शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनावर प्राणायामाची मात्रा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:36 IST

बुलडाणा : गत काही महिन्यांपासून काेराेना संक्रमण वाढत असल्याने रुग्ण संख्या माेठ्या प्रमाणात वाढत आहे़ काेराेना काळात शरीर ...

बुलडाणा : गत काही महिन्यांपासून काेराेना संक्रमण वाढत असल्याने रुग्ण संख्या माेठ्या प्रमाणात वाढत आहे़ काेराेना काळात शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी याेग, प्राणायामाचे महत्त्व वाढले आहे़

काेराेना काळात शरीर राेगमुक्त ठेवण्यासाठी अनेक जण याेगाचा आधार घेत आहेत़ प्राणायाम हा योगाचा एक भाग असून यामध्ये श्वास घेण्याच्या विविध पद्धती आहेत. प्राणायमाचा उद्देश हा शरीरातील प्राणशक्तीला उत्प्रेरित, संचारित, नियमित आणि संतुलित कऱणे हा असतो. या प्रक्रिया नासिकांद्वारे श्वास घेण्यावर अवलंबून आहेत. श्वास हा आपल्या जगण्याचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. योग्य पद्धतीने घेतलेला श्वास अनेक आजारांना दूर करताे़

काेराेना झालेल्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास हाेताे़ तसेच फुफ्फुसावर परिणाम हाेताे़ प्राणायामाचे दाेन ते तीन प्रकार नियमित केल्यास रुग्णांना अनेक आजारातून मुक्तता मिळू शकते़ काेराेना रुग्णांसाठी भस्रिका, कपालभाती आणि नाडीशाेधन प्राणायाम लाभदायक ठरत आहेत़ त्यामुळे, अनेक जण याेग करण्याकडे वळल्याचे चित्र आहे़ नियमित याेग, प्राणायाम केल्याने राेगप्रतिकारक शक्ती वाढते़ कपालभाती या प्राणायामाच्या प्रकारात उच्छ्वासाद्वारे आपल्या शरीरातील ८० टक्के विषद्रव्ये (टॉक्सिन्स) बाहेर टाकली जातात. कपालभातीच्या नियमित सरावाने आपली बुद्धी तल्लख व तीक्ष्ण होते. या प्रकारामुळे शरीरातील आंतरिक अवयवांमध्ये ऊर्जा निर्माण होते. विशेषत: मधुमेहींना याचा अधिक फायदा होऊ शकतो. भस्रिका प्राणायामात श्वास नाकावाटे आत घेऊन जलदगतीने बाहेर सोडला जातो. या प्रकारामुळे शरीरातील ऊर्जेची पातळी वाढते. तसेच शरीराला ऊर्जा मिळते तसेच नाक, घसा व सायनसमधील अडथळे दूर होतात.

नियमित प्राणायाम केल्याचे फायदे

कपालभातीच्या नियमित सरावाने आपली बुद्धी तल्लख व तीक्ष्ण होते. या प्रकारामुळे शरीरातील आंतरिक अवयवांमध्ये ऊर्जा निर्माण होते. विशेषत:मधुमेहींना याचा अधिक फायदा होऊ शकतो.

भस्रिका प्राणायामात श्वास नाकावाटे आत घेऊन जलद गतीने बाहेर सोडला जातो. या प्रकारामुळे शरीरातील ऊर्जेची पातळी वाढते, तसेच शरीराला उर्जा मिळते तसेच नाक, घसा व सायनसमधील अडथळे दूर होतात. हा प्राणायामाचा प्रकार पोटविकार, अपचन, गॅसेस या त्रासांमध्येही लाभदायक ठरू शकतो.

नाडीशोधन प्राणायामामुळे श्वसनमार्ग मोकळा होतो व रक्ताभिसरण सुधारते. या प्राणायामुळे शरीरातील ऑक्सिजन व कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण सुधारते. त्यामुळे अशुद्ध रक्ताचा निचरा होऊन शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो. तसेच शरीरातील तापमानात समतोल राखण्यास मदत होते.

नियमित याेग केल्याने राेगप्रतिकारक शक्ती वाढते़ रक्ताभिसरण सुलभ हाेते़ ताण, तणावातून मुक्ती मिळते़ ऊर्जा वाढते़ उत्तम आराेग्य आणि प्रसन्न मन याेग प्राणायामुळे लाभते़ काेराेना रुग्णांवर उपचार करण्यासाठी याेग, प्रणायामाचा उपयाेग केला जाताे़ नियमित याेग, प्राणायाम केल्याने ऑक्सिजन लेव्हल वाढते़ नैराश्य दूर हाेऊन उत्साह येताे़

अंजली परांजपे, याेग व निसर्गाेपचारतज्ज्ञ

काेराेनाच्या काळात नियमित याेग, प्राणायाम केल्यास लाभ हाेताे़ भस्रिका प्राणायाम, नाडीशोधन आणि कपालभाती आदी प्राणायाम काेराेना रुग्णांसाठी लाभदायक ठरत आहेत़ सकारात्मक जीवन जगण्यासाठी याेग, प्राणायामाचे महत्त्व आहे़

संजय नागरे, याेगपटू