शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

कांदा बीजोत्पादकांच्या मानगुटीवर पुन्हा ‘अवकाळी’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 11:38 IST

Onion seed growers hit by unseasonal rain २० मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले.

- सुधीर चेके पाटील  लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : सतत नुकसान, दुबार पेरणी, अशा संकटामुळे दुष्काळाच्या पांघरुणाखाली दबत चाललेल्या शेतकऱ्यांना सोयाबीन, तूर, कापूस या प्रमुख पिकांनी पुरते गारद केले.  आता कांदा पीक तरी आशावादी चित्र घेऊन येईल, या आशेवर शेतकरी होता; परंतु १८ , १९ आणि २० मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले. सोसाट्याचा वारा, पाऊस आणि गारपीटीने कांद्याचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे.चिखली तालुक्यात जवळपास तीन दिवस अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीमुळे उशिरा पेरणी झालेल्या गहू, हरभरा, मका, आंबा, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. प्रामुख्याने याचा जबर तडाखा कांदा पिकाला बसला. तालुक्यातील सुमारे २ हजार ५०० हेक्टरावर यंदा कांद्याची लागवड झालेली आहे. यामध्ये ४३० हेक्टरावर खाण्यासाठीचा, तर उर्वरित कांद्याचे पीक हे बियाण्यासाठी लागवड केलेला आहे. कांदा बीजोत्पादनाचे पीक सर्वांत नाजूक पीक आहे. यास सोसाट्याचा वारा देखील सहन होत नाही. अशा स्थितीत गारपिटीचा तडाखा बसल्याने ऐन बहारात असलेले पीक शेतकऱ्यांपासून हिरावले गेले. निसर्गाच्या अवकृपेने पूर्वीच खरिपासह रब्बी हंगामातील पिकांनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. हातातोंडाशी आलेला कांदा तरी काही आशा घेऊन येईल, अशी आस होती; पण त्यावरही अवकाळी पावसाने पाणी फेरले. कांदा बियाणे पिकाचा शासनाच्या मदत यादीत समावेश होण्याचा मुद्दा त्यामुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला.कांदा बियाणे पिकाचा शासनाच्या अधिकृत यादीमध्ये समावेश नसल्याने या पिकाला कोणताही हमीभाव ठरवून दिल्या जात नाही. नैसर्गिक आपत्तीत मदत मिळत नाही. पीकविम्यातही समावेश नाही. या पिकाला शासनाने संरक्षण द्यावे, ही मागणी १८ वर्षांपासून प्रलंबित आहे. मध्यंतरी केवळ एकदा कांदा बियाणे पिकाला शासनाच्या मदत यादीतील समावेशासाठी तत्त्वत: मान्यता मिळाली. मात्र, पुढे ती बाब पुन्हा लालफितशाहीत अडकली. 

‘हायरिस्क’ असतानाही पीकविम्यात समावेश नाहीकांदा बीजोत्पादनात चिखली तालुका आशिया खंडात सर्वांत पुढे होता. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत असल्याने आता कांदा बीजोत्पादनाचे प्रमाण कमालीचे घसरले आहे.  सातत्याने अवकाळी पावसामुळे नकुसान हे समीकरण ठरलेलेच. त्यामुळे विम्याचे कवच या पिकास प्राधान्याने देणे गरजेचे आहे. 

अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या कांद्याला जबर फटका बसल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांची होणारी आर्थिक कोंडी पाहता नुकसानभरपाई द्यावी.                  - सुभाष खेडेकर, कांदा बीजोत्पादक, अंत्री खेडेकर

गेल्या अधिवेशनात हा प्रश्न लावून धरला होता; परंतु आघाडी सरकारला शेतकरी हिताशी काहीच देणेघेणे नसल्याचे दिसून आले. असे असले तरी कांदा बीजोत्पादक शेतकऱ्यांचा जोपर्यंत शासनाच्या मदत यादीत समावेश होत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही.- श्वेता महाले, आमदार, चिखली 

टॅग्स :buldhanaबुलडाणाChikhliचिखलीagricultureशेतीFarmerशेतकरी