शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

श्री चक्रधर स्वामींच्या महोत्सवानिमित्त दीपोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 11:05 AM

कोरोनामुळे सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम आयोजित न करता घरोघरी दिवे लावून संपूर्ण देशभर दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

- विवेक चांदूरकर लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा अष्टशताब्दी अवतारदिन महोत्सव २० आॅगस्ट रोजी साजरा करण्यात येत आहे. हा महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार होता. मात्र, कोरोनामुळे सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम आयोजित न करता घरोघरी दिवे लावून संपूर्ण देशभर दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे.अखिल जीव- जातीच्या उद्धारासाठी परब्रह्म परमेश्वर श्री चक्रधर स्वामींनी गुजरातची राजधानी भडोच येथे युवराज हरिपाळदेवाचे पतित उठवून शके ११४३ मध्ये अवतार स्वीकारला.श्री चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रात येवून अज्ञानरूपी अंधकाराने विषमतेत खितपत पडलेल्या समाजाला बंधुभावाचा, समानतेचा, मानवतेचा संदेश दिला. स्त्रियांना शिक्षणाचा अध्यात्माचा, मोक्षाचा अधिकार दिला. शुद्ध आचरणाने सर्व मानवजातीला अध्यात्माचा अधिकार दिला.खेडापाड्यात गोंड, भील्ल यांच्यात तथा समाजामध्ये जावून ब्रह्मविद्या ज्ञानाचा प्रकाश दाखविला. त्यातून महदंबेसारखी महिला मराठीची आद्य कवयित्री, म्हाईंभट्टांसारखे हजारो प्रकांडपंडित समानतेचा संदेश घेऊन समाजपरिवर्तन करू लागले. त्यांनी प्रवर्तन केलेल्या ईश्वरीय ज्ञान मार्गाला समाजाने महानुभाव नाव दिले. समाजप्रवर्तक सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींच्या अवतरणाला २० आॅगस्ट रोजी ८०० वर्षे पूर्ण होत आहेत.त्यानुषंगानेच हा अष्टशताब्दी महोत्सव २० आॅगस्ट रोजी प्रारंभ होऊन पुढील २०२१ पर्यंत भारतभर साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे २० आॅगस्ट रोजी अवतारदिनाच्या कार्यक्रमाचे वेळी सर्व संत-महंत-तपस्विनी व उपदेशी तथा अनुयायी आश्रम, तीर्थस्थान, देवपूजा, घरासमोर जास्तीत जास्त दीप लावून विडावसर, आरती करून संपूर्ण भारतात आनंद उत्सव साजरा करणार आहेत.अष्ट शताब्दी महोत्सवानिमित्त प्रत्येकाने घरात कमीत कमी आठ दिवे लावून उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे या महोत्सवाला यावर्षी महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातही नागरिक घरोघरी दीपात्सव साजरा करणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरोघरी हा उत्सव होणार आहे.

वर्षभर प्रबोधनाचे आॅनलाइन कार्यक्रमश्री चक्रधर स्वामी यांच्या अष्टशताब्दी महोत्सवाला २० आॅगस्ट २०२० पासून प्रारंभ होत आहे. पुढील एक वर्ष हा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त वर्षभर विविध प्रबोधनात्मक आॅनलाईन कार्यक्रम पार पडणार आहेत. यामध्ये चक्रधर स्वामींचे कार्य, त्यांनी जगाला दिलेला संदेश यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे.

२० आॅगस्ट रोजी महानुभाव पंथातील सर्वांनी घरोघरी दीप लावावे. तसेच आश्रम, तीर्थस्थान या ठिकाणी जास्तीत जास्त दीप लावून महोत्सव साजरा करावा.- आचार्य श्री लोणारकर मोठेबाबाअध्यक्ष, अ.भा. पंचकृष्ण प्रबोधन परिषद श्रीक्षेत्र जाळीचादेव, बुलडाणा.

 

टॅग्स :khamgaonखामगावIndian Traditionsभारतीय परंपरा