शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्सरच नव्हे तर कोणत्याही आजारात सकारात्मक दृष्टीकोन आवश्यक -  डॉ. अविनाश सावजी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 13:33 IST

‘कॅन्सर’ हा आजार झाला म्हणजे सर्वकाही संपले! असा अर्थ कुणीही लावू नये, असा मौलिक सल्ला अमरावती येथील ‘प्रयास’संस्थेचे संस्थापक डॉ. अविनाश सावजी यांनी दिला.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : ‘कॅन्सर’ या आजाराला जगातील महाभयंकर आजारात गणले जाते. पंरतु, कॅन्सरच नव्हे तर कोणत्याही आजाराला सकारात्मक दृष्टीकोन आणि भावनेने सामोरे गेल्यास, आजार बरा होण्यास बळ मिळते. शरीराच्या कॅन्सरपेक्षा मनाचा कॅन्सर सर्वात घातक असून, तो दूर झाला पाहिजे. ‘कॅन्सर’ हा आजार झाला म्हणजे सर्वकाही संपले! असा अर्थ कुणीही लावू नये, असा मौलिक सल्ला अमरावती येथील ‘प्रयास’संस्थेचे संस्थापक डॉ. अविनाश सावजी यांनी दिला. ‘कॅन्सर’ प्रबोधन यात्रेसाठी ते खामगावात आले असता त्यांनी ‘लोकमत’शी मनमोकळा संवाद साधला. 

‘कॅन्सर’या गंभीर आजाराच्या क्षेत्रातील समाजकार्याला सुरूवात कशी झाली?-  ‘जीवन शैली आणि आरोग्य’ हा विषय आपल्या आवडीचा राहीला आहे. हार्ट अ‍ॅटक, ब्लडप्रेशर आणि इतर आजारामध्ये आहार, विहार कसा असावा? याबाबत मार्गदर्शन करतानाच आचार-विचाराबाबतही समुपदेशन करायला सुरूवात केली. गेल्या ३५ वर्षांच्या सेवाकार्यात लोक जुळत गेले. त्यानंतर गेल्या पाच वर्षांपासून ‘कॅन्सर’या भंयकर आजाराच्या क्षेत्रात सामाजिक कार्य सुरू केले आहे. 

 ‘कॅन्सर’ग्रस्ताला आधार देण्यासाठी आपले प्राधान्य कशाला?- कॅन्सर या आजाराच्या रुग्णाला  सर्जरी, केमो आणि रेडिओ थेरपी या तीन प्रमुख तांत्रिक बाबीसह मानसिक आणि सामाजिक आधाराची गरज भासते. यामध्ये तांत्रिक बाबी वगळता मानसिक आधार आणि जीवन शैली आणि आरोग्यबाबत सकारात्मक समुपदेशन आणि   सकारात्मक दृष्टीकोन देण्यासाठी आपले प्राधान्य आहे.

‘कॅन्सर’ या आजारा विरोधात लढा देण्यासाठी उपाययोजनांबाबत काय सांगाल?- ‘कॅन्सर’सारख्या गंभीर आजारा विरोधात लढण्यासाठी राज्यस्तरीय नेटवर्क तयार करण्याचे आपले प्रयत्न आहेत. यासाठी अमरावती येथे गेल्यावर्षी राज्यातील २० जिल्ह्यातील कॅन्सर ग्रस्तांचा मेळावा आयोजित करण्यात आला. यावर्षी अहमद नगर ते  अमरावती ‘कॅन्सर’प्रबोधन यात्रा काढण्यात आली. तसेच पुणे येथे देखील याचवर्षी कॅन्सर कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या प्रशिक्षण शिबिराला राज्यातील सर्वच जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. राज्यस्तरीय नेटवर्कच्या माध्यमातून कॅन्सर रूग्णांसमोर पुस्तक आणि उदाहणांसह सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याचे आपले प्रामाणिक प्रयत्न आहेत.

  कॅन्सर आणि इतर आजारांमध्ये शासकीय उपाययोजनाबाबत अपेक्षा काय?- कॅन्सरवर मात करण्यासाठी शासनाने कॅन्सर आजारातून बरे झालेल्यांना रुग्ण समुपदेशनाचे काम द्यावे. म्हणजे, त्यांच्या अनुभवाचा फायदा समाजातील कॅन्सरग्रस्त रुग्णांना हमखास होईल. कॅन्सर सोबतच इतर गंभीर आजारांमध्येही याच पध्दतीचा शासन स्तरावरून प्रयत्न होणे गरजेचे आहे. विविध आजार आणि नैराश्यातून समाजाला बाहेर काढण्यासाठी ‘आहार-विहार, आचार आणि विचार’ या चतुसुत्रींकडे शासन स्तरावरून प्रयत्न केले जाणे आवश्यक असल्याचेही डॉ. अविनाश सावजी म्हणाले.

टॅग्स :khamgaonखामगावcancerकर्करोगinterviewमुलाखत