विदर्भातील पाच शहरात धावणार ई-रिक्षा

By Admin | Updated: August 6, 2016 01:51 IST2016-08-06T01:51:29+5:302016-08-06T01:51:29+5:30

वायु प्रदूषणाला बसणार आळा; प्रवासी वाहतुकीचे परवाने देण्यास मान्यता.

E-rickshaw to run in five cities of Vidarbha | विदर्भातील पाच शहरात धावणार ई-रिक्षा

विदर्भातील पाच शहरात धावणार ई-रिक्षा

नीलेश शहाकार
बुलडाणा, दि. ५ : रस्त्यांवरील वाहनांची गर्दी वाढण्यासोबतच अवैध प्रवासी वाहतुकीला चालना मिळत आहे.त्याला आळा घालण्यासह पर्यावरणालापुरक ठरण्याच्या दृष्टीने ई-रिक्षाला प्रवासी वाहतुकीचे परवाने देण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा, नागपूर व वर्धा या पाच शहरामध्ये लवकरच ई-रिक्षा धावतांना दिसणार आहे.
पर्यावरण सुरक्षा व रोजगार निर्मिती या उद्देशाने गृह विभागाने ३ ऑगस्ट रोजी या संदर्भात प्रादेशिक परिवहन विभागाला आदेश दिला. मोटर वाहन कायदा, ११८८च्या कलम ७४(१) मधील तरतुदीनुसार विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा, नागपूर व वर्धा तसेच मराठवाड्यातील लातूर या ठिकाणी प्रादेशिक परिवहन विभागाने ई-रिक्षा संदर्भात परवाने देण्याबाबत कार्यवाही करावी, असे आदेशात नमुद आहे.
सदर ई-रिक्षाचे परवाने देण्यापूर्वी सबंधीत प्रादेशिक परिवहन विभागाला संबधीत शहरातील पोलीस आयुक्त/अधिक्षक, महानगर पालिका आयुक्त/मुख्याधिकारी यांचे अभिप्राय घेणे बंधनकारक राहणार आहे. राज्य शासनाच्या ई-रिक्षा धोरणानुसार ई-रिक्षा वाहनांचा स्वंतत्र्य संवर्ग राहणार असून चालकाला ई-रिक्षा परवाना मिळाल्यानंतर विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ई-रिक्षा वाहतुकीसाठी वेगळा रस्ता तयार करण्यात येणार आहे.
सायकल रिक्षाचालकांना सुगीचे दिवस
आदेशानुसार केवळ सायकलरिक्षा चालविणार्‍या चालक, मालक यांनाच ई-रिक्षा परवाने दिले जाणार आहेत. ई-रिक्षाच्या माध्यमातून त्यांच्यासाठी व्यवसायाच्या नवीन संधी निर्माण केल्या जाणार आहेत. या शिवाय महिला व अंपग व्यक्तींना प्राधान्य राहणार आहे. तसेच ई-रिक्षामुळे शहरातील वायू प्रदुषणाची पातळी कमी करण्याचे उद्दीष्ट ठरविण्यात आले आहे.

मराठी बोलता येणे अनिवार्य
आदेशानुसार ई-रिक्षा परवानासाठी अर्ज करणार्‍यास स्थानिक भाषा व स्थानिक स्थळांची माहिती असणे अनिवार्य असणार आहे. शिवाय त्यांच्यावर १ वर्षात कुठलाही गुन्हा दाखल नसावा, तो शासकीय व खाजगी कंपनीत नोकरीवर नसावा अशी अट आहे.

प्रवाशांची घेणार काळजी
सदर वाहनांमध्ये प्रथमोपचार पेटी, अग्निशमन यंत्र ठेवणे अनिवार्य राहणार आहे. तसेच वाहनावर चालकाचे नाव, पत्ता, फोन क्रमांक रंगविणे अनिवार्य राहील. आसन क्षमतेपक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे, उभ्या प्रवाश्यांची वाहतूक केल्यास वाहन जप्त केले जाणार आहे.

Web Title: E-rickshaw to run in five cities of Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.