शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
3
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
4
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
5
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
6
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
7
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
8
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
9
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
10
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
11
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
12
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
13
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
14
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
15
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
16
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
17
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
18
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
19
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
20
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान

कॅन्सरच नव्हे तर कोणत्याही आजारात सकारात्मक दृष्टीकोन आवश्यक -  डॉ. अविनाश सावजी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 13:33 IST

‘कॅन्सर’ हा आजार झाला म्हणजे सर्वकाही संपले! असा अर्थ कुणीही लावू नये, असा मौलिक सल्ला अमरावती येथील ‘प्रयास’संस्थेचे संस्थापक डॉ. अविनाश सावजी यांनी दिला.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : ‘कॅन्सर’ या आजाराला जगातील महाभयंकर आजारात गणले जाते. पंरतु, कॅन्सरच नव्हे तर कोणत्याही आजाराला सकारात्मक दृष्टीकोन आणि भावनेने सामोरे गेल्यास, आजार बरा होण्यास बळ मिळते. शरीराच्या कॅन्सरपेक्षा मनाचा कॅन्सर सर्वात घातक असून, तो दूर झाला पाहिजे. ‘कॅन्सर’ हा आजार झाला म्हणजे सर्वकाही संपले! असा अर्थ कुणीही लावू नये, असा मौलिक सल्ला अमरावती येथील ‘प्रयास’संस्थेचे संस्थापक डॉ. अविनाश सावजी यांनी दिला. ‘कॅन्सर’ प्रबोधन यात्रेसाठी ते खामगावात आले असता त्यांनी ‘लोकमत’शी मनमोकळा संवाद साधला. 

‘कॅन्सर’या गंभीर आजाराच्या क्षेत्रातील समाजकार्याला सुरूवात कशी झाली?-  ‘जीवन शैली आणि आरोग्य’ हा विषय आपल्या आवडीचा राहीला आहे. हार्ट अ‍ॅटक, ब्लडप्रेशर आणि इतर आजारामध्ये आहार, विहार कसा असावा? याबाबत मार्गदर्शन करतानाच आचार-विचाराबाबतही समुपदेशन करायला सुरूवात केली. गेल्या ३५ वर्षांच्या सेवाकार्यात लोक जुळत गेले. त्यानंतर गेल्या पाच वर्षांपासून ‘कॅन्सर’या भंयकर आजाराच्या क्षेत्रात सामाजिक कार्य सुरू केले आहे. 

 ‘कॅन्सर’ग्रस्ताला आधार देण्यासाठी आपले प्राधान्य कशाला?- कॅन्सर या आजाराच्या रुग्णाला  सर्जरी, केमो आणि रेडिओ थेरपी या तीन प्रमुख तांत्रिक बाबीसह मानसिक आणि सामाजिक आधाराची गरज भासते. यामध्ये तांत्रिक बाबी वगळता मानसिक आधार आणि जीवन शैली आणि आरोग्यबाबत सकारात्मक समुपदेशन आणि   सकारात्मक दृष्टीकोन देण्यासाठी आपले प्राधान्य आहे.

‘कॅन्सर’ या आजारा विरोधात लढा देण्यासाठी उपाययोजनांबाबत काय सांगाल?- ‘कॅन्सर’सारख्या गंभीर आजारा विरोधात लढण्यासाठी राज्यस्तरीय नेटवर्क तयार करण्याचे आपले प्रयत्न आहेत. यासाठी अमरावती येथे गेल्यावर्षी राज्यातील २० जिल्ह्यातील कॅन्सर ग्रस्तांचा मेळावा आयोजित करण्यात आला. यावर्षी अहमद नगर ते  अमरावती ‘कॅन्सर’प्रबोधन यात्रा काढण्यात आली. तसेच पुणे येथे देखील याचवर्षी कॅन्सर कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या प्रशिक्षण शिबिराला राज्यातील सर्वच जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. राज्यस्तरीय नेटवर्कच्या माध्यमातून कॅन्सर रूग्णांसमोर पुस्तक आणि उदाहणांसह सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याचे आपले प्रामाणिक प्रयत्न आहेत.

  कॅन्सर आणि इतर आजारांमध्ये शासकीय उपाययोजनाबाबत अपेक्षा काय?- कॅन्सरवर मात करण्यासाठी शासनाने कॅन्सर आजारातून बरे झालेल्यांना रुग्ण समुपदेशनाचे काम द्यावे. म्हणजे, त्यांच्या अनुभवाचा फायदा समाजातील कॅन्सरग्रस्त रुग्णांना हमखास होईल. कॅन्सर सोबतच इतर गंभीर आजारांमध्येही याच पध्दतीचा शासन स्तरावरून प्रयत्न होणे गरजेचे आहे. विविध आजार आणि नैराश्यातून समाजाला बाहेर काढण्यासाठी ‘आहार-विहार, आचार आणि विचार’ या चतुसुत्रींकडे शासन स्तरावरून प्रयत्न केले जाणे आवश्यक असल्याचेही डॉ. अविनाश सावजी म्हणाले.

टॅग्स :khamgaonखामगावcancerकर्करोगinterviewमुलाखत