शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
9
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
10
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
11
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
12
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
13
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
14
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
15
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
17
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
18
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
19
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
20
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार

पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भासह मराठवाड्यात अत्यंत भीषण अवस्था !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 13:01 IST

नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये पेरण्या रखडल्या; जून महिन्यात १०० मीमीदेखील पाऊस नाही

खामगाव (जि. बुलढाणा) : राज्यात यंदा मान्सून नेमक्या वेळेत दाखल झाला असून, कोकण, पुणे आणि नाशिक विभागात चांगला पाऊस झाला आहे. परंतु दुसरीकडे, विदर्भ आणि मराठवाड्यातील स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागात जून महिन्यात १०० मिमीदेखील पावसाची नोंद झालेली नाही. परिणामी, खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या असून, शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.

विदर्भ व मराठवाड्यात खरीप हंगामात सोयाबीन, कपाशी, तूर यासारख्या पिकांचे पेरणी मोठे क्षेत्र आहे. मात्र, जून अखेरीस अपेक्षित पाऊस न झाल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरण्या पुढे ढकलल्या आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी जमिनीची नांगरून ठेवल्याने पावसाची वाट पाहत आहेत. हवामान खात्याने जुलैच्या पहिल्या आठवड्यात काहीशी सुधारणा होण्याची शक्यता दर्शवली आहे.

मान्सून दिल्लीच्या दारी; दिवसभरासाठी येलो अलर्ट

मोसमी पाऊस अर्थात मान्सून दिल्लीपर्यंत पोहोचला असून, मंगळवारी (दि. २४) पाऊस राजधानी क्षेत्रात दाखल होऊ शकतो. दरम्यान, दिल्ली क्षेत्रात दोन दिवसांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार राजस्थान, पंजाब, हरयाणा, चंडीगड आणि दिल्लीतील बहुतांश भागांत मान्सूनच्या वाटचालीसाठी स्थिती अनुकूल आहे. 

'स्कायमेट' या खासगी हवामानविषयक संस्थेनेही मंगळवारी दिल्लीत मान्सून दाखल होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, उत्तर भारतात उत्तर प्रदेश व बिहारमध्ये मोजक्या भागांत पाऊस झाला, तर राजस्थानमध्ये जयपूरसह काही भागांत चांगला पाऊस झाला आहे. ईशान्य आणि दक्षिण भारतवगळता अन्य भागांत सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे.

'विदर्भाकडे सरकारने लक्ष द्यावे'

विदर्भात १५ जूनपर्यंत मान्सून येईल, असा अंदाज होता. काही शेतकऱ्यांनी पेरणीही केल्या. आता मात्र विदर्भात दुष्काळसदृश स्थिती आहे. कापसाचे बियाणे पेरल्यावर त्याला अंकुर आले आणि ते फस्त करण्याचे काम 'वाणी' नावाची कीड करत आहे.

 शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याकडे राज्य सरकारने त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे गट नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. शनिवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, जून महिना कोरडा गेल्याने शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकट आले आहे. ३५ टक्के पेक्षा सोयाबीनचा पेरा झाला नाही. तातडीची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलवावी आणि यावर उपाययोजना करण्याचे निर्देश द्यावे.

टॅग्स :Rainपाऊसweatherहवामान अंदाजMarathwadaमराठवाडाVidarbhaविदर्भ