शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

बुलडाणा जिल्ह्यात बाजार समित्यांमधील आवक ४६ टक्क्यांनी घटली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 15:38 IST

प्रामुख्याने या कालावधीत बाजार समित्यांमध्ये ज्वारी, बाजारी, गहू, उडीद, मुंग, तूर, मका, सोयाबीन या धान्याची आवक होत असते.

- नीलेश जोशी  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: अवघ्या ११ दिवसात परतीच्या पावसाने फटका दिल्याने यंदा खरीप हंगामाला मोठा फटका बसला असून आॅक्टोबर २०१८ च्या तुलनेत आॅक्टोबर २०१९ मध्ये बाजार समित्यांमध्ये तब्बल ४६ टक्क्यांनी धान्याची आवक घडल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. दरम्यान, आर्थिकस्तरावर त्याचे मुल्यमापन केले असता ८१ कोटी ९१ लाख आठ हजार २६२ रुपयांपर्यंतची उलाढाल संपलेल्या आॅक्टोबर महिन्यात कमी झाली आहे.परिणामी परतीच्या पावसाने खरीपाच्या झालेल्या नुकसानाचे दृश्य परिणाम आता समोर येण्यास प्रारंभ झाला आहे नोव्हेंबर अखेर याची तीव्रता अधिक जाणवण्याची भीती व्यक्त होत आहे. २०१४ मध्येही अवर्षण प्रवण स्थितीमुळे बाजार समित्यांमध्ये अवघा ३४ टक्केच माल आला होता. त्याच्याशीच साधर्म्य यंदाची स्थिती दाखवत आहे. मात्र प्रत्यक्ष नुकसानाचे आकलन होण्यासाठी अद्यापही काही कालावधी जावू द्यावा लागेल असे जाणकारांचे मत आहे.जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीच्या १०३ टक्के पाऊस पडला होता. ही परिस्थिती तशी साधारण होती. मात्र आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यात सरासरी ९ दिवस परतीचा तथा अवकाळी पाऊस पडल्याने तयार झालेला शेतमालही घरात आणण्याची संधी शेतकऱ्यांना मिळाली नाही आणि खरीपाचे जिल्ह्यात ७९ टक्के नुकसान झाल्याचे सात नोव्हेंबर रोजीच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले.त्या पृष्ठभूमीवर २०१८ आणि २०१९ मधील आॅक्टोबर महिन्यात १३ ही बाजार समित्यांमध्ये झालेल्या धान्याची आवकेची तुलना करता उपरोक्त बाब स्पष्ट झाली आहे. त्यामुळे खरीपामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे समोर येत असून येत्या काळात त्याची व्याप्तीही वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रामुख्याने या कालावधीत बाजार समित्यांमध्ये ज्वारी, बाजारी, गहू, उडीद, मुंग, तूर, मका, सोयाबीन या धान्याची आवक होत असते. मात्री ही आवकच २०१९ मधील आॅक्टोबर महिन्यात घटल्याचे चित्र आहे.विशेष म्हणजे गतवर्षी अवर्षणाची स्थिती असल्याने मुळातच बाजार समित्यांमध्ये धान्याची आवक घटलेली होती. त्या आवकेच्या तुलनेतही यंदा बाजार समित्यामध्ये ४६ टक्क्यांनी आवक घटल्याचे निदर्शनास येत आहे. यावरून २०१९ मध्ये परतीच्या व अवकाळी पावसामुळे किती नुकसान केले आहे, याचा अंदाज यावा. विशेष म्हणजे आॅक्टोबर २०१९ मध्ये साधारणत: पडणाºया ४४.८४ मिमी पावसाच्या तुलनेत परतीचा व अवकाली पाऊस मिळून तब्बल १००.२२ मिमी पाऊस पडला. जो की आॅक्टोबर महिन्याच्या सरासरीशी तुलना करता तब्बल २२३.५१ टक्के आहे. आणि हाच पाऊस खरीपाचे होत्याचे नव्हते करण्यास खºया अर्थाने कारणीभूत ठरला असावा अशी चर्चा आता प्रशासकीय वर्तुळात सुरू आहे.दरम्यान, आता नोव्हेंबरमध्ये बाजार समित्यांमध्ये प्रत्यक्षात धान्याची किती आवक होते व त्याची प्रतवारी नेमकी काय राहते यावर खरीपाच्या झालेल्या नुकसानाचा काही प्रमाणात अंदाज निघू शकतो.

२०१४ मध्ये ६६ टक्क्यांनी घटली होती आवकजिल्यात २०१४ मध्ये अवर्षणसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी संपूर्ण वर्षाच्या शेतमालाच्या आवकेची तुलना केली असता तब्बल ६६ टक्क्यांनी शेतमालाची बाजार समित्यांमध्ये आवक घटली होती. त्यावेळी २०१३ मध्ये ५५ लाख ९७ हजार ७२० क्विंटल आवक झाली होती तर २०१४ मध्ये १८ लाख ७७ हजार ७२० क्विंटल ऐवढी आवक झाली होती. जवळपास ६६.३६ टक्क्यांनी ही आवक घटली होती. दरम्यान, जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील आगमा काळात नेमकी किती आवक होते हे स्पष्ट झाल्यानंतर खरीपामध्ये शेतकºयाचे शेतमालाचे नेमके किती नुकसान झाले आहे, याचे आकलन करणेही सोपे जाईल, असा कयास व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीagricultureशेतीFarmerशेतकरी