शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

Bharat Jodo Yatra: ‘ते’ देश तोडला जाण्याची वाट पाहत आहेत का? तुषार गांधी यांचा विराेधकांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 06:07 IST

Bharat Jodo Yatra: राहुल गांधी यांनी भारत जाेडाे यात्रा सुरू केल्यावर विराेधकांनी देश तुटला आहे का? असा प्रश्न विचारायला सुरुवात केली. असा प्रश्न विचारणारे लोक देश तोडण्याची वाट पाहत आहेत का?

शेगाव (जि. बुलढाणा) : राहुल गांधी यांनी भारत जाेडाे यात्रा सुरू केल्यावर विराेधकांनी देश तुटला आहे का? असा प्रश्न विचारायला सुरुवात केली. असा प्रश्न विचारणारे लोक देश तोडण्याची वाट पाहत आहेत का? असा सवाल उपस्थित करत  त्या नेत्याला देश तुटण्याची चाहूल लागताच तोच नेता देश जोडण्यासाठी बाहेर पडतो. तुटल्यानंतर जोडण्यासाठी धावाधाव करण्यात काय फायदा, अशा शब्दात महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी राहुल गांधी यांच्या भारत जाेडाे यात्रेचे काैतुक केले.

ते म्हणाले, दांडी मार्चमध्ये महात्मा गांधी, मोतिलाल नेहरू, पंडित नेहरू सहभागी झाले होते. अशा यात्रा आम्ही इतिहासातच वाचल्या हाेत्या; पण आज अनुभवता आली.  आज मी भारत जाेडाे पदयात्रेत चाललो, या माध्यमातून राहुल गांधी हे सामान्य जनता, गरीब, पीडित लोकांचे दुःख समजून घेत आहेत हे प्रकर्षाने जाणवले

डराे मत, तोडणारे राहत नाहीत : पटाेले भारत जाेडाे यात्रेतून राहुल गांधी यांनी ‘डरो मत’ अशी हिम्मत दिली, आम्ही जाेडण्यासाठी निघालाे आहाेत, हा विश्वास दिला. ते देश, संविधान व लाेकशाही वाचविण्याची भाषा करतात तर दुसरीकडे भाजप देश ताेडण्याची, द्वेष पसरविण्याचे काम करते, असा आराेप करत जे जाेडण्यासाठी निघतात तेच कायम राहतात, ताेडणारे राहत नाही, असा आशावाद काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी व्यक्त केला.

ही तर उत्स्फूर्त सभा : थाेरातस्वातंत्र्यांचा अमृत महाेत्सव साजरा करत असताना लोकशाही व संविधान धाेक्यात आल्याचे चित्र आहे. त्यामुळे भारत जाेडाे यात्रेतून लाेकांना विश्वास देण्याचे काम सुरू आहे. राहुल गांधी हे प्रेम, जिव्हाळा, आपुलकी देत निघाले आहेत. त्यामुळे आज जमलेली सभा ही उत्स्फूर्त सभा आहे. एवढी प्रचंड सभा कधी झाली नाही. ही सभा अविस्मरणीय आहे, असे विधिमंडळ काँग्रेस नेते व भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्र समन्वयक बाळासाहेब थोरात म्हणाले. 

ही विमानाची यात्रा नाही : अशोक चव्हाणमहाराष्ट्रातून एक यात्रा विमानाने गुजरातमार्गे गुवाहाटीत गेली अन् त्या गुवाहाटीत काय डाेंगर, काय हाटील, काय झाडी, सर्व ओक्के आहे, असे समाेर आले; पण महाराष्ट्रात काहीच ओक्के नाही, असा आराेप करत भारत जाेडाे यात्रा व आजची सभा महाराष्ट्र व देशातील बदलणाऱ्या परिवर्तनाचे संकेत आहेत. ही विमानाची यात्रा नाही, असा टाेला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हाणला. यात्रा सुरू झाल्यावर बेरोजगारीच्या प्रश्नाला राहुल गांधी यांनी वाचा फोडताच भाजप सरकार काही हजार नोकऱ्यांची नियुक्तीपत्र वाटत आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

निराश हाेऊ नका : कन्हैयाकुमारअच्छे दिनचे स्वप्न दाखवून तरुणांना भुलवले जात आहे. आपले भविष्य धाेक्यात आहे, अशी भीती निर्माण झाली आहे.अशा वेळी आमचे नेते राहुल गांधी म्हणतात ‘डराे मत’, निराश हाेऊ नका, आपण सर्वांनी मिळून लढू या, हा आशावाद ते देतात. त्यांचे हेच शब्द येणाऱ्या काळात इतिहास घडवतील, असे काॅंग्रेसचे युवा नेते कन्हैयाकुमार यांनी सांगितले.

संत विचारांनी ताकद दिली : ठाकूरमहाराष्ट्राला संत विचारांचा वारसा आहे, संतांनी प्रेम, आदर शिकवले, याच संत विचारातून अन्यायविराेधात बंड पुकारण्याची ताकद मिळाली आहे. ताेच वारसा घेऊन राहुल गांधी यांची भारत जाेडाे यात्रा निघाली आहे. या यात्रेतून शांती, प्रेम अन् बंधुभावाचा जागर हाेत आहे. त्यामुळे ही यात्रा लाेकांची यात्रा झाली असून त्याचे प्रत्यंतर आजच्या सभेत आले आहे,असा विश्वास माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला. 

समरसतेशिवाय विकास नाही : मुख्यमंत्री बघेलस्वातंत्र्यलढ्यात टिळक यांनी इंग्रजांच्या विराेधात हिंदू- मुस्लिमांची एकजूट अपेक्षित केली हाेती, तीच परंपरा त्यांचे उत्तराधिकारी महात्मा गांधी यांनी पुढे नेली. या देशाचा विकास हा समरसतेमध्ये आहे. त्यामुळे प्रेम, संवाद या माध्यमातून समरसतेचा विचार राहुल गांधी पुढे नेत आहेत, असे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सांगितले.

...तेव्हाही तिरंगा फडकवला : वासनिक  भाजपच्या सत्ताकाळात संसद, न्यायपालिका, संविधान धाेक्यात आले आहे. तिरंग्यावर संकट आणले आहे. अन् आता घर घर तिरंगा ही माेहीम हाती घेऊन नाटकी देशप्रेम दाखविण्याचा प्रयत्न केला जाताेय, अशी टीका करत जेव्हा तिरंगा फडकविणे गुन्हा हाेता तेव्हाही काॅंग्रेसने तिरंगा फडवला हाेता, अशी आठवण अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी करून दिली. भारत जाेडाे यात्रेच्या समाराेपाला श्रीनगरमध्ये तिरंगा फडकेल त्याच दिवशी देश ताेडणाऱ्याचा ऱ्हास सुरू हाेईल, असा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा