शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
2
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
3
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
4
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
5
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
6
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
7
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
8
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
9
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
10
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
11
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
12
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
13
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
14
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
15
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
16
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
17
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
18
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
19
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
20
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात

चिमुकल्यांचा सुटीचा मूड कायम; अभ्यासाचाच पडला विसर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:22 IST

शाळेत प्रत्यक्ष दिले जात असलेले शिक्षण प्रभावी असल्याने दुसऱ्या वर्गापासूनच मुलांना उजळणी मुखोद्गत होऊ लागली; परंतु आता शाळेपासून दुरावलेल्या ...

शाळेत प्रत्यक्ष दिले जात असलेले शिक्षण प्रभावी असल्याने दुसऱ्या वर्गापासूनच मुलांना उजळणी मुखोद्गत होऊ लागली; परंतु आता शाळेपासून दुरावलेल्या मुलांना जोडशब्दांचे वाचन करणे कठीण जाऊ लागले आहे. इयत्ता पाचवीच्या मुलांना भागाकार व गुणाकार कसा करायचा, याचा विसर पडला आहे. गेल्यावर्षी जून महिन्यात शाळेकडून पाठ्यपुस्तकांचे वाटप झाले; परंतु कोणत्याही विषयाच्या पुस्तकाचे पान उघडून न पाहणाऱ्या मुलांना यंदा कोणते धडे अभ्यासासाठी आहेत, हेसुद्धा माहीत नाही.

पालकांनी घरातच घ्यावी शाळा...

कोरोनामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइनचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे पालकांनी पाल्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज आहे.

विद्यार्थ्यांची अक्षर ओळख होण्यासाठी पालकांनी पाल्यांकडून नियमित काही पाने शुद्धलेखनाचा सराव करून घेणे आवश्यक आहे.

केवळ ऑनलाइनच्या भरवशावर न राहता स्वत: पाल्यांच्या दैनंदिन अभ्यासाकडे लक्ष द्यावे, घरातच काळजी घेऊन मूल्यांकन करणेही गरजेचे आहे.

मुलांना अक्षरओळख होईना!

दीड वर्षापासून केवळ मोबाइलचा उपयोग करून ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. लिहिण्याची सवय नसल्याने विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर बिघडत आहे.

लिहिण्याची गती मंदावली असून, अक्षरओळखही कठीण झाली आहे. पालकवर्गही लक्ष द्यायला तयार नाही. पहिली - दुसरीच्या विद्यार्थ्यांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. ऑनलाइन शिक्षणाचा फारसा परिणाम दिसत नाही.

अभ्यास टाळण्यासाठी कारणे अनेक

कोरोना काळात विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत आहेत. मोबाइल आणि टीव्हीच्या सभोवताल त्यांचा दिवस राहतो.

ऑनलाइन शिक्षणात फारसा रस नसल्याने अनेकांचे मन एकाग्र राहत नाही. यामुळे अभ्यास करण्याची इच्छा नसते.

यामुळे चिमुकले अभ्यास टाळण्यासाठी विविध कारणे सांगत आहेत. त्यामुळे पालकांची डोकेदुखी वाढली आहे.

वारंवार सांगूनही अनेकांचे पाल्य ऐकत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. याचे विविध परिणामही समोर येत आहेत.

चिमुकल्यांना दैनंदिन अभ्यासाचा विसर पडत चालला आहे. पालकांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

पालकांची अडचण वेगळीच

शाळेमध्ये गेल्यानंतर दिवसभर मुले व्यस्त राहत होती. त्यानंतर घरी अभ्यास व नंतर शिकवणी वर्गात जात होते. मात्र, आता ऑनलाइन शिक्षणामुळे त्यांच्याच हाती मोबाइल असतो. क्लासनंतर मोबाइलमध्ये गेम, कार्टून पाहणे यात जास्त वेळ जात आहे.

- संजय केशवराव देशमुख.

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे हसत - खेळत होणारे शिक्षण बंद झाले. ऑनलाइनमुळे अडचणी वाढल्या आहेत. केवळ मोबाइलच्या भोवती शिक्षण सुरू आहे. त्यामुळे अभ्यासातही मन लागत नसल्याचे दिसून येत आहे.

- भगवान मनोहर कंकाळ.