शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

पेन्शन धोरणामध्ये तफावत, कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:42 IST

शासनाच्या शासकीय व निमशासकीय सेवेतून नियमित कालावधीनंतर जेव्हा कर्मचारी सेवानिवृत्त होतात, तेव्हा निवृत्तीनंतर स्वत: व परिवाराचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी निवृत्त ...

शासनाच्या शासकीय व निमशासकीय सेवेतून नियमित कालावधीनंतर जेव्हा कर्मचारी सेवानिवृत्त होतात, तेव्हा निवृत्तीनंतर स्वत: व परिवाराचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी निवृत्त कर्मचाऱ्यास मिळणाऱ्या वेतनाचा काही भाग दरमहा पेन्शन स्वरूपात दिला जातो. पेन्शन मिळण्याची संकल्पना विचारपूर्वक ब्रिटिश काळापासून सुरू करण्यात आलेली असून, आजतागायत सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसंदर्भात २००५ मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार १ नोव्हेंबर २००५ व त्यानंतर शासनाच्या शासकीय व निमशासकीय व इतर क्षेत्रात नवीन नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन परिभाषित अंशदान पेन्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दहा टक्के रक्कम कपात करण्यात येते. शासनाकडून तेवढीच रक्कम जमा करून ठराविक विमा कंपन्यांकडे बचत म्हणून जमा केली जाते. ही कपात कर्मचारी सेवा निवृत्त होईपर्यंत करण्यात येऊन कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याच्या कपात झालेल्या एकूण रकमेपैकी ६० टक्के रक्कम एकरकमी परत करण्यात येते व उर्वरित ४० टक्के रक्कम ठराविक विमा कंपनीकडे जमा करून त्यापासून मिळणारे व्याज निवृत्त कर्मचाऱ्यास दिले जाते, ज्याला पेन्शन म्हणून संबोधले जाते. पेन्शन धोरण ठरविताना जुनी व नवीन पेन्शन योजना यामधील सुवर्णमध्य काढणे अपेक्षित होते; परंतु तसे झालेले दिसत नाही.

कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष

पेन्शन धोरणातील एकूणच हा सर्व प्रकार गोंधळात टाकणारा असून, कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम व असंतोष निर्माण झालेला दिसून येत आहे. नवीन पेन्शन योजना नवनियुक्त कर्मचाऱ्यांसाठी जीवघेणी ठरत असून, शासनाकडून दोन्ही पेन्शनमधील तफावत व कर्मचाऱ्यांच्या मनातील भेदभाव दूर करणे गरजेचे आहे.

नवीन व जुनी पेन्शन यामध्ये मोठा फरक आहे. यामध्ये एक तुपाशी, तर दुसरा उपाशी अशाप्रकारे कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव निर्माण झालेला दिसून येतो. जेव्हा कर्मचारी सेवानिवृत्त होतो, तेव्हाच त्याला दोन्ही पेन्शनमधील फरक जाणवतो. हा फरक दूर करणे गरजेचे आहे.

एस. जे. इंगळे, सेवानिवृत्त सैनिक व महसूल विभाग.