शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे बुलडाणा जिल्ह्यात ४२ कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 10:24 AM

Crop loss due to heavy rains Buldhana ६१ हजार ६८९ हेक्टरवरील पिकांना मोठा फटका बसला असून ६४ हजार ७१० शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा: ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात परतीच्या पावसाने अद्द्याप पर्यंत शेतकऱ्यांचे नुकसान केले नसले तरी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बुलडाणा जिल्ह्यात खरीपाचे ४२ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या अंतिम अहवालावरून स्पष्ट होत आहे.दरम्यान, सप्टेंबरमधील या पावसामुळे ६१ हजार ६८९ हेक्टरवरील पिकांना मोठा फटका बसला असून ६४ हजार ७१० शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात आलेल्या अंतिम अहवालावरून ही बाब स्पष्ट होत आहे.दुसरीकडे जुन, जुलै, ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्याचाही फटका शेतकऱ्यांना बसून जवळपास २६ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते तर एकट्या सप्टेंबर महिन्यात पावसामुळे ४२ कोटी २२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सिंदखेड राजा, मेहकर, देऊळगाव राजा आणि खामगाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. एकट्या सिंदखेड राजा तालुक्यात चार कोटी १८ लाख ७५ हजार रुपयांचे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. मेहकर तालुक्यातही एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अन्य तालुक्यात तुलनेने कमी नुकसान झाले असले तरी शेतकऱ्यांना सलग दुसऱ्यावर्षी फटका बसला आहे.

सिंदखेड राजातील सर्वाधिक शेतकरी बाधीतसिंदखेड राजा तालुक्यात सर्वाधिक शेतकरी सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे बाधीत झाले आहेत. ६४ हजार ७१० शेतकऱ्यांपैकी एकट्या सिंदखेड राजा तालुक्यातील ५९ हजार ४०१ शेतकऱ्यांचा बाधीतांमध्ये समावेश आहे. मेहकर तालुक्यातील दीड हजार शेतकरी, देऊळगाव राजा तालुक्यातील ७१९ शेतकरी तर खामगाव तालुक्यातील दोन हजार शेतकरी संप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे बाधीत झाले असल्याचे कृषी विभागाच्या अहवालावरून स्पष्ट होत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी