शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

Bhaiyyuji Maharaj suicide : ​​​​​​​पारध्यांची पोरं झाली पोरकी ! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 19:46 IST

विज्ञानाला अध्यात्माची जोड देत समाजातील दुर्लक्षीत घटकाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भय्यूजी महाराजांनी अविरत कार्य केले.

- योगेश फरपट

खामगाव : विज्ञानाला अध्यात्माची जोड देत समाजातील दुर्लक्षीत घटकाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भय्यूजी महाराजांनी अविरत कार्य केले. पारधी समाजातील मुला-मुलींना शिक्षणाचे द्वार खुले व्हावे यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील सजनपूरी भागात भय्यूजी महाराजांनी निवासी आश्रमशाळा सुरु केली. त्यांच्या अचानक जाण्याने आश्रमशाळेतील मुलांनाच नव्हेतर इथे काम करणा-या शिक्षक वर्गालाही धक्का बसला असून आमचा ‘पालनहार’ हरवला असल्याचे सांगत एका शिक्षकाला रडू कोसळले.जिल्हयातीलच नव्हेतर महाराष्ट्रातील आदिवासी व पारधी समाजातील मुले, मुलींना शिक्षणाची निवासी सुविधा उपलब्ध व्हावी या हेतूने डॉ. प.पू. श्री. भय्यूजी महाराजांनी दहा वर्षापूर्वी खामगावातील सजनपूरी भागात ९ जून २००६ रोजी सुर्याेदय पारधी समाज आदिवासी आश्रमशाळा सुरु केली.  या  आश्रमशाळेला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. पारधी समाजाशिवाय आदीवासी प्रवर्गातील इतर मुलेही याठिकाणी शिक्षण घेत आहेत. दीडशे मुलांपासून सुरवात झालेल्या या आश्रमशाळेत सद्यस्थितीत ६१८ मुले-मुली निवासी शिक्षण घेत आहेत. शिक्षणासोबत अध्यात्माचे ज्ञान याठिकाणी मिळत होते. याशिवाय एक संस्कारक्षम युवक घडविण्यावर महाराजांनी भर दिला होता. आश्रमशाळेत शिकणा-या प्रत्येक विद्यार्थ्याचा शारिरिक, मानसिक व अध्यात्मिक विकास झालाच पाहिजे याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. त्यासाठी ते दर महिन्याला एकदा मुलांची भेट घेत असत. आश्रमशाळेच्या बाजूलाच ‘ऋषीसंकूला’चे निर्माण केले. याठिकाणी मुलांना अध्यात्माचे शिक्षण याठिकाणी मिळते. संगीत, खेळ, कला, साहित्य, धर्म अशा विविध पातळीवरील शिक्षणाची सुविधा एकाच व्यासपिठावर मिळते. सुर्याेदय निवासी आश्रमशाळेतील अनेक मुले आज शासनाच्या विविध पदावर कार्यरत आहेत. याशिवाय पारधी समाजाच्या उत्थानासाठी झटत आहेत. महाराजांच्या अचानक निधनाची वार्ता कळताच आश्रमशाळेवर दुखा:चा डोंगरच कोसळला. 

महाराजांना मुलांवर विशेष प्रेम होते. खामगाव आले की मुलांना भेटल्याशिवाय ते जात नव्हते. आश्रमशाळेच्या स्थापनेपासूनच महाराजांसोबत राहिलो. पारध्यांच्या मुलांविषयीची त्यांची तळमळ पाहून आम्हालाही अधिक काम करण्याचा हुरूप यायचा. त्यांच्या जाण्याने पारध्याची पोरं आता पोरकी झाली आहेत. त्यांचे काय होईल याचीच चिंता सतावत आहे. - गोवर्धन टिकार, शारिरिक शिक्षक, सुर्योदय पारधी समाज आदिवासी आश्रमशाळा, खामगाव. 

टॅग्स :Bhayyuji Maharajभय्यूजी महाराजbuldhanaबुलडाणाDeathमृत्यूsocial workerसमाजसेवक