शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

एका वर्षातच अंगणवाडीची दुरवस्था

By admin | Updated: July 7, 2017 00:12 IST

वेणी येथे लाखो रुपये खर्चून अंगणवाडीचे बांधकाम

प्रभाकर पुंड । लोकमत न्यूज नेटवर्कवेणी : लोणार तालुक्यातील वेणी येथील अंगणवाडीमध्ये ५० टक्के मुलांची हजेरी कागदावरच राहत आहे. तसेच येथे २०१५-१६ मध्ये बांधण्यात आलेल्या अंगणवाडीची वर्षभरात दुरवस्था झालेली असून, निकृष्ट आणि अर्धवट केलेल्या कामामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे. पोषण आहार आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत अंगणवाडी प्रशासन उदासीन असल्याने चिमुकल्यांचे नुकसान होत आहे. लोणार तालुक्यामध्ये गावागावांत वस्ती-वाड्यावर शासनाने अंगणवाड्या सुरू केल्या. या अंगणवाड्यांमध्ये अनेक मुले केवळ पटावरच शिक्षण घेत असून, प्रत्यक्षात ५० टक्के विद्यार्थी उपस्थितच नसल्याचा धक्कादायक प्रकार वेणी येथे उघडकीस आला आहे. अंगणवाड्यांना ५ जुलै रोजी सकाळी ९.३० ते ११ वाजता भेटी दिल्या. वेणी येथे ४ अंगणवाडी आहेत. त्यामध्ये १६१ पटसंख्येची कागदोपत्री नोंद आहे. सरपंच अभिमन्यू साखरे यांच्या कार्यकाळात दोन अंगणवाड्यांसाठी २०१५-१६ मध्ये नवीन निकृष्ट आणि अर्धवट इमारतीचे बांधकाम झाले. याच निकृष्ट बांधकाम असलेल्या इमारतीत अंगणवाडी भरते. अंगणवाडीची वेळ सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत आहे. सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील लाभार्थींना शिरा ९६० ग्रॅम, उपमा ९६० ग्रॅम, सातू ९६० ग्रॅम व पॅकबंद पाकीट २५ दिवसांसाठी तीन पाकीट घरपोचची सुविधा आहे. गरोदर, स्तनदा मातांना शिरा ११२० ग्रॅम, उपमा सुकळी ११२० ग्रॅम व पॅकबंद पाकीट २५ दिवसांसाठी तीन पाकीट घरपोच, ३ ते ६ वर्षलाभार्थ्यांना गरम ताजा आहार खिचडी, कडधान्य, उसळ, लापसी, ९० ग्रॅम तांदूळ व १० ग्रॅम दाळ, २० ग्रॅम मटकी, २० ग्रॅम वटाना उसळ दररोज केंद्रामध्ये देण्यात यावा. किशोर मुली १५ ते १८ वयोगटातील उपमा, सातू, शिरा व २५ दिवसांसाठी ३ पॅकबंद पाकीट घरपोच देण्याचा शासन प्रयत्न करीत आहे. मात्र, ५ जुलै रोजी येथील अंगणवाडीला भेट दिली असता ५० टक्के बालक उपस्थित नव्हते. बालकांच्या घरोघरी जाऊन पालकांच्या भेटी घेतल्या असता, बालक अंगणवाडीत किती वाजता जाते, किती वाजता घरी येते, बालकांना पोषण आहार काय दिल्या जातो, तर तांदळाच्या खिचडी शिवाय काहीच दिल्या जात नसल्याची माहिती पालकांकडून सांगण्यात आली. बालकांना पूर्वशालेय शिक्षण, गीत, गाणे, खेळ शिकविल्या जाते काय, याबद्दल पालक अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. वस्तू ठेवण्यासाठी शौचालयाचा वापर२०१५- १६ मध्ये सरपंच अभिमन्यू साखरे यांच्या कारकिर्दीत अंगणवाडीच्या दोन इमारतीचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले असून, हे बांधकाम अर्धवट असल्यामुळे उघड्या असलेल्या टाकीत साचलेल्या पाण्यामुळे बालकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या इमारतीत शौचालय असून, त्याचा वापर अडगळीचे सामान ठेवण्यासाठी केला जातो. इमारतीचे छत गळत असल्यामुळे पाऊस आला की अंगणवाडीतील पोषण आहाराचे साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी धावपळ करावी लागत असून, विद्यार्थ्यांना सुटी दिली जाते. यामुळे शासनाच्या उद्देशाला खीळ बसत असून, विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आलेले आहे. पोषण आहार होतो खराबअंगणवाडीच्या इमारतीला खिडक्या नसल्यामुळे पोषण आहारात परिसरातील घाण हवेमुळे उडून पोषण आहार खराब होत आहे. त्यामुळे अशा पोषण आहारामुळे बालके आजारी पडू शकतात. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना वर्ग खोलीत जाण्यासाठी पायऱ्या तयार करण्यात आल्या होत्या. मात्र, त्या काही दिवसातच तुटलेल्या आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांना वर्ग खोलीत जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पायऱ्यांची दुरवस्था झाल्याने विद्यार्थ्यांना वर्गखोलीत जाणे अडचणीचे होत आहे.