शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बुलडाणा जिल्ह्यात अतीपावसाने जमिनी खरडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 13:31 IST

अतीपावसामुळे पैनगंगा नदीकाठावरील शेतजमीनी खरडून गेल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली असून पर्जन्यमानाच्या टक्केवारीत बुलडाणा, शेगावने शंभरी पार केली आहे. आतापर्यंत अनेक नद्यांना पूर गेला आहे. अतीपावसामुळे पैनगंगा नदीकाठावरील शेतजमीनी खरडून गेल्या आहेत.संततधार सुरू असलेल्या पावसाने पैनगंगा नदीला पूर आला आहे. तर अनेकठिकाणच्या शेतजमीनी खरडून गेल्या आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीला हुलकावणी दिलेल्या वरुणराजाने आठवड्यापासून दमदार हजेरी लावली आहे. पावसाच्या तडाख्याने जमिनी खरडल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. पाच दिवसांत पैनगंगा नदीला चौथ्यांदा पूर आल्यामुळे शेतजमिनींचे प्रचंड नुकसान झाले. नुकसानाचे पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश तलाठी व संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. बुलडाणा तालुक्यात २६ जूनच्या रात्री मुसळधार पावसाची नोंद झाली. साखळी बु.मंडळात ८३ मिमी, धाड ८१ मिमी , देऊळघाट ७३ तर म्हसला बु. मंडळात ७१ मिमी पावसाची नोंद झाली. यामुळे पैनगंगेला दुसऱ्यांदा पूर गेला. ही अतिवृष्टी व पुराचे पाणी काठावरील शेतात घुसल्याने शेतजमिनीचे प्रचंड नुकसान झाले. यामध्ये अंभोडा, उमाळी, हतेडी खुर्द, कोलवड, सागवन, दुधा, देवपूर, देऊळघाट, धाड, बोरखेड, साखळी बु., साखळी खुर्द, अंत्री तेली गाव परिसरातील शेत जमिनींचा समावेश होता. दरम्यान, २६ जुनच्या रात्री पुरात वाहून जाणाºया मारुती स्वीफ्ट कारमध्ये दोघे जण असल्याचे निष्पन्न झाले. रात्री १० वाजताच्या सुमारास प्रमोद सपकाळ व गजानन धोटे (रा. कोलवड) कार (क्रमांक एम -एच- २८ -बी- बी- १३९५) ने जात असताना त्यांची कार पुराच्या पाण्यात वाहू लागली.यावेळी उपस्थित नागरिकांनी प्रसंगावधान व धाडस दाखवत दोघांना बाहेर काढले. यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेची माहिती अविनाश सपकाळ यांनी २७ जून रोजी दुपारी १२ वाजता बुलडाणा शहर पोलिसांना दिली.

जिल्ह्यात आतापर्यंत ७३.१९ टक्के पाऊसजिल्ह्यात आतापर्यंत ७३.१९ टक्के म्हणजे पाऊस झाला आहे. एकूण पावसाची १३४७.२ मि.मी. नोंद झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक शेगाव तालुक्यात १५३.८ मि.मी. म्हणजे १२७.१७ टक्के पाऊस झाला आहे. तर बुलडाणा तालुक्यात १७०.७ मि.मी. म्हणजे १०७ टक्के पाऊस झाला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरी