शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

परतीच्या पावसानंतरही ३१ टक्केच जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 1:25 AM

बुलडाणा : जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून कमी-जास्त   प्रमाणात सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील मोठे,  मध्यम लघू प्रकल्पांच्या जलसाठय़ात १६८.११ दलघमी म्हणजे ३१.५१ टक्केच जलसाठा आला आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई भेडसावणार आहे. 

ठळक मुद्दे जलसंकट : पिण्याचे पाणी, चाराटंचाई भेडसावणार!मागील चार वर्षांंत सर्वात कमी जलसाठय़ाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून कमी-जास्त   प्रमाणात सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील मोठे,  मध्यम लघू प्रकल्पांच्या जलसाठय़ात १६८.११ दलघमी म्हणजे  ३१.५१ टक्केच जलसाठा आला आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई भेडसावणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात नळगंगा, खडकपूर्णा पेनटाकळी असे तीन  मोठे प्रकल्प आहेत, तर पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, मन,  तोरणा उतावळी असे सात मध्यम प्रकल्प आहेत. यावर्षी  पावसाने सुरुवातीपासून हुलकावणी देण्यास सुरुवात केली आहे;  मात्र मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यात कमी-जास्त प्रमाणात  परतीच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे बहुतांश नदी, नाल्यांना पूर  गेला. काही ठिकाणी शेतकर्‍यांच्या उभ्या पिकात पुराचे पाणी  जाऊन पिकाचे नुकसान झाले आहे; मात्र जिल्ह्यातील मोठे,  मध्यम लघू प्रकल्पांच्या पाणीसाठय़ात अल्प वाढ झाली आहे.  सद्यस्थितीत या प्रकल्पात ३१.५१ टक्केच जलसाठा उपलब्ध  आहे.जिल्ह्यात तीन मोठे प्रकल्प आहेत. त्यापैकी नळगंगा प्रकल्पात  ३८.८९, पेनटाकळी प्रकल्पात ३६.९२ व खडकपूर्णा प्रकल्पात  १३.२७ असा एकूण मोठय़ा प्रकल्पात २७.६१ टक्के जलसाठा  आहे, तर सात मध्यम प्रकल्पांपैकी पलढक प्रकल्प १00 टक्के,  ज्ञानगंगा प्रकल्पात ५२.२५, मस प्रकल्पात २९.४५, कोराडी  प्रकल्पात ३४.२६, मन प्रकल्पात २८.२७, तोरणा प्रकल्पात  ४0.१८ व उतावळी प्रकल्पात ३७.७0 असा एकूण सात  प्रकल्पात ४१.0६ तसेच एकूण ८१ लघू प्रकल्पांत २९.0३ टक्के  जलसाठा असा एकूण जिल्ह्यातील ९१ मोठे, मध्यम व लघू  प्रकल्पात ३१.५१ टक्के जलसाठा आला आहे. सदर जलसाठा  अल्प असल्यामुळे भविष्यात पाणीटंचाई व चाराटंचाई  भेडसावणार आहे. परतीच्या पावसामुळे नदी, नाले भरल्यामुळे  काठावरील काही गावांची पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली  आहे; मात्र पाण्याचा अल्पसाठा असल्यामुळे उन्हाळय़ात त्रास  सहन करावा लागणार आहे.

टॅग्स :Waterपाणी