शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचे मोठे षडयंत्र!

By अनिल गवई | Updated: April 4, 2023 15:22 IST

खामगावात काँग्रेस नेत्यांचा पत्रपरिषदेत आरोप: मोदींची प्रवृत्ती हिटलरशाहीला प्रोत्साहन देणारी

लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गत काही कालावधीत घेतलेल्या भूमिकेमुळे सत्ताधार्याच्या पायाखालची वाळू सरकली आहे. भारतीय समाज आणि जनतेत राहुल गांधीमध्ये एक सक्षम पर्याय दिसून येत असल्याने सत्ताधार्यांनी राजकीय षडयंत्रातून राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. ही बाब निषेधार्ह असून मोदींची प्रवृत्ती हिटलरशाहीला प्रोत्साहन देणारी असल्याचे  माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी येथे सांगितले. 

खामगाव येथील शासकीय विश्राम गृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रदेश सचिव रामविजय बुरूगंले, शहर काँग्रेस कमेटीच्या अध्यक्षा सरस्वती खासने, तालुकाध्यक्ष मनोज वानखडे, शेगाव काँग्रेसचे शहराध्यक्ष विजय काटोले, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा भारती पाटील, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सुरजीतकौर सलुजा, माजी नगरसेवक िकशोर आप्पा भोसले, इनायत उल्ला खान,  युवक काँग्रेसचे अध्यक्ष रोहित राजपूत, संजय झुनझुनवाला, मंगेश इंगळे, श्रीकांत तायडे,  विनोद मिरगे, निखिल देशमुख, प्रशांत टिकार, लक्ष्मण गवई,आदींची उपस्थिती होती.

सत्ताधार्याच्या मर्जीतील उद्योजक आणि नेत्यांचे मोठे घोटाळे उघडकीस आणल्यामुळे राहुल गांधी यांना लक्ष्य केले जात आहे. भांडवलदार उद्योगपतींच्या कर्ममापविरोधात त्यांनीआवाज उठविला आहे. भारतीय बँकांच्या थकबाकीदारांच्या लुटी विरोधात , एसबीआय एलआयसीच्या पैशांचा गैरवापर आदी घोटोळे त्यांनी उघडकीस आणले. संसदेत आवाज उठविला. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून सामान्यांशी नाळ जोडण्याचा प्रयत्न चालविला. यामुळे पोटशूळ उठलेल्या सत्ताधार्यांनी त्यांची खासदारकी रद्द केली. इतकेच नव्हेतर   द्वेषातून त्यांना बंगलाही खाली करायला लावला. ही बाब निषेधार्ह असल्याचेही सानंदा यांनी पत्र परिषदेत स्पष्ट केले.जय भारत सत्याग्रहाला सुरूवात

कॉग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधातील षडयंत्राविरोधात घरोघरी जनजागृती करण्यासाठी मंगळवारी खामगाव येथून जय भारत सत्याग्रहाला सुरूवात करण्यात आली. यावेळी मशाल पेटवित आगामी काळात संघर्ष करण्याचा निर्धार या पत्रकार परिषदेत माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी केला.

त्यांच्याबद्दल रोष नाही...पण त्यांची संगत चुकीची..!

खामगाव विधानसभा मतदार संघातील पराभूत उमेदवार ज्ञानेश्वर उपाख्य नाना पाटील  यांचा उमेदवार म्हणून  माजी आमदार दिलीपकुमार यांनीच शोध लावला. राणानानाची जोडी मतदार संघात चर्चेत येण्यापूर्वीच दोघांमध्ये बिनसले. आता दोन्ही नेत्यांमध्ये ताटातूट झाली. पत्रकार परिषदेत एका प्रश्नावर सानंदा यांना छेडले असता, त्यांनी त्यांच्याबद्दल रोष नाही, काँग्रेसशी त्यांचा काही संबंध नाही पण अलिकडे त्यांची संगत चुकली आहे. मोठे नेते असल्यानंतरही कार्यकर्त्यांच्या हक्कावर गदा आणणे त्यांना शोभणारे नाही.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी