९३ कोटींचा आराखडा मंजूर रोहयो
By Admin | Updated: May 8, 2014 23:43 IST2014-05-08T23:43:55+5:302014-05-08T23:43:55+5:30
गडचिरोली : महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हा प्रशासनाने २०१४ -१५ या यावर्षीचा रोहयो कामाचा ९३ कोटी ८५ लाख ९० हजार रूपयाचा आराखडा मंजूर केला आहे.

९३ कोटींचा आराखडा मंजूर रोहयो
जलंब: येथून नजीकच असलेल्या कालवड या खेड्यातील एका ६५ वर्षीय शेतकर्याचा गंभीर जळाल्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारच्या मध्यरात्री गावानजीक असलेल्या शेतात घडली. येथील परिस्थितीजन्य पुराव्यावरून घातपाताचा संशय व्यक्त केल्या जात असून, या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत प्राप्त माहितीनुसार कालवड येथील शंकर सुपडा तलवारे हे आपल्या शेतातील गोठय़ात रखवालीसाठी नेहमी जात असत. नित्य नियमाप्रमाणे बुधवारीही ते गोठय़ात रखवालीसाठी गेले असता, मध्यरात्री आगीत त्यांचा कोळसा झाल्याची दुर्दैवी घटना आज गुरुवारी पहाटे उघडकीस आली. झोपलेल्या अवस्थेतच तलवारे यांच्या शरीराचा कोळसा झाला असून, त्यांच्या शेतातील बैलजोडी गायब आहे. त्यामुळे चोरीसाठी आलेल्या चोरट्यांनी तलवारे यांना बाजीसह (लाकडी पलंग) पेटवून दिल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी समाधान तुळशीराम खोडे यांच्या तक्रारीवरून जलंब पोलिसांनी र्मग दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार माकोडे, पोकॉ सरकटे, तोमर करीत आहेत.