शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

दुष्काळी परिस्थितीतही २ एकरात घेतली ४०० क्विंटल हळद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2019 1:49 PM

वरवट बकाल: संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील शेतकऱ्याने २ एकरात तब्बल ४०० क्विंटल हळदीचे उत्पादन घेतले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवरवट बकाल: संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील शेतकऱ्याने २ एकरात तब्बल ४०० क्विंटल हळदीचे उत्पादन घेतले आहे. दुष्काळी परिस्थितीतही भरघोस उत्पादन झाल्याने याची तालुकाभरात चर्चा होत आहे.संग्रामपूर तालुका सातपुड्याच्या पायथ्याशी असून, या भागातील शेतकरी कापूस, हरभरा, तूर, सोयाबीन, उडीद, मुग ही पारंपरिक पिके घेतात. अलीकडच्या काळात शेती परवडत नसल्याने काही शेतकरी इतर पिकांकडे वळत आहेत. असाच एक प्रयोग महादेव डाबरे यांनी केला. त्यांनी २ एकरात ४०० क्विंटल हळदीचे उत्पादन घेत पारंपरिक पिकांना एक सशक्त पर्याय शोधला आहे.पारंपरिक पीक पध्दतीतून पाहिजे तसे उत्पन्न होताना दिसत नाही. अलीकडे पाऊस पाठ फिरवत असल्याने शेती हा तोट्याचा व्यवसाय झाला आहे; परंतु तालुका मुख्यालयापासून ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या वरवट बकाल येथील शेतकरी महादेव डाबरे यांनी विविध प्रयोग करणे सुरू केले. त्यांना २०१० मध्ये राज्य शासनाचा शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारही मिळाला आहे. वडीलोपार्जीत शेतजमिनीत स्वत:च्या कल्पकतेतून दरवर्षी नवनवीन प्रयोग ते करतात. शेती सुपीक होजास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल, याकडे त्यांचा कल राहतो. (वार्ताहर)-पाण्याचा प्रश्न सोडविला !तालुक्यात अनेक शेतकरी प्रचंड मेहनत घेतात, परंतु त्यांना सर्वात मोठी अडचण येते ती पाण्याची. दिवसेंदिवस पाऊस कमी होत असल्याने विहिरी, बोअरवेलला पाणी नाही. त्यामुळे उत्पादन घेणे शक्य होत नाही. पाण्याचा हा प्रश्न डाबरे यांच्या समोरही होताच. परंतु त्यांनी शेताभोवती जलसंधारणाची कामे केली. स्व:खर्चातून त्यांनी पाणी अडविले. नाला खोलीकरण, विहीर पुनर्भरणासारखे प्रयत्न त्यांनी केले. याचेच फलीत म्हणून त्यांच्या शेतातील विहिर, बोअरवेलला पाणी आहे. याच भरवश्यावर ते शेतीत नवनवील प्रयोग करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरीagricultureशेती