेतात वन्य प्राण्यांनी पिकांचे नुकसान केले तर शेतक-यांना भरपाई मिळते. त्याकरिता शेतक-यांनी ४८ तासांच्या आत वन विभागाला माहिती देणे आवश्यक आहे. तसेच कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. अनेक शेतक-यांच्या तक्रारी येतात व त्यांना भरपाईसुद्धा देण्यात येत आहे.- के. डी. पडोळ वनपरिक्षेत्र अधिकारी, खामगाव

टॅग्स :khamgaonखामगावFarmerशेतकरी