‘स्वाभिमानी’च्या कार्यंकर्त्यांवरील गुन्हे रद्द करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:37 IST2021-09-26T04:37:08+5:302021-09-26T04:37:08+5:30
मेहकर तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या दुय्यम निबंधक कार्यालयातील सुनील चव्हाण, लिपिक प्रमोद पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे स्थानिक कार्यकर्ते सागर ...

‘स्वाभिमानी’च्या कार्यंकर्त्यांवरील गुन्हे रद्द करण्याची मागणी
मेहकर तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या दुय्यम निबंधक कार्यालयातील सुनील चव्हाण, लिपिक प्रमोद पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे स्थानिक कार्यकर्ते सागर कानोडजे यांच्यासह इतर दोघाजणांवर खोटे गुन्हे दाखल केले असल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी पदाधिकारी प्रामाणिकपणे लढत असतात. मात्र अशा प्रकारे खोट्या कारवाया करून कार्यकर्त्यांचे मानसिक खच्चीकरण मुजोर अधिकारी यांना पोलीस प्रशासन पाठीशी घालत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवरील दाखल केलेले गुन्हे तत्काळ रद्द करावेत, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाभर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. निवेदनावर स्वाभिमानी नेते बबन चेके, शेख जुल्फेकार, सतीश मोरे, अंबादास बुरकुल, पंढरी म्हस्के, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.