शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींचे पासबुक व्यापाऱ्यांच्या ताब्यात!

By admin | Updated: June 13, 2017 00:02 IST

पुनर्वसनापोटी मिळणाऱ्या १० लाखाच्या मोबदल्यावर अनेकांचा डल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कसोनाळा : अंबाबरव्हा अभयारण्यात वास्तव्यास असलेल्या आदिवासींना पुनर्वसनापोटी १० लाख रुपयांचा मोबदला शासनाकडून मिळत असल्याने त्यावर अनेक जण डल्ला मारताना दिसत आहेत. भोळ्या-भाबड्या आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेण्यासाठी अनेक जण सरसावले असून, आदिवासींचे बँकेचे पासबुक चक्क व्यापाऱ्यांच्या ताब्यात असल्याचे दिसत आहे.सोनाळा गावालगत ७ किलोमीटर अंतरावर अंबाबरव्हा अभयारण्य आहे. या अभयारण्याला मानवी वस्तीपासून अलिप्त करण्यासाठी अभयारण्यातील दऱ्या-खोऱ्यात वसलेल्या शेंबा व गुमटी या दोन आदिवासी गावांचे पुनर्वसन करण्याचे शासनाने ठरविले आहे. या गावात न्याल, भिलाला, कोरकू जमातीचे आदिवासी राहत असून, ते शिक्षणापासून व अन्य मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यांना शासनाकडून प्रत्येकी १० लाख रुपयांचा मोबदला पुनर्वसनापोटी देण्यात येत आहे. मागिल मार्च महिन्यातच शासनाने या गावातील रहिवाशांना प्रत्येक कुटुंबाला प्रती सदस्य १० लाख रुपयांचा मोबदला देण्याचे जाहीर केले होते. त्याचवेळी नगदी ५० हजार रुपये देऊन अडीच लाख रुपये बँक खात्यात जमा केले होते. तर उर्वरित रक्कम टप्प्या-टप्प्याने खात्यात जमा केली जात आहे. यामध्ये दर १५ दिवसाला ५० हजार रुपये दिले जात आहेत. जवळपास ५१० आदिवासींचा या पुनर्वसित लोकांच्या यादीत समावेश आहे. अशिक्षित आदिवासींना मोठ्या प्रमाणात पैसे मिळत असल्याचे पाहून अनेक जण त्याचा गैरफायदा घेत आहेत. काहींनी २० हजाराची मोटारसायकल आदिवासींना ८० हजारात विकली, तर काही जण आदिवासींना १०० रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून घेत उधारीचे व्यवहार करीत आहेत. यावेळी त्यांचे पासबुकही ताब्यात घेतले जात आहे. ज्यावेळी आदिवासींच्या खात्यात पैसे जमा होतात, त्यावेळी हे व्यापारी व दलाल त्यांना आपल्या मोटारसायकलवर बसवून बँकेत घेऊन जातात व पैसे काढून घेतात. पैसे मिळण्याच्या दिवशी सोनाळा-अकोट मार्गावर अशा अनेक गाड्या धावताना दिसतात. आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना लुबाडणाऱ्यांची टोळीच सक्रिय झालेली असून, याकडे सत्ताधारी भाजपच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे.दरमहा ३० टक्के शेकड्याने दिले जातात पैसे गरीब आदिवासींची गरज पाहून व त्यांना मोठ्या प्रमाणात पैसे मिळणार असल्याचे ठाऊक असल्याने काही अवैध सावकार त्यांना चक्क ३० टक्के दरमहा व्याजाने पैसे देत असल्याची माहिती आहे. अनेक जण १०० रुपयांच्या स्टॅम्पवर उधारीचे व्यवहार करीत आहेत. आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेण्यासाठी अनेक जण टपून बसलेले आहेत. यामध्ये सोनाळा, सायखेड, पिंगळी, टुनकी, निमखेडी, आलेवाडी, लाडणापूर, बावणबीर येथील दलाल सक्रिय झालेले आहेत. याबाबत चौकशी करण्याची गरज आहे.