शहरं
Join us  
Trending Stories
1
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
2
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
3
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
4
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
5
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
7
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
8
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
9
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
10
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
11
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
12
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
13
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
14
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
15
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
16
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
17
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
18
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
19
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
20
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल

वर्ग सुरू झाले नाही, तरी शैक्षणिक सत्र सुरू होणार -  एजाज खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 17:05 IST

र्ग सुरू झाले नाही, तरी नवे शैक्षणिक सत्र सुरू होईल, असे मत प्राथमिक शिक्षणाधिकारी एजाज खान यांनी व्यक्त केले.

- ब्रह्मानंद जाधवबुलडाणा : राज्य शासन १५ जूनपासून शाळा, महाविद्यालय सुरू करण्याच्या विचारात आहे. परंतू काही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. रुग्ण असलेल्या ठिकाणी किंवा शाळा क्वारंटीन सेंटर असेल, अशा ठिकाणी शाळा भरवणे अवघड आहे. त्यामुळे वर्ग सुरू झाले नाही, तरी नवे शैक्षणिक सत्र सुरू होईल, असे मत प्राथमिक शिक्षणाधिकारी एजाज खान यांनी व्यक्त केले. कोरोनाचे वाढते रुग्ण आणि शाळा सुरू करण्याबाबत  शिक्षणाधिकारी एजाज खान यांच्याशी साधलेला संवाद... 

शाळा सुरू करण्याबाबत प्रत्यक्षात काय स्थिती आहे?शाळा सुरू केंव्हा होणार यावर निर्णय वरिष्ठ पातळीवरुन होत आहे. परंतू ज्या ठिकाणी शाळा भरवायची त्याठिकाणचे पालक, शाळा व्यवस्थापन समिती यांनाही विश्वासात घेतले जाणार आहे. त्या गावात रुग्ण नसलीत, शाळा क्वारंटीन नसेल, तर अशा ठिकाणी शाळा भरवण्यास काहीच हरकत नाही.  

रुग्ण असलेल्या भागात नवीन सत्र कसे सुरू करणार?  ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आहेत, त्याठिकाणी वर्ग सुरू करू शकत नाहीत, अशा ठिकाणी आॅनलाइन शिक्षण प्रणालीचा वापर करू. स्थानिक केबल नेटवर्कचाही यासाठी उपयोग केला जाऊ शकतो. प्रशिक्षीत शिक्षकांचे व्हिडीओ पालकांच्या मोबाईलवर पाठवून ते विद्यार्थ्यांना दाखवून दिल्या जातील. त्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.    

ग्रामीण भगाात आॅनलाइन शिक्षणासाठी अडचणी येऊ शकतात का? ग्रामीण भागातील पालकांकडे स्मार्ट फोन असण्याची शक्यता कमी आहे. त्याची माहिती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्याच्याकडे मोबाईल नाही, त्या विद्यार्थ्याला मोबाईल असलेल्या विद्यार्थ्यासोबत बसविता येईल. गर्दी न होता एका मोबाईलवर दोन विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात. अशाप्रकारे ९० टक्के विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहचू शकतो.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काय नियोजन आहे? ज्या गावातील शाळा सुरू होतील, अशा ठिकाणी विद्यार्थ्यांच्या अरोग्याची सुरक्षा घेण्याच्या अनुषंगाने नियोजन केलेले आहे. त्या शाळेत विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही, यासाठी विद्यार्थ्यांना विषम संख्येप्रमाणे शाळेत बोलाविण्यात येईल. तसे विद्यार्थ्यांना नंबर दिलेले आहेत. विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दोन सत्रात शाळा घेण्यात येईल. शाळा सॅनिटाईज करून वापरणे, शाळेत मुलांना तीन वेळा हात धुण्यासाठी साबन, सॅनिटायझर ठेवण्यात येईल.

लॉकडाउनमध्ये आॅनलाइन अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यापूर्वी क्वारंटीन असलेल्या शाळा आता निर्जंतुकीकरण करून वापरण्यात येतील. त्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, पालकांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाinterviewमुलाखतEducationशिक्षणSchoolशाळाStudentविद्यार्थी