शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
5
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
6
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
7
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
8
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
9
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
10
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
11
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
12
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
13
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
14
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
15
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
16
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
17
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
18
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
19
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
20
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते

‘सीएए’ देशहिताचा; काही पुढाऱ्यांनी देशाला गैरसमजाच्या विद्यापीठात उभं केलंयः डॉ. उदय निरगुडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 18:25 IST

ज्येष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते उदय निरगुडकर यांच्याशी खामगाव येथे साधलेला संवाद...

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : महासत्ता ही त्याग, दूरदृष्टी आणि कठोर पावलांनीच बनते. राष्ट्रचेतना टिकविण्यासाठी ‘सीएए’  भारतीय नागरिकत्व कायद्याची आवश्यकता आहे. हा कायदा कुणाच्याही विरोधात नाही. त्यामुळे या विरोधात कुणीही आगडोंब उठविण्याचे काहीही एक कारण नसावे. कारण लोकशाही मार्गाने विरोध करण्याचा अधिकार सर्व समान आहे. ज्येष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते उदय निरगुडकर यांच्याशी खामगाव येथे साधलेला संवाद...

 ‘सीएए’ भारतीय नागरिकत्व कायद्याला विरोध योग्य आहे का?संसदेने बहुमताने पारीत केलेल्या कायद्याला विरोध करणे अजिबात चुकीचं आहे. कायद्याला विरोध करून कोणत्या लोकशाही मुल्यांची जपणूक केली जात आहे? विरोध करताना केल्या जाणाऱ्या निदर्शनात हातात तिरंगा राष्ट्रध्वज घेत, त्याच देशाच्या संसदेने पारीत केलेला कायद्याला विरोध केला जात आहे. या कायद्याला विरोध करून काही राजकीय पुढाऱ्यांनी  संपूर्ण देशाला गैरसमजाच्या विद्यापीठात उभं केलं आहे.

‘सीएए’ लागू करण्यास काही राज्यांचा विरोध आहे?‘सीएए’लागू करण्यास काही राज्यांचा होणारा विरोध साफ चूक आहे.राज्ये केंद्राच्या विषयाला विरोध करूच शकत नाही. कारण नागरिकत्व हा केंद्राचा अधिकार आहे. राज्याचा नाही. मात्र, राजकारण म्हणून या कायद्याला विरोध केल्या जात आहे. देशात अस्थिर वातावरण निर्माण केलं जातेय. ही दुर्दैवी बाब आहे.  या कायद्यामुळे देशातील मुस्लिमांना कोणताही धोका नाही. याउलट निर्वासीत म्हणून जगत असलेल्यांना नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा आहे.

 जेएनयू विद्यापीठाबद्दल आपले मत काय?जेएनयू विद्यापीठात एकीकडे अराजकता माजविणारे विद्यार्थी तयार होतात. तर दुसरीकडे जागतिक स्तरावर चमकणारे विद्यार्थी तयार होतात. अशा विद्यापीठांना प्रत्युत्तर देण्यासाठी दर्जेदार विद्यापीठ उभे करणे काळाची गरज आहे.

देश भारतीय नागरीकत्व दुरूस्ती कायदा (सीएए)वर अशांत होण्याची बीजं फाळणीमध्ये पेरली गेली आहेत. मात्र, हजारोवर्षांचा इतिहास असलेला हा देश विविध आक्रमणानंतरही शाबूत राहीला. त्यामुळे हा देश फार काळ अशांत राहू शकणार नाही. सर्व विचार या विशाल भारतीय विचारधारेने स्वीकारले आहेत.

‘सीएए’कायद्यात कोणाचेही अधिकार हिरावून घेण्याची तरतूद आहे का ?अजिबात नाही, केंद्र शासनाने लागू केलेला भारतीय नागरिकत्व दुरूस्ती कायदा सन १९५५ च्या कायद्यातील संशोधन आहे. या संशोधनातून भारतीय नागरिकता अधिनियम १९५५ कलम २,६,७ आणि १८, पारपत्र अधिनियम १९२० कलम ३ आणि विदेशी नागरिक कायदा १९४६ या जुन्या कायद्यातील कोणतीही कलम रद्द करण्यात आलेली नाही. तर केवळ नवीन कलम जोडण्यात आले आहे. भारतातील कोणत्याही नागरिकाचा यामुळे अधिकार हिरावल्या जाणार नाही. तर संरक्षण देण्यासाठीच हा सुधारीत ‘सीएए’कायदा उपयुक्त ठरणार आहे.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBJPभाजपाcongressकाँग्रेसjnu - jawaharlal nehru universityजेएनयू