शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

वर्ग सुरू झाले नाही, तरी शैक्षणिक सत्र सुरू होणार -  एजाज खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 17:05 IST

र्ग सुरू झाले नाही, तरी नवे शैक्षणिक सत्र सुरू होईल, असे मत प्राथमिक शिक्षणाधिकारी एजाज खान यांनी व्यक्त केले.

- ब्रह्मानंद जाधवबुलडाणा : राज्य शासन १५ जूनपासून शाळा, महाविद्यालय सुरू करण्याच्या विचारात आहे. परंतू काही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. रुग्ण असलेल्या ठिकाणी किंवा शाळा क्वारंटीन सेंटर असेल, अशा ठिकाणी शाळा भरवणे अवघड आहे. त्यामुळे वर्ग सुरू झाले नाही, तरी नवे शैक्षणिक सत्र सुरू होईल, असे मत प्राथमिक शिक्षणाधिकारी एजाज खान यांनी व्यक्त केले. कोरोनाचे वाढते रुग्ण आणि शाळा सुरू करण्याबाबत  शिक्षणाधिकारी एजाज खान यांच्याशी साधलेला संवाद... 

शाळा सुरू करण्याबाबत प्रत्यक्षात काय स्थिती आहे?शाळा सुरू केंव्हा होणार यावर निर्णय वरिष्ठ पातळीवरुन होत आहे. परंतू ज्या ठिकाणी शाळा भरवायची त्याठिकाणचे पालक, शाळा व्यवस्थापन समिती यांनाही विश्वासात घेतले जाणार आहे. त्या गावात रुग्ण नसलीत, शाळा क्वारंटीन नसेल, तर अशा ठिकाणी शाळा भरवण्यास काहीच हरकत नाही.  

रुग्ण असलेल्या भागात नवीन सत्र कसे सुरू करणार?  ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आहेत, त्याठिकाणी वर्ग सुरू करू शकत नाहीत, अशा ठिकाणी आॅनलाइन शिक्षण प्रणालीचा वापर करू. स्थानिक केबल नेटवर्कचाही यासाठी उपयोग केला जाऊ शकतो. प्रशिक्षीत शिक्षकांचे व्हिडीओ पालकांच्या मोबाईलवर पाठवून ते विद्यार्थ्यांना दाखवून दिल्या जातील. त्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.    

ग्रामीण भगाात आॅनलाइन शिक्षणासाठी अडचणी येऊ शकतात का? ग्रामीण भागातील पालकांकडे स्मार्ट फोन असण्याची शक्यता कमी आहे. त्याची माहिती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्याच्याकडे मोबाईल नाही, त्या विद्यार्थ्याला मोबाईल असलेल्या विद्यार्थ्यासोबत बसविता येईल. गर्दी न होता एका मोबाईलवर दोन विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात. अशाप्रकारे ९० टक्के विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहचू शकतो.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काय नियोजन आहे? ज्या गावातील शाळा सुरू होतील, अशा ठिकाणी विद्यार्थ्यांच्या अरोग्याची सुरक्षा घेण्याच्या अनुषंगाने नियोजन केलेले आहे. त्या शाळेत विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही, यासाठी विद्यार्थ्यांना विषम संख्येप्रमाणे शाळेत बोलाविण्यात येईल. तसे विद्यार्थ्यांना नंबर दिलेले आहेत. विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दोन सत्रात शाळा घेण्यात येईल. शाळा सॅनिटाईज करून वापरणे, शाळेत मुलांना तीन वेळा हात धुण्यासाठी साबन, सॅनिटायझर ठेवण्यात येईल.

लॉकडाउनमध्ये आॅनलाइन अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यापूर्वी क्वारंटीन असलेल्या शाळा आता निर्जंतुकीकरण करून वापरण्यात येतील. त्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, पालकांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाinterviewमुलाखतEducationशिक्षणSchoolशाळाStudentविद्यार्थी