शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी मिळाले ९ लाख ७५ हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 11:26 IST

Khamgaon News खामगाव तालुक्यातील शेतक-यांना यावर्षी ९ लाख ७५ हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळाली आहे. 

ठळक मुद्देअभयारण्यातील प्राणी जंगलालगत असलेल्या शेतांमधील पिकांचे नुकसान करतात. पिकांचे नुकसान केल्यास वन विभागाकडून शेतक-यांना नुकसानभरपाई देण्यात येते.

- विवेक चांदूरकरलोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : जिल्ह्यात वन्य प्राण्यांकडून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात येते. त्यामुळे शेतक-यांच्या उत्पादनात कमालीची घट येते; मात्र वन्य प्राण्यांनी नुकसान केले तर त्याची भरपाई वन विभागाकडून देण्यात येते. खामगाव तालुक्यातील शेतक-यांना यावर्षी ९ लाख ७५ हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळाली असून, ३ लाख ७३ हजार ६०५ रुपये मंजूर झाले आहे. गत काही वर्षांपासून जंगलांमध्ये मानवाने अतिक्रमण केल्यामुळे प्राण्यांचे अधिवास संपले. त्यामुळे रोही, हरीण, चितळ, जंगली डुकरांनी शेताकडे आपला मोर्चा वळविला असून, मोठ्या प्रमाणात पिके फस्त करतात. या अभयारण्यातील प्राणी जंगलालगत असलेल्या शेतांमधील पिकांचे नुकसान करतात. त्यामुळे शेतक-यांच्या उत्पन्नात घट येते.. वन्य प्राण्यांनी पिकांचे नुकसान केल्यास वन विभागाकडून शेतक-यांना नुकसानभरपाई देण्यात येते. त्याकरिता शेतक-यांना नुकसानाची माहिती ४८ तासाच्या आत वन विभागाला देणे आवश्यक आहे.  

व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मिळतात १५ लाख वाघ, बिबट, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, रानकुत्रे यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी झाल्यास १५ लाख रुपये भरपाई मिळते. तसेच व्यक्ती कायम अपंग झाल्यास ५ लाख रुपये व किरकोळ जखमी झाल्यास औषधोपचारासाठी येणारा खर्च देण्यात येतो. खासगी रुग्णालयात उपचार करणे अगत्याचे असल्यास २० हजार रुपये प्रती व्यक्ती देण्यात येते. 

पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाल्यास  गाय, म्हैस व बैल यांचा मृत्यू झाल्यास बाजारभाव किमतीच्या ७५ टक्के किंवा ४० हजार यापैकी कमी असणारी रक्कम मिळते. तसेच मेंढी, बकरी व इतर पशुधनाचा मृत्यू झाल्यास बाजारभाव किमतीच्या ७५ टक्के किंवा १० हजार रुपये यापैकी कमी असणारी रक्कम मिळते.   गाय, म्हैस, बैल या जनावरांना कायम अपंगत्व आल्यास बाजारभाव किमतीच्या ५० टक्के किंवा १२ हजार रुपये यापैकी कमी असणारी रक्कम मिळते.  

शेतात वन्य प्राण्यांनी पिकांचे नुकसान केले तर शेतक-यांना भरपाई मिळते. त्याकरिता शेतक-यांनी ४८ तासांच्या आत वन विभागाला माहिती देणे आवश्यक आहे. तसेच कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. अनेक शेतक-यांच्या तक्रारी येतात व त्यांना भरपाईसुद्धा देण्यात येत आहे.- के. डी. पडोळ वनपरिक्षेत्र अधिकारी, खामगाव

टॅग्स :khamgaonखामगावFarmerशेतकरी