शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
4
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
5
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
6
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
7
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
9
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
10
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
11
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
12
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
13
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
14
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
15
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
16
रश्मिका मंदानाला विसरा, आता ही साऊथ अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; दुप्पट केलं मानधन
17
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
18
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
19
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
20
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

सर्दी, तापाच्या रुग्णांची खासगी रुग्णालयांकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 11:57 AM

अनेक रुग्ण औरंगाबाद, अकोला, जालन्यातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोनाचे लक्षण असल्याने सर्दी, तापाच्या रुग्णांनी प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयांकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांची संख्या घटली तर दुसरीकडे खासगी रुग्णालये हाउसफुल्ल झाले आहेत. अनेक रुग्ण औरंगाबाद, अकोला, जालन्यातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. त्यामुळे, यातील पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसींग होत नसल्याने ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक झाला आहे.शहरी भागापुरता मर्यादीत असलेल्या कोरोना विषाणूचा ग्रामीण भागात शिरकाव झाला आहे. अनेक गावांमध्ये मोठ्या संख्येने पॉझिटीव्ह रुग्ण आढळत आहेत. सर्दी, खोकला आदी लक्षणे असलेले अनेक ग्रामस्थ क्वारंटीन होण्याच्या भितीने प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांएवजी खासगी रुग्णालयात उपचार करीत आहेत. त्यामुळे, कॉन्टॅक्ट ट्रेसींग होत नसल्याने समुह संसर्गाची भिती आहे. अनेक खासगी डॉक्टरही पॉझिटीव्ह येत आहेत. त्यांच्या संपर्कातील लोकांचीही माहिती मिळत नसल्याने हे रुग्ण कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र जिल्हा भरात आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार करण्यापेक्षा अनेक जण अकोला, औरंगाबाद, जालना व इतर शहरातील खासगी डॉक्टरांकडे उपचार करून घेत आहेत. असे रुग्ण पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्याविषयी माहिती स्थानिक आरोग्य विभाग आणि प्रशासनाला मिळण्यास बराच विलंब होतो. यादरम्यान त्या रुग्णांच्या संपर्कातील लोक बिनधास्तपणे फिरुन कोरोनाचे संक्रमण वाढवत आहेत.इतर जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह आलेले रुग्ण थेट १० ते १५ दिवसांनी गावाकडे परततात. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी प्रभावी उपाय म्हणून क्वारंटीन करून उपचार सुरू करणे आहे. मात्र, गामस्थ क्वारंटीन होण्याच्या भितीने सरकारी रुग्णालयांपासून दूरच राहत असल्याचे चित्र आहे. मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज २०० ते ३०० रुग्णांची तपासणी व्हायची. गत काही दिवसांपासून येथे १० ते २० रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. या परिसरातील सहा खासगी डॉक्टरही पॉझिटीव्ह आले आहेत. पॉझिटीव्ह रुग्णांची माहितीच मिळत नसल्याने कोरोना रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणाही हतबल असल्याचे चित्र आहे.सर्दी, ताप, खोकला आदी त्रास असणाऱ्या ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करावी. खासगी डॉक्टरांनीही असे रुग्ण आल्यास त्यांचे समुपदेशन करून याविषयी स्थानिक प्रशासन व आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांना माहिती द्यावी. सध्या कॉन्टॅक्ट ट्रेसींग होत नसल्याने ग्रामीण भागात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.- डॉ.किशोरकुमार बिबे,वैद्यकीय अधिकारी, डोणगाव

टॅग्स :buldhanaबुलडाणाhospitalहॉस्पिटल