शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

अवर्षणामुळे मत्स्य व्यवसायाच्या अर्थकारणाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 5:08 PM

बुलडाणा: अवर्षणाच्या गर्तेत अडकलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायालाही दुष्काळाचा फटका बसत असून जिल्ह्याचे सुमारे पाच हजार मेट्रीक टनाच्या आसपास होणार्या उत्पादनही अडचणीत आले आहे.

- नीलेश जोशी

बुलडाणा: अवर्षणाच्या गर्तेत अडकलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायालाही दुष्काळाचा फटका बसत असून जिल्ह्याचे सुमारे पाच हजार मेट्रीक टनाच्या आसपास होणार्या उत्पादनही अडचणीत आले आहे. परिणामी सुमारे ११ हजार व्यावसायिकांचा उदरनिर्वाह अवलंबून असलेला या व्यवसाय आर्थिक अडचणीत येण्याची भीती व्यक्त होत आहे. बुलडाणा जिल्ह्यात दरवर्षी सरासरी पाच हजार मेट्रीक टन मत्स्योत्पादन होत असते. मात्र यंदा नोव्हेंबर अखेर अवखे एक हजार ९३५ मेट्रीक टनच उत्पादन झालेल आहे. नाही म्हणायला आगामी काळात खर्या अर्थाने मत्स्योत्पादनाचा हंगाम असला तरी जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प हे मृतसाठ्यात असून त्यातून किती उत्पादन मिळेल याबाबत साशंकता आहे. बुलडाणा जिल्ह्यात मत्स्य व्यवसायातंर्गत दरवर्षी साधारणत: १८ ते २० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होत असते. मात्र यंदा पावसाळ््यातच जिल्ह्यातील छोट्या मोठ्या ५०० तलावांमध्ये अपेक्षीत पाणीसाठा झाला नाही. त्यामुळे १७० च्या आसपास असलेल्या जिल्ह्यातील मत्स्य विकास संस्थांकडून मत्स्य जिर्यांची अपेक्षीत मागणी झाली नव्हती. त्याचा फटका येत्या काळात बसण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे. मुळात मत्स्य जिरे निर्मितीसाठी पोषक असलेल्या जूलै ते सप्टेंबर महिन्यात अपेक्षीत दमदार असा पाऊस न झाल्याने त्यास फटका बसला आहे. त्याचा परिणाम विभागाच्या महसूल वाढीवरही होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील पैनगंगा, खडकपूर्णा, पूर्णा, नळगंगा, विश्वगंगा, कोराडी, मस या ४४० किमी लांबीच्या जिल्ह् यातील नद्यांसहीत पाटबंधारे, जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील सुमारे ५०० तलावांच्या माध्यमातून मत्स्योत्पादन घेण्यात येते. मात्र जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प व छोटे तलावही मृतसाठ्यात असल्याने समस्या निर्माण झाली आहे. परिणामी एैन हंगामात किती उत्पादन होते यावर बर्याच गोष्टी अवलंबून आहेत. नाही म्हंटले तरी किमान एक ते दोन हजार मेट्रीकटन मत्स्योत्पादनाला फटका बसण्याची साधार भीती व्यक्त होत आहे. परिणाम स्वरुप सरासरी उत्पादनाच्या तुलनेत पाच ते सात कोटी रुपयांचा फटका प्रसंगी या व्यवसायाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, डिसेंबरमध्ये अनुषंगीक विषयान्वये ठेक्यास मुदत वाढ देण्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हा मत्स्य विकास कार्यालयाकडे येण्याची शक्याता आहे. त्यानुषंगाने पुढील चित्र स्पष्ट होईल.

२० हजार हेक्टरवर होते उत्पादन

बुलडाणा जिल्ह्यात मत्स्य व्यवसायासाठी मत्स्य व्यवसाय विकास कार्यालयातंर्गत ४०० तलावांचे मिळून आठ हजार २११ हेक्टर, जिल्हा परिषदेचे ११ हजार ३४ हेक्टर आणि पाटबंधारे विभागाच्या १०२ तलाव मिळून २० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर साधारणत: मत्स्योत्पादन घेण्यात येते. मात्र यंदा जिल्ह्यातील बहुतांश तलावात अत्यल्प पाणीसाठा असल्याने तथा मत्स्योत्पादनासाठी पोषक असणारे २५ अंश सेल्शीयसच्या आसपासचे तापमान उपलब्ध न झाल्याने समस्या निर्माण होण्याची भीती आहे.

मत्स्यजिरे निर्मिती केंद्रासाठीही पाण्याची मागणी

अवर्षणाची स्थिती असल्याने मत्स्य जिरे निर्मिती केंद्रालाही पाण्याची अडचण असून त्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केंद्रासाठीच्या पाण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यादृष्टीने सध्या प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू असल्याचे सुत्रांनी सांगितले. मधल्या काळात पाच कोटी ८४ लाख २५ हजार मत्स्यजिरे निर्मिती झाली होती.

 येत्या काळात मत्स्योत्पादनाचा मुख्य हंगाम आहे. त्या काळातील पाण्याची उपलब्धता पाहता एकंदरीत स्थितीचा अंदाज स्पष्ट होईल, मात्र अवर्षणाचा फटका यंदा मत्स्योत्पादनास बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- अ. आ. नायकवडे, जिल्हा मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाfishermanमच्छीमार