शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

संग्रामपूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नूकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 3:57 PM

शनिवारी दुपारी १ वा. पासून सोनाळा परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

संग्रामपूर :-  संग्रामपूर तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्री नंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यात महसूली पाच मंडळात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये 'कही खुशी कही गम' अशी परिस्थिती आहे. कवठळ मंडळात ६२ मी मी पावसाची नोंद झाली. पातुर्डा ५५, संग्रामपूर ६४, सोनाळा ७४ तर बावनबिर मंडळात सर्वात जास्त ८५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात एकूण ६८ मि. मि पावसाची नोंद झाली आहे. या अतिवृष्टीमुळे असंख्य शिवारात प्रचंड शेती पिकांचे नुकसान झाले आहे. लहान नद्या व नाले दुथडी भरून वाहू लागले. बहूतांश ठिकाणी पाझर तलाव भरल्याने ओव्हर फ्लो झाले. अगोदरच बोगस बियाणे मुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता. आता या पावसामुळे शेकडो हेक्टर वर पेरण्यात आलेल्या विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. असंख्य शेतकऱ्यांची शेती खरडून गेली आहे. रात्री पडलेल्या या पावसामुळे वान नदीला पहीले पूर गेले असून वानखेड व पातुर्डा या दोन गावातील वान नदीवरील पूल पाण्याखाली गेले होते. तालुक्यातील वानखेड, पातुर्डा, कवठळ, मनार्डी, वरवट बकाल, बावनबीर, संग्रामपूर, सोनाळा सह सर्वच शिवारात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने घरांचे नुकसान झाले असून बहुतांश ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. वरवट बकाल येथील बाजार समितित पाणी घुसल्याने येथे पडून असलेले शेतकऱ्यांचे शेतीमाल पूर्णपणे भिजले आहे. यात गहू, हरभरा, तूर, ज्वारी मका आदी धान्यांचा समावेश आहे. आ. डॉ. संजय कुटे यांनी संग्रामपूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. शनिवारी दुपारी १ वा. पासून सोनाळा परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरRainपाऊसagricultureशेती