शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

एका वर्षातच अंगणवाडीची दुरवस्था

By admin | Updated: July 7, 2017 00:12 IST

वेणी येथे लाखो रुपये खर्चून अंगणवाडीचे बांधकाम

प्रभाकर पुंड । लोकमत न्यूज नेटवर्कवेणी : लोणार तालुक्यातील वेणी येथील अंगणवाडीमध्ये ५० टक्के मुलांची हजेरी कागदावरच राहत आहे. तसेच येथे २०१५-१६ मध्ये बांधण्यात आलेल्या अंगणवाडीची वर्षभरात दुरवस्था झालेली असून, निकृष्ट आणि अर्धवट केलेल्या कामामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे. पोषण आहार आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत अंगणवाडी प्रशासन उदासीन असल्याने चिमुकल्यांचे नुकसान होत आहे. लोणार तालुक्यामध्ये गावागावांत वस्ती-वाड्यावर शासनाने अंगणवाड्या सुरू केल्या. या अंगणवाड्यांमध्ये अनेक मुले केवळ पटावरच शिक्षण घेत असून, प्रत्यक्षात ५० टक्के विद्यार्थी उपस्थितच नसल्याचा धक्कादायक प्रकार वेणी येथे उघडकीस आला आहे. अंगणवाड्यांना ५ जुलै रोजी सकाळी ९.३० ते ११ वाजता भेटी दिल्या. वेणी येथे ४ अंगणवाडी आहेत. त्यामध्ये १६१ पटसंख्येची कागदोपत्री नोंद आहे. सरपंच अभिमन्यू साखरे यांच्या कार्यकाळात दोन अंगणवाड्यांसाठी २०१५-१६ मध्ये नवीन निकृष्ट आणि अर्धवट इमारतीचे बांधकाम झाले. याच निकृष्ट बांधकाम असलेल्या इमारतीत अंगणवाडी भरते. अंगणवाडीची वेळ सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत आहे. सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील लाभार्थींना शिरा ९६० ग्रॅम, उपमा ९६० ग्रॅम, सातू ९६० ग्रॅम व पॅकबंद पाकीट २५ दिवसांसाठी तीन पाकीट घरपोचची सुविधा आहे. गरोदर, स्तनदा मातांना शिरा ११२० ग्रॅम, उपमा सुकळी ११२० ग्रॅम व पॅकबंद पाकीट २५ दिवसांसाठी तीन पाकीट घरपोच, ३ ते ६ वर्षलाभार्थ्यांना गरम ताजा आहार खिचडी, कडधान्य, उसळ, लापसी, ९० ग्रॅम तांदूळ व १० ग्रॅम दाळ, २० ग्रॅम मटकी, २० ग्रॅम वटाना उसळ दररोज केंद्रामध्ये देण्यात यावा. किशोर मुली १५ ते १८ वयोगटातील उपमा, सातू, शिरा व २५ दिवसांसाठी ३ पॅकबंद पाकीट घरपोच देण्याचा शासन प्रयत्न करीत आहे. मात्र, ५ जुलै रोजी येथील अंगणवाडीला भेट दिली असता ५० टक्के बालक उपस्थित नव्हते. बालकांच्या घरोघरी जाऊन पालकांच्या भेटी घेतल्या असता, बालक अंगणवाडीत किती वाजता जाते, किती वाजता घरी येते, बालकांना पोषण आहार काय दिल्या जातो, तर तांदळाच्या खिचडी शिवाय काहीच दिल्या जात नसल्याची माहिती पालकांकडून सांगण्यात आली. बालकांना पूर्वशालेय शिक्षण, गीत, गाणे, खेळ शिकविल्या जाते काय, याबद्दल पालक अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. वस्तू ठेवण्यासाठी शौचालयाचा वापर२०१५- १६ मध्ये सरपंच अभिमन्यू साखरे यांच्या कारकिर्दीत अंगणवाडीच्या दोन इमारतीचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले असून, हे बांधकाम अर्धवट असल्यामुळे उघड्या असलेल्या टाकीत साचलेल्या पाण्यामुळे बालकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या इमारतीत शौचालय असून, त्याचा वापर अडगळीचे सामान ठेवण्यासाठी केला जातो. इमारतीचे छत गळत असल्यामुळे पाऊस आला की अंगणवाडीतील पोषण आहाराचे साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी धावपळ करावी लागत असून, विद्यार्थ्यांना सुटी दिली जाते. यामुळे शासनाच्या उद्देशाला खीळ बसत असून, विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आलेले आहे. पोषण आहार होतो खराबअंगणवाडीच्या इमारतीला खिडक्या नसल्यामुळे पोषण आहारात परिसरातील घाण हवेमुळे उडून पोषण आहार खराब होत आहे. त्यामुळे अशा पोषण आहारामुळे बालके आजारी पडू शकतात. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना वर्ग खोलीत जाण्यासाठी पायऱ्या तयार करण्यात आल्या होत्या. मात्र, त्या काही दिवसातच तुटलेल्या आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांना वर्ग खोलीत जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पायऱ्यांची दुरवस्था झाल्याने विद्यार्थ्यांना वर्गखोलीत जाणे अडचणीचे होत आहे.