शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: राज्यात मतदानाला सुरुवात, मतदारांची केंद्रांवर गर्दी
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

शेतकर्‍यांचे लक्ष विचलित करण्यासाठी बाजार समितीवर खोटे आरोप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 12:15 AM

चिखली: महाराष्ट्रातील शेतकरी आजरोजी सोयाबीन, तूर, ऊस,  उडीद आदी शेतमालाला भाव मिळावा यासाठी झगडत आहे. या  शेतमालाला आघाडी सरकारच्या काळात मिळत असलेल्या  भावाच्या निम्मा भावदेखील भाजपा सरकारकडून सोयाबीनला  मिळत नाही, ही वस्तुस्थिती असल्याने शेतकर्‍यांच्या मनात तीव्र  असंतोष खदखदत आहे.

ठळक मुद्दे भ्रष्टाचार पुराव्यानिशी सिद्ध करण्याचे संचालकांचे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: महाराष्ट्रातील शेतकरी आजरोजी सोयाबीन, तूर, ऊस,  उडीद आदी शेतमालाला भाव मिळावा यासाठी झगडत आहे. या  शेतमालाला आघाडी सरकारच्या काळात मिळत असलेल्या  भावाच्या निम्मा भावदेखील भाजपा सरकारकडून सोयाबीनला  मिळत नाही, ही वस्तुस्थिती असल्याने शेतकर्‍यांच्या मनात तीव्र  असंतोष खदखदत आहे, यापासून शेतकर्‍यांचे लक्ष विचलित  करण्यासाठीच बाजार समितीकडे शेतकर्‍यांच्या निवास व  नाममात्र दरात भोजनाची मागणी करण्याचा पुळका श्‍वेता महाले  दाखवित असून, त्यांनी बाजार समितीवर केलेले आरोप  पुराव्यानिशी सिद्ध करावे, असे आव्हान बाजार समिती सभापती,  उपसभापतींसह संचालकांनी दिले आहे.श्‍वेता महाले यांनी केलेली मागणी व बाजार समिती प्रशासनावर  केलेल्या आरोपाच्या पृष्ठभूमीवर बाजार समिती संचालकांनी ६  नोव्हेंबर रोजी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे महाले यांना हे आवाहन  केले आहे. यानुषंगाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात  आले आहे की, चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीकडे शे तकर्‍यांना निवास व नाममात्र दरात भोजन देण्याबाबत यापूर्वी पासून माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे व आ. राहुल बोंद्रे यांच्या  मार्गदर्शक सूचनेवरून समिती प्रशासन प्रयत्नशील आहे व य थावकाश त्याबाबत कारवाई ही होणारच आहे. मात्र, तत्पूर्वी शेतकर्‍यांना समितीतील निवास व भोजनाऐवजी  सर्व कुटुंबाच्या पालनपोषणासाठी आपल्या शेतमालाला योग्य  भाव हवा आहे. तो सरकारने द्यावा जेणेकरून, जगाला पोसणार्‍या शेतकर्‍याला  अशा नाममात्र दरातील भोजनाची गरज भासणार नाही आणि  यासाठी श्‍वेता महाले यांनी त्यांचे वजन सरकार दरबारी वापरावे  व तालुक्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम शेतकर्‍यांना दिलासा  द्यावा, असे आवाहन करण्यासोबतच, शेतकर्‍यांप्रती पुळका  दर्शविणार्‍या व बाजार समिती राजकारण व भ्रष्टाचाराचा अड्डा  बनल्याचा आरोप करणार्‍या महाले यांनी भाजपाची राज्यात व  केंद्रात सत्ता असल्याने या सत्तेचा सदुपयोग घेऊन समितीत  भ्रष्टाचार उघडीस आणावा. भ्रष्ट पदाधिकारी व संचालकांवर  कारवाई करून बाजार समिती बरखास्त करावी, केवळ प्रसिद्धी  माध्यमांत सवंग प्रसिद्धीसाठी बिनबुडाचे आरोप करू नयेत, वास् तवात भाजपाच शेतकर्‍यांप्रती खोटा कळवळा दाखवित असून,  शेतमालाला अशाच प्रकारे कमी भाव देत राहिलात तर खरोखरच  शेतकर्‍यांना स्वत:चे घरदार विकून देशोधडीला लागावे लागणार  आणि त्यांना निवास व नाममात्र दरातील भोजनाची गरज  भासणार असल्याची बहुधा महाले यांना जाणीव झाली  असल्यानेच त्यांनी ही मागणी केली असावी, अशी उपरोधीत  टीकादेखील बाजार समितीचे सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी, उ पसभापती ज्ञानेश्‍वर सुरूशे, संचालक विष्णू पाटील, सचिन  शिंगणे, संजय गाडेकर, विजय शेजोळ, रूपराव सावळे, अशोक  मगर, राजू जावळे, सुमन म्हस्के, पुष्पा पडघान, ईश्‍वर इंगळे,  गजानन मोरे, दीपक जाधव, गजानन पवार, मनोज खेडेकर आदी  संचालकांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केली आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीMarketबाजार