‘जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा!’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:35 IST2017-08-23T00:35:17+5:302017-08-23T00:35:31+5:30
खामगाव : बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळाचे भीषण संकट पावसाअभावी निर्माण झाले आहे. त्यामुळे तातडीने सद्यस्थितीवर आधारित मुदतपूर्व दुष्काळ जाहीर करावा व विविध समस्यांच्या अनुषंगाने विनाविलंब उपाययोजना महाराष्ट्र शासनाने कराव्यात, अशा प्रकारचे निवेदन महाराष्ट्राचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांना २0 ऑगस्ट रोजी शेतकरी बचाओ आंदोलनाच्यावतीने संयोजक भाई रजनीकांत यांनी सादर केले.

‘जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा!’
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळाचे भीषण संकट पावसाअभावी निर्माण झाले आहे. त्यामुळे तातडीने सद्यस्थितीवर आधारित मुदतपूर्व दुष्काळ जाहीर करावा व विविध समस्यांच्या अनुषंगाने विनाविलंब उपाययोजना महाराष्ट्र शासनाने कराव्यात, अशा प्रकारचे निवेदन महाराष्ट्राचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांना २0 ऑगस्ट रोजी शेतकरी बचाओ आंदोलनाच्यावतीने संयोजक भाई रजनीकांत यांनी सादर केले.
यावेळी भाई रजनीकांत यांनी विविध मुद्यांचे अनुषंगाने कृषी मंत्र्यांशी चर्चा केली. पालकमंत्र्यानी शेगाव तीर्थक्षेत्रासह जिल्ह्यातील सर्व अवैध दारू बंद करण्याचीही मागणी करण्यात आली.
निवेदनात यावर्षीच्या दुष्काळामुळे वर्ष २0१७-१८ पर्यंतचे कर्ज माफ करावे व शेती व्यवसायासाठी यापुढे सरकारने स्वत: तगाई द्यावी. पुढील खरीप हंगाम २0१८-१९ ची पिके हाती येईपर्यंत दुष्काळी परिसरातील शेतकरी कुटुंबास रेशन दुकानातून आवश्यक धान्य गहू, तांदूळ, डाळ, साखर द्यावे व खर्चाकरिता किमान पाच हजार रुपये दरमहा खावटी अनुदान द्यावे. पेरणी न झालेल्या व दुबार-तिबार पेरणीची नोंद घेण्यात येऊन त्यांना २५ हजार रुपयांची भरपाई मिळावी, पिण्याच्या पाण्यासह वर्षभर गुरांना चारा व्यवस्था व्हावी तसेच मजुरांना तातडीने रोजगार हमी कामे आठ दिवसांत मंजुरी मिळेल, अशी तरतूद करण्यात यावी. जिल्हाधिकारी, तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली असणार्या व्यसनमुक्ती समित्या पालकमंत्र्यांनी त्वरित गठित कराव्यात, याबाबत शासनाने पाऊल न उचलल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनात देण्यात आला. निवेदन देताना राजेंद्र सित्रे, रत्नमाला गवई, राजेंद्र गवई, रमेश गाडेकर, देवीदास डांगे, प्रभाकर सरोदे, सचिन महाजन, डॉ.यशवंत वानखडे, अँड.वीरेंद्र झाडोकार आदी शेतकरी बचाओ आंदोलनाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.