शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

युतीच्या कार्यकाळात ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था दुबळी : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 17:55 IST

खामगाव :  युती शासनाच्या कार्यकाळात ग्रामिण भागातील अर्थव्यवस्था दुबळी झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. 

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव :  युती शासनाच्या कार्यकाळात ग्रामिण भागातील अर्थव्यवस्था दुबळी झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. स्थानिक गांधी चौक येथे आयोजित जाहिर सभेत त्यांनी युती शासनाचा खरपूस समाचार घेतला.  सभेसाठी आ.रमेश बंग, माजी आ.दिलीपकुमार सानंदा, रविकांत तुपकर, श्यामबाबु उमाळकर, तब्बसुम हुसेन, गणेश माने, तेजेंद्रसिंग चौहान, दयाराम वानखडे, अनिल नावंदर आदींची उपस्थिती होती. पुढे बोलतांना जयंत पाटील म्हणाले, राज्यात फडणवीसांचे नव्हे तर फसणविसांचे सरकार आहे. या सरकारने लागू केलेले सारे कायदे अभ्यासपूर्ण नाहीत. केवळ नावाला योजना राबवून जनतेची दिशाभूल केली आहे. जीएसटीचा कायदा केंद्रात मनमोहनसिंग यांनी आणला. त्याची अंमलबजावणी भाजपा सरकारला करता आली नाही. गावागावात व्यावसायीकांनी व्यवसाय सुरु न करता आपल्या व्यवसायाचे प्रमाण कमी केले. व्हिडीओ डाक्यूमेंट्रीच्या सहाय्याने त्यांनी नरेंद्र मोदी व देवेंद्र फडवणीस सरकारवर टिका केली. पुन्हा भाजप-सेनेचे सरकार आल्यास राज्याचे तसेच देशाचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही अशी भिती व्यक्त करीत त्यांनी आघाडीच्या उमेदवारांनी निवडून देण्याचे आवाहन केले.  दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, माजी आ. दिलीपकुमार सानंदा यांच्यासह आदि काँगे्रस - राष्ट्रवादी नेत्यांनी मनोगत व्यक्त केले.

खासदारांनी जमवली माया : शिंगणे खासदारांच्या अंगाला मसाल्याचा वास येत असून मसाला व्यावसायिकांच्या माध्यमातून त्यांनी प्रचंडमाया जमविली असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी खामगाव येथील सभेत केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbuldhana-pcबुलडाणाJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस