शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

खरीपाच्या बी-बियाण्यावर दुष्काळाचे ढग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 17:38 IST

बुलडाणा: दुष्काळ आणि पावसाच्या हुलकावणीमुळे यंदा शेतकºयांकडे घरचे बियाणे उपलब्ध नाही. त्यामुळे महाबीज अथवा खासगी कंपन्यावरच शेतकºयांची मदार राहणार आहे.

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा: दुष्काळ आणि पावसाच्या हुलकावणीमुळे यंदा शेतकºयांकडे घरचे बियाणे उपलब्ध नाही. त्यामुळे महाबीज अथवा खासगी कंपन्यावरच शेतकºयांची मदार राहणार आहे. खरीप हंगाम अवघ्या ३८ दिवसावर आला असून, शेतकºयांना पेरणीसाठी दुष्काळात मोठी आर्थिक तडजोड करावी लागणार आहे. ७ लाख ३८ हजार ५४१ हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी दीड लाख क्विंटल बियाणे लागणार आहे. परंतू खरीपाच्या बियाण्यावर पडलेले दुष्काळाचे ढग शेतकºयांची चिंता वाढवणारे आहे. जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र ७ लाख ४८ हजार ८०० हेक्टर आहे. त्यात गतवर्षी ७ लाख ३५ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली होती. परंतू अत्यल्प पावसाचा खरीप हंगामाला  फटका बसला. गेल्यावर्षी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तब्बल २३ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला. सोबतच किमान सात ते अधिकतम २९ दिवसापर्यंत पावसाने जिल्ह्यात दडी मारली होती. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा हा गेल्या सहा वर्षातील निच्चांकी पातळीवर पोहोचला. अनेक शेतकºयांचा तर पेरणीसाठी लागलेला खर्चही वसूल झाला नाही. उत्पादनात कमालीची घट झाली. शेतकरी आर्थिक संकटात सापडले. त्यामुळे शेतकºयांना थोडेबहुत आलेले शेतमालाची विक्री करावी लागली. जिल्ह्याची पैसेवारी ५० पैशाच्या खाली आल्याने या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन कृषी विभागाने यावर्षी खरीप हंगामाचे ७ लाख ३८ हजार ५४१ हेक्टरवर नियोजन केले आहे. त्याकरीता विविध प्रकारचे १ लाख ३९ हजार ४३ क्विंटल बियाणे लागणार आहे. परंतू गतवर्षी पावसाने पाठ फिरविल्याने शेतकºयांकडे यंदा खरीप हंगामासाठी घरचे बी-बीयाणेच शिल्लक राहिलेले नाही. बी-बियाण्याच्या खरेदीसाठी दुष्काळात शेतकºयांना आर्थिक जुळवा-जुळव करणे तारेवरची कसरत होणार आहे. एकूण बियाण्यांपैकी ८७ टक्के सोयाबीनचे बियाणे जिल्ह्यात सुरूवातीला कपाशीचे पीक सर्वाधिक घेतले जात होते. मात्र आता कपाशीची जागा सोयाबीनने घेतली आहे. त्यामुळे खरीप हंगामात जिल्ह्याला लागणाºया एकूण बियाण्यांपैकी ८७ टक्के बियाणे हे सोयाबीनचे आहे. जिल्ह्याला १ लाख २१ हजार ८९० क्विंटल सोयाबीनचे बियाणे लागणार आहे. त्यापैकी ४२ हजार ८३० क्विंटल सोयाबीन बियाणे हे सार्वजनिक कंपनीकडून पुरविले जाणार आहे. तर ७९ हजार ६० क्विंटल सोयाबीन बियाण्याचा पुरवठा खासगी कंपनीमार्फत होणार आहे.  सार्वजनिक यंत्रणा पुरविणार ४८ टक्के बियाणे बियाणे हा शेतीमध्ये शाश्वत उत्पादन व उत्पादकता वाढविणेसाठी महत्वाचा घटक असतात. बियाण्याची उपलब्धता ही सार्वजनिक यंत्रणा व खासगी यंत्रणाकडून केली जाते. सावर्जनिक यंत्रणेमध्ये शासनाच्या अर्थात महाबीज सारख्या यंत्रणांचा समावेश येतो. यंदा सार्वजनीक यंत्रणेतून जिल्ह्याला ४८ टक्के बियाण्यांचा पुरवठा होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यामध्ये ४५ हजार २६४ क्विंटल बियाण्याचा संभाव्य पुरवठा सार्वजनीक माध्यमातून होणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी