मोताळा तालुक्यातील १३ ग्रा.पं.ची निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 01:59 IST2017-08-02T01:58:30+5:302017-08-02T01:59:06+5:30
मोताळा : शासनाने जाहीर केलेल्या सरपंचाची निवडणूक थेट जनतेतूून होणार असल्याच्या निर्णयामुळे येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होऊ घातलेल्या निवडणुकीत मोताळा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवडणूक ही थेट जनतेमधून होणार आहे, त्यामुळे वेगवेगळ्या पॅनलच्या नावाखाली होणारी अंतर्गत गटबाजी संपुष्टात येणार आहे

मोताळा तालुक्यातील १३ ग्रा.पं.ची निवडणूक
शंकर तेलंग।
लोकमत न्यूज नेटवर्क
मोताळा : शासनाने जाहीर केलेल्या सरपंचाची निवडणूक थेट जनतेतूून होणार असल्याच्या निर्णयामुळे येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होऊ घातलेल्या निवडणुकीत मोताळा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवडणूक ही थेट जनतेमधून होणार आहे, त्यामुळे वेगवेगळ्या पॅनलच्या नावाखाली होणारी अंतर्गत गटबाजी संपुष्टात येणार आहे
राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील मतदारांना आपल्या हक्काचे आपल्या मनाप्रमाणे गावाचा प्रथम नागरिक अर्थात सरपंच निवडण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पॅनलच्या नावाखाली गावात चालणारी गटबाजी जी निवडणुकीनंतरही गावकर्यांमध्ये दुही निर्माण करायची ती या निवडीने कायमची संपुष्टात येणार आहे. संभाव्य उमेदवार डोळ्यासमोर ठेवून जरी जनतेने मतदान केले, तरी पॅनल ठरवेल तोच सरपंच गावाच्या माथी मारल्या जायचा व इच्छा नसतानाही गावकर्यांना तो गुपचुप स्वीकारावा लागायचा. पॅनल हे गावातील श्रीमंत व्यक्तिचे असायचे, त्यामुळे सरपंचपद ही घराणेशाहीत असायचे. सरपंच पद कोणतेही आरक्षित असले, तरी आपल्या र्मजितील व शक्यतो अडानी अशिक्षित उमेदवार हा सरपंच म्हणून समोर केल्या जात होता. सत्ता आपल्याकडे ठेवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवल्या जायच्या, हव्या त्या गोष्टीचे आमिष दाखवले जायचे. सदस्यांची पळवापळवी होऊन रक्तरंजीत लढायासुद्धा होत होत्या; परंतु आता राज्य सरकारने जाहीर केलेल्या जनतेतून सरपंच निवडणुकीमुळे आपल्या गावाच्या योग्यतेनुसार सरपंच आपल्याला निवडता येईल, त्यामुळे जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.
मोताळा तालुक्यात १३ ग्रामपंचायतींमध्ये १२१ सदस्य निवडले जाणार असून, त्यामध्ये एससी - ९, एसटी २, ओबीसी १३, तर राखीव महिलांमध्ये महिला १0, एसटी १, ओबीसी १६, इतर ४0 असून, सर्वसाधारणसाठी २0 असे १२१ सदस्य संख्या राहणार आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये निवडणुका होणार्या ग्रामपंचायतींमध्ये राजुर, लपाली, पिंप्री गवळी, डिडोळा बु., गोतमारा, शेलगाव बाजार, माळेगाव, गुळभेली, कोहाळा, महाळुगी जहागीर, चिंचपूर, तालखेड, चावर्दा या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
असे आहेत गावानुसार सरपंच पदाचे आरक्षण
राजुर-सर्वसाधारण, लपाली-सर्वसाधारण,प्रि .गवळी- सर्वसाधारण, डिडोळा बु. -सर्वसाधारण,गोतमारा-सर्वसाधारण,शेलगाव बाजार- सर्वसाधारण स्त्री, माळेगाव-सर्वसाधारण स्त्री, गुळ भेली- सर्वसाधारण स्त्री, कोहाळा- ओबीसी, महाळुंगी जहागीर- ओबीसी , चिंचपूर-ओबीसी महिला, तालखेड- ओबीसी महिला, चावर्दा- एससी लेडीज असे ग्रामपंचायतनिहाय आरक्षण आहे.