शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

बुलडाणा जिल्ह्यात ४५ सेंद्रिय शेतकरी गट: शेतकऱ्यांचा वाढता कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 12:06 IST

खामगाव: रासायनिक खते, औषधांच्या वापराने दिवसेंदिवस खराब होत चाललेली जमिनीची पोत तसेच शेतकºयांना सोसावा लागणारा आर्थिक भुर्दंड लक्षात घेता बुलडाणा जिल्ह्यातील शेतकºयांनी सेंद्रिय शेतीची कास धरली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात जुने तसेच वाढीव असे ४५ सेंद्रिय शेतकरी गट कार्यान्वित आहेत. यातून जमिनीची सुपिकता वाढत असून शेतकºयांचा खर्चही कमी होत असल्याचे दिसून येत आहे. शेतकºयांनी रासायनिक खत, औषधांचा वापर टाळून गांडूळखत, निंबोळी अर्क आदींचा वापर सुरू केला आहे.

 - देवेंद्र ठाकरेखामगाव: रासायनिक खते, औषधांच्या वापराने दिवसेंदिवस खराब होत चाललेली जमिनीची पोत तसेच शेतकºयांना सोसावा लागणारा आर्थिक भुर्दंड लक्षात घेता बुलडाणा जिल्ह्यातील शेतकºयांनी सेंद्रिय शेतीची कास धरली आहे. जिल्ह्यात जुने तसेच वाढीव असे ४५ सेंद्रिय शेतकरी गट कार्यान्वित आहेत. यातून जमिनीची सुपिकता वाढत असून शेतकºयांचा खर्चही कमी होत असल्याचे दिसून येत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून शेतीत रासायनिक खतांचा वापर वाढला आहे. रासायनिक औषधांच्या फवारणीमुळे विपरीत परिणाम होत आहे. यामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढला असून रासायनिक खते व औषधांमुळे जमिनीची पोत खराब झाली आहे. निसर्गही साथ देत नसल्याने शेती हा तोट्याचा व्यवसाय झाला आहे. ही परिस्थिीती विचारात घेता, वारेमाप खर्च टाळून शेतकºयांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे, याबाबत शासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. सेंद्रिय शेती करणाºया शेतकºयांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. यामुळे जिल्ह्यात सध्या ४५ सेंद्रिय शेतकरी गटाच्या माध्यमातून शेतकरी सामुहिक पध्दतीने सेंद्रिय शेती करीत आहेत. खामगाव तालुक्यात काळेगाव येथे श्री कानिफनाथ महाराज सेंद्रिय शेतकरी गट, वाकुड-कुºहा येथे शाश्वत सेंद्रिय शेतकरी गट, पिंप्राळा येथे सुपो महाराज सेंद्रिय शेतकरी गट स्थापन करण्यात आले आहेत. प्रत्येक गटात ५० शेतकरी असून प्रत्येक गटाद्वारे ५० एकरावर सामुहिक पध्दतीने सेंद्रिय शेती करण्यात येत आहे. या गटातील शेतकºयांनी रासायनिक खत, औषधांचा वापर टाळून गांडूळखत, निंबोळी अर्क आदींचा वापर सुरू केला आहे. वाढीव गटात कोंटी येथील ज्ञानगंगा सेंद्रिय शेतकरी गटाचा समावेश आहे. या गटात २१ शेतकरी असून त्यांनीसुध्दा ५० एकरात सेंद्रिय शेती सुरू केली आहे. यातील ४० एकरावर सेंद्रिय पध्दतीने ऊसाची लागवड कोंटी येथील शेतकºयांनी केली आहे. या ऊस शेतीला ह्यआत्माह्ण चे प्रकल्प संचालक तथा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी भेट देऊन पाहणी सुध्दा केली आहे. खामगाव तालुक्यात सेंद्रिय शेती करणाºया शेतकºयांना  आत्मा  कडून तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक वाय.एस.पडोळ, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक एन.एस.नागे यांच्याकडून प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करून मार्गदर्शन करण्यात येत आहे.पाणी पातळीतही होतेय वाढसेंद्रिय शेतीतून जमिनीची पोत तर सुधारत आहेच, शिवाय विहीरीतील पाणीपातळीतही वाढ होत असल्याचे वाकुड-कुºहा येथील शाश्वत सेंद्रिय शेतकरी गटाचे अध्यक्ष शिवाजी शालीग्राम लाहूडकर यांनी सांगितले. गांडूळ खताच्या वापरामुळे जमिन सछिद्र होत आहे. यामुळे जमिनीत मोठ्या प्रमाणावर पाणी मुरते. परिणामी शेतातील विहीरीची पाणीपातळी वाढली असल्याची माहिती लाहूडकार यांनी दिली.सेंद्रिय शेती ही लोकचळवळ व्हावी!अलीकडे अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत. परंतु हे प्रमाण वाढले पाहिजे. प्रत्येक शेतकºयाने यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. सेंद्रिय शेती ही लोकचळवळ झाली पाहिजे. तरच येणार काळ सुखदायी असेल. अन्यथा भविष्यात जिकडे तिकडे बंजर झालेली जमिन पाहावयास मिळेल, असे मत सेंद्रिय पध्दतीने शेती करणारे शेतकरी व्यक्त करताहेत.कोट.............येणाºया काळात सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकºयांनी सेंद्रिय ेशेतीसाठी पुढाकार घ्यावा. यासाठी कृषी विभागाचे मार्गदर्शन घ्यावे.नरेंद्र नाईक,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारीतथा प्रकल्प संचालक ह्यआत्माह्ण

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव