शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

हमीदराच्या अल्पवाढीमुळे कपाशी पेरणीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 11:48 IST

Agriculture News : शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त करण्यात येत असून, कपाशीच्या पेरणीत घट येणार आहे.   

लोकमत न्यूज नेटवर्क  खामगाव : उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. अशा स्थितीत शेतमालास मिळणारे अत्यल्प दर शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवत आहे. यानंतरही केंद्र शासनाने कापसाला २०० रुपयांचे वाढीव दर जाहीर केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त करण्यात येत असून, कपाशीच्या पेरणीत घट येणार आहे.   बुलडाणा जिल्ह्यात कापूस हे महत्त्वाचे पीक आहे. सोयाबीन सोबतच शेतकरी कपाशीची मोठ्या प्रमाणात पेरणी करतात. मात्र, शेतमालास खर्चावर आधारित दर मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांनी कापसाचे क्षेत्र कमी केले आहे. अलीकडच्या काळात कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रकोप वाढला आहे. या अळीला नियंत्रित करण्यासाठी शेतकऱ्यांना हजारो रुपये किमतीच्या फवारण्या कराव्या लागतात. यानंतरही अळीनियंत्रणाखाली येत नाही. खताच्या किमती वाढल्या आहेत. पूर्वी ८०० रुपये किमतीचे खताचे पोते आता १२०० रुपयांवर गेले आहेत. मजुरीचे दर २०० रुपयांवर पोहोचले आहेत. डिझेलच्या किमती ९२ रुपयांवर पोहोचल्या आहेत. यामुळे मशागतीचे दर वाढले आहेत. कीटकनाशकांच्या किमती आवाक्याबाहेर आहे. शेतकऱ्यांना एकरी दोन ते तीन क्विंटलही कापसाचे उत्पादन होणे अवघड झाले आहे. 

एका एकराला ३० हजार खर्च; उत्पन्न १५ हजार एक एकरासाठी ३० हजारांचा खर्च येतो. मात्र, उत्पन्न १२ ते १५ हजारांचेच होत आहे. शेतकऱ्यांना १५ हजारांच्या नुकसानाचा सामना करावा लागत आहे. कापसाचे उत्पादन आणि मिळणाऱ्या दरात कुठलाच ताळमेळ नाही. यामुळे शेतकऱ्यांनी कापसाचे उत्पादन सोडले आहे. 

उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे हमी दरातही त्यानुसार वाढ व्हायला हवी. उत्पादन खर्च जास्त व उत्पन्न कमी अशी शेती व्यवसायाची अवस्था झाली आहे. यामुळे शेतकरी संकटात आहेत. अशा परिस्थितीत शेतमालाला खर्चावर आधारित दर मिळालेच नाही.- सुनील जाधव, वडगा पाटण, जळगाव जामोद 

टॅग्स :agricultureशेतीkhamgaonखामगावFarmerशेतकरी