शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

बुलडाणा : विकतच्या पाण्यासाठीही रांगा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 14:38 IST

सध्या विकतच्या पाण्यासाठीही महिलांना रांगा लावाव्या लागत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : तालुक्यात दिवसेंदिवस पाणीटंचाईची दाहकता वाढतच आहे. देऊळघाट येथे पाणी पुरवठा करणारी येळगाव येथील विहीर अटली असून त्याचे खोलीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे येथे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सध्या विकतच्या पाण्यासाठीही महिलांना रांगा लावाव्या लागत आहेत.जनतेला पाणी भेटावे म्हणून ग्राम पंचायतने सरकारी टँकर सुरु करण्यासाठी प्रस्ताव तयार केला; पण अधिग्रहणसाठी विहिरच भेटत नसल्याने जनतेला अजुन पणी टंचाईला किती दिवस समोर जावावे लागणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे. २४ ते २५ हजार लोकसंख्या असलेल्या देऊळघाटला दरवर्षी भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. कायम स्वरूपी नळ योजना नसल्याने दुर शेतातून किंवा मिळेल तेथून पाणी विकत घ्यावे लागते. मागील वर्षी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रयत्नाने नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर झाली व त्यामुळे येळगाव धरणाच्या बुडित क्षेत्रात नवीन विहीर खोदुन नवीन पाइपलाइन टाकण्यात आली. गावात तीन ठिकाणी सामूहिक नळ लावण्यात आले. त्या नळावरुण लोक पाणी घ्यायचे. मागील १५ दिवस अगोदर या विहिरीतले पाणी अटले म्हणून त्याचे खोलिकरणचे काम ग्राम पंचायतच्या वतीने सुरु करण्यात आले.इतर कोणतेही जलस्रोत नसल्याने गावात भीषण टंचाई निर्माण झाली व ती बघून शासना कडून टँकरची मागणी करण्यासाठी ग्राम पंचायतने प्रस्ताव तयार केला आहे. सोबत ज्या विहिरितून पाणी आणायचे त्या विहीर मालकाचा सात बारा प्रस्ताव सोबत जोडावा लागतो त्या करिता सरपंच गजनफर खान यांनी तालुक्यातील बरेच विहीर शोधले पण पाणी नसल्याने एकही विहीर पाणी पुरवठ्यासाठी अधिग्रहित करण्यासाठी भेटली नाही. येळगाव धरणातील विहिरीचे खोलीकरणचे काम सुरु असल्याने जनतेला पाणी उपलब्ध व्हावे म्हणून अधिग्रहण साठी विहीर शोधत असल्याची माहिती देऊळघाट येथील सरपंच गजनफर खान यांनी दिली.उंद्री येथे टँकर बंद उपोषणाचा इशाराअमडापूर: उंद्री येथे सुरू असलेले टँकर बंद केल्याने गावकऱ्यांवर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. पाणीटंचाईची समस्या सोडवण्यासाठी सरपंच प्रदीप अंभोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे उपोषणाचा इशारा दिला. उंद्री गावास पाणी पुरवठा करण्यासाठी विहीर बोरवेल अधिग्रहण करण्यात यावे, टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा करण्यात यावा, गावासाठी कायम स्वरूपी पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन पाइपलाईन मंजूर करावी, अशी मागणी सरंपच प्रदीप अंभोरे यांनी केली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाwater scarcityपाणी टंचाई