शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

खरीपाच्या बी-बियाण्यावर दुष्काळाचे ढग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 17:38 IST

बुलडाणा: दुष्काळ आणि पावसाच्या हुलकावणीमुळे यंदा शेतकºयांकडे घरचे बियाणे उपलब्ध नाही. त्यामुळे महाबीज अथवा खासगी कंपन्यावरच शेतकºयांची मदार राहणार आहे.

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा: दुष्काळ आणि पावसाच्या हुलकावणीमुळे यंदा शेतकºयांकडे घरचे बियाणे उपलब्ध नाही. त्यामुळे महाबीज अथवा खासगी कंपन्यावरच शेतकºयांची मदार राहणार आहे. खरीप हंगाम अवघ्या ३८ दिवसावर आला असून, शेतकºयांना पेरणीसाठी दुष्काळात मोठी आर्थिक तडजोड करावी लागणार आहे. ७ लाख ३८ हजार ५४१ हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी दीड लाख क्विंटल बियाणे लागणार आहे. परंतू खरीपाच्या बियाण्यावर पडलेले दुष्काळाचे ढग शेतकºयांची चिंता वाढवणारे आहे. जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र ७ लाख ४८ हजार ८०० हेक्टर आहे. त्यात गतवर्षी ७ लाख ३५ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली होती. परंतू अत्यल्प पावसाचा खरीप हंगामाला  फटका बसला. गेल्यावर्षी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तब्बल २३ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला. सोबतच किमान सात ते अधिकतम २९ दिवसापर्यंत पावसाने जिल्ह्यात दडी मारली होती. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा हा गेल्या सहा वर्षातील निच्चांकी पातळीवर पोहोचला. अनेक शेतकºयांचा तर पेरणीसाठी लागलेला खर्चही वसूल झाला नाही. उत्पादनात कमालीची घट झाली. शेतकरी आर्थिक संकटात सापडले. त्यामुळे शेतकºयांना थोडेबहुत आलेले शेतमालाची विक्री करावी लागली. जिल्ह्याची पैसेवारी ५० पैशाच्या खाली आल्याने या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन कृषी विभागाने यावर्षी खरीप हंगामाचे ७ लाख ३८ हजार ५४१ हेक्टरवर नियोजन केले आहे. त्याकरीता विविध प्रकारचे १ लाख ३९ हजार ४३ क्विंटल बियाणे लागणार आहे. परंतू गतवर्षी पावसाने पाठ फिरविल्याने शेतकºयांकडे यंदा खरीप हंगामासाठी घरचे बी-बीयाणेच शिल्लक राहिलेले नाही. बी-बियाण्याच्या खरेदीसाठी दुष्काळात शेतकºयांना आर्थिक जुळवा-जुळव करणे तारेवरची कसरत होणार आहे. एकूण बियाण्यांपैकी ८७ टक्के सोयाबीनचे बियाणे जिल्ह्यात सुरूवातीला कपाशीचे पीक सर्वाधिक घेतले जात होते. मात्र आता कपाशीची जागा सोयाबीनने घेतली आहे. त्यामुळे खरीप हंगामात जिल्ह्याला लागणाºया एकूण बियाण्यांपैकी ८७ टक्के बियाणे हे सोयाबीनचे आहे. जिल्ह्याला १ लाख २१ हजार ८९० क्विंटल सोयाबीनचे बियाणे लागणार आहे. त्यापैकी ४२ हजार ८३० क्विंटल सोयाबीन बियाणे हे सार्वजनिक कंपनीकडून पुरविले जाणार आहे. तर ७९ हजार ६० क्विंटल सोयाबीन बियाण्याचा पुरवठा खासगी कंपनीमार्फत होणार आहे.  सार्वजनिक यंत्रणा पुरविणार ४८ टक्के बियाणे बियाणे हा शेतीमध्ये शाश्वत उत्पादन व उत्पादकता वाढविणेसाठी महत्वाचा घटक असतात. बियाण्याची उपलब्धता ही सार्वजनिक यंत्रणा व खासगी यंत्रणाकडून केली जाते. सावर्जनिक यंत्रणेमध्ये शासनाच्या अर्थात महाबीज सारख्या यंत्रणांचा समावेश येतो. यंदा सार्वजनीक यंत्रणेतून जिल्ह्याला ४८ टक्के बियाण्यांचा पुरवठा होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यामध्ये ४५ हजार २६४ क्विंटल बियाण्याचा संभाव्य पुरवठा सार्वजनीक माध्यमातून होणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी