जास्तीचे पाणीदेखील आरोग्याला अपायकारक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:38 IST2021-09-23T04:38:58+5:302021-09-23T04:38:58+5:30

व्यायामामुळे किंवा गरमीमुळे होणाऱ्या डिहायड्रेशनमुळे आपल्या शरीरात आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. डिहायड्रेशन रोखण्यासाठी दररोज भरपूर पाणी ...

Excess water is also harmful to health! | जास्तीचे पाणीदेखील आरोग्याला अपायकारक!

जास्तीचे पाणीदेखील आरोग्याला अपायकारक!

व्यायामामुळे किंवा गरमीमुळे होणाऱ्या डिहायड्रेशनमुळे आपल्या शरीरात आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. डिहायड्रेशन रोखण्यासाठी दररोज भरपूर पाणी मिळणे आवश्यक आहे. आपण दररोज किती पाणी प्यावे याबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत. आरोग्यतज्ज्ञ सामान्यत: दोन लिटर पाणी पिण्याची शिफारस करतात. काही तज्ज्ञांच्या मते तहान लागलेली नसतानाही दिवसभर सतत पाणी पिणे आवश्यक आहे. तर काहींच्या मते तहान लागलेली नसेल तर विनाकारण पाणी पिऊ नये.

कोणी किती प्यावे पाणी?

वयोगट दिवसाला किती पाणी (लिटर)

नवजात ५ ते ६ कप

१२ वर्षांपर्यंत २.५

१६ ते २९ वर्षांपर्यंत २.५

३१ ते ४० वर्षांपर्यंत ३

४१ ते ६० वर्षांपर्यंत ३

६१ पेक्षा जास्त २

शरीरात पाणी जास्त झाले तर...

वैद्यक शास्त्रानुसार प्रत्येकाला भरपूर पाणी पिण्याची गरज नाही. प्रत्येकाची गरज वेगवेगळी असते. दररोज किमान ५ ते ६ लिटर पाणी प्यावे हे सांगणे चुकीचे आहे. यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळते.

तज्ज्ञ काय म्हणतात...

शरीराला ८० टक्के पाणी पिण्यामधून मिळते, तर २० टक्के अन्नापासून. दिवसभरात जवळपास अडीच ते तीन लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. शरीरातील घाण लघवीवाटे बाहेर पडते. त्यामुळे दिवसभर माणूस तरतरीत व आनंदीत राहतो. म्हणूनच योग्य तेवढे पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करू नये.

-डॉ. अमजद सलीम, जनरल फिजिशियन

सुदृढ आरोग्यासाठी सकस आहाराबरोबर भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. मात्र एका मर्यादेपेक्षा जास्त पाणी पिणेही योग्य नाही. शरीराला गरजेपुरतेच पाणी प्यावे.

-डॉ. प्रवीणकुमार निकस, वैद्यकीय अधिकारी

Web Title: Excess water is also harmful to health!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.