शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये गतवर्षीपेक्षा ५२ टक्के कमी जलसाठा

By विवेक चांदुरकर | Updated: August 30, 2023 17:14 IST

आगामी दिवसांमध्ये मुबलक प्रमाणात पाऊस झाला नाही तर पुढील वर्षी भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

खामगाव : जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये गतवर्षीपेक्षा यावर्षी तब्बल ५२.६७ टक्के कमी जलसाठा आहे. गतवर्षी ७६.२८ टक्के जलसाठा होता तर यावर्षी केवळ २३.६१ टक्के जलसाठा आहे. आगामी दिवसांमध्ये मुबलक प्रमाणात पाऊस झाला नाही तर पुढील वर्षी भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

यावर्षी जून महिन्यामध्ये अल्प पाऊस झाला. त्यानंतर जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पाऊस झाला नाही. जुलै महिन्यात पाऊस झाल्यानंतर पुन्हा पावसाचा खंड पडला. जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात २४ ऑगस्टपर्यंत गतवर्षी ५७.७६ टक्के जलसाठा होता तर यावर्षी २६.४८ टक्के आहे. खडकपूर्णा प्रकल्पात गतवर्षी ८७.५६ टक्के जलसाठा होता तर यावर्षी केवळ ५.५ टक्के, पेनटाकळी प्रकल्पात गतवर्षी ८०.१३ टक़्के तर यावर्षी ४९.१७ टक्के जलसाठा आहे. 

जिल्ह्यातील ज्ञानगंगा, मस, कोराडी, पलढग, मन, तोरणा, उतावळी या मध्यम प्रकल्पांमध्ये ५१.५८ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी या प्रकल्पांमध्ये ८६.२९ टक्के जलसाठा होता. तसेच २० लघु प्रकल्पांमध्ये केवळ ८.३७ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी या लघु प्रकल्पांमध्ये ३४.६७ टक्के जलसाठा होता.

तसेच वर्हाडातील पाचही जिल्ह्यांतील प्रकल्पांमध्ये यावर्षी गतवर्षीपेक्षा १३ टक्के कमी जलसाठा आहे. गतवर्षी ९ मोठ्या प्रकल्पांमध्ये ८३.४९ टक्के जलसाठा होता. तर यावर्षी प्रकल्पांमध्ये ६९.६४ टक्के जलसाठा आहे.

अमरावती विभागात ९ मोठे प्रकल्प आहेत. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्प, अरूणावती, बेंबळा, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा, वान, बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा, पेनटाकळी, खडकपूर्णा या प्रकल्पांचा समावेश आहे. वर्हाडातील मोठ्या प्रकल्पांमध्ये ६९.६४ टक्के जलसाठा आहे. 

टॅग्स :DamधरणWaterपाणीRainपाऊस