शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
2
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
3
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
4
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
5
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
6
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
7
Online Shopping Tips : ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
8
बॅंक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
9
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
10
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
11
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
12
आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' दिग्दर्शित केलीच नाही? या चर्चांवर मुख्य अभिनेत्री म्हणाली...
13
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
14
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
15
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
16
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
17
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
18
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
19
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
20
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल

पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भासह मराठवाड्यात अत्यंत भीषण अवस्था !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 13:01 IST

नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये पेरण्या रखडल्या; जून महिन्यात १०० मीमीदेखील पाऊस नाही

खामगाव (जि. बुलढाणा) : राज्यात यंदा मान्सून नेमक्या वेळेत दाखल झाला असून, कोकण, पुणे आणि नाशिक विभागात चांगला पाऊस झाला आहे. परंतु दुसरीकडे, विदर्भ आणि मराठवाड्यातील स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागात जून महिन्यात १०० मिमीदेखील पावसाची नोंद झालेली नाही. परिणामी, खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या असून, शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.

विदर्भ व मराठवाड्यात खरीप हंगामात सोयाबीन, कपाशी, तूर यासारख्या पिकांचे पेरणी मोठे क्षेत्र आहे. मात्र, जून अखेरीस अपेक्षित पाऊस न झाल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरण्या पुढे ढकलल्या आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी जमिनीची नांगरून ठेवल्याने पावसाची वाट पाहत आहेत. हवामान खात्याने जुलैच्या पहिल्या आठवड्यात काहीशी सुधारणा होण्याची शक्यता दर्शवली आहे.

मान्सून दिल्लीच्या दारी; दिवसभरासाठी येलो अलर्ट

मोसमी पाऊस अर्थात मान्सून दिल्लीपर्यंत पोहोचला असून, मंगळवारी (दि. २४) पाऊस राजधानी क्षेत्रात दाखल होऊ शकतो. दरम्यान, दिल्ली क्षेत्रात दोन दिवसांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार राजस्थान, पंजाब, हरयाणा, चंडीगड आणि दिल्लीतील बहुतांश भागांत मान्सूनच्या वाटचालीसाठी स्थिती अनुकूल आहे. 

'स्कायमेट' या खासगी हवामानविषयक संस्थेनेही मंगळवारी दिल्लीत मान्सून दाखल होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, उत्तर भारतात उत्तर प्रदेश व बिहारमध्ये मोजक्या भागांत पाऊस झाला, तर राजस्थानमध्ये जयपूरसह काही भागांत चांगला पाऊस झाला आहे. ईशान्य आणि दक्षिण भारतवगळता अन्य भागांत सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे.

'विदर्भाकडे सरकारने लक्ष द्यावे'

विदर्भात १५ जूनपर्यंत मान्सून येईल, असा अंदाज होता. काही शेतकऱ्यांनी पेरणीही केल्या. आता मात्र विदर्भात दुष्काळसदृश स्थिती आहे. कापसाचे बियाणे पेरल्यावर त्याला अंकुर आले आणि ते फस्त करण्याचे काम 'वाणी' नावाची कीड करत आहे.

 शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याकडे राज्य सरकारने त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे गट नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. शनिवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, जून महिना कोरडा गेल्याने शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकट आले आहे. ३५ टक्के पेक्षा सोयाबीनचा पेरा झाला नाही. तातडीची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलवावी आणि यावर उपाययोजना करण्याचे निर्देश द्यावे.

टॅग्स :Rainपाऊसweatherहवामान अंदाजMarathwadaमराठवाडाVidarbhaविदर्भ