शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पेन्शन धोरणामध्ये तफावत, कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:42 IST

शासनाच्या शासकीय व निमशासकीय सेवेतून नियमित कालावधीनंतर जेव्हा कर्मचारी सेवानिवृत्त होतात, तेव्हा निवृत्तीनंतर स्वत: व परिवाराचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी निवृत्त ...

शासनाच्या शासकीय व निमशासकीय सेवेतून नियमित कालावधीनंतर जेव्हा कर्मचारी सेवानिवृत्त होतात, तेव्हा निवृत्तीनंतर स्वत: व परिवाराचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी निवृत्त कर्मचाऱ्यास मिळणाऱ्या वेतनाचा काही भाग दरमहा पेन्शन स्वरूपात दिला जातो. पेन्शन मिळण्याची संकल्पना विचारपूर्वक ब्रिटिश काळापासून सुरू करण्यात आलेली असून, आजतागायत सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसंदर्भात २००५ मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार १ नोव्हेंबर २००५ व त्यानंतर शासनाच्या शासकीय व निमशासकीय व इतर क्षेत्रात नवीन नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन परिभाषित अंशदान पेन्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दहा टक्के रक्कम कपात करण्यात येते. शासनाकडून तेवढीच रक्कम जमा करून ठराविक विमा कंपन्यांकडे बचत म्हणून जमा केली जाते. ही कपात कर्मचारी सेवा निवृत्त होईपर्यंत करण्यात येऊन कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याच्या कपात झालेल्या एकूण रकमेपैकी ६० टक्के रक्कम एकरकमी परत करण्यात येते व उर्वरित ४० टक्के रक्कम ठराविक विमा कंपनीकडे जमा करून त्यापासून मिळणारे व्याज निवृत्त कर्मचाऱ्यास दिले जाते, ज्याला पेन्शन म्हणून संबोधले जाते. पेन्शन धोरण ठरविताना जुनी व नवीन पेन्शन योजना यामधील सुवर्णमध्य काढणे अपेक्षित होते; परंतु तसे झालेले दिसत नाही.

कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष

पेन्शन धोरणातील एकूणच हा सर्व प्रकार गोंधळात टाकणारा असून, कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम व असंतोष निर्माण झालेला दिसून येत आहे. नवीन पेन्शन योजना नवनियुक्त कर्मचाऱ्यांसाठी जीवघेणी ठरत असून, शासनाकडून दोन्ही पेन्शनमधील तफावत व कर्मचाऱ्यांच्या मनातील भेदभाव दूर करणे गरजेचे आहे.

नवीन व जुनी पेन्शन यामध्ये मोठा फरक आहे. यामध्ये एक तुपाशी, तर दुसरा उपाशी अशाप्रकारे कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव निर्माण झालेला दिसून येतो. जेव्हा कर्मचारी सेवानिवृत्त होतो, तेव्हाच त्याला दोन्ही पेन्शनमधील फरक जाणवतो. हा फरक दूर करणे गरजेचे आहे.

एस. जे. इंगळे, सेवानिवृत्त सैनिक व महसूल विभाग.