शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
2
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
3
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
4
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
5
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
6
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
7
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
8
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
9
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
10
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
11
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
12
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
13
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
14
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
15
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
16
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
17
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
18
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
19
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
20
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 

बुलडाणा जिल्ह्यात नागरी भागातील १४२६ हातपंप अडगळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 3:41 PM

बुलडाणा: जिल्ह्यातील नागरी भागातील सुमारे सहा लाख नागरिकांची तहान भागविणयामध्ये एक दशकापूर्वी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या हातपंपांची आज दुरवस्था झाली आहे.

- नीलेश जोशी  बुलडाणा: जिल्ह्यातील नागरी भागातील सुमारे सहा लाख नागरिकांची तहान भागविणयामध्ये एक दशकापूर्वी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या हातपंपांची आज दुरवस्था झाली असून याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे. दरम्यान भुगर्भातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा उपसा झाल्यान यातील बहुतांश हातपंप कोरडे पडले आहे. परिणामी नागरिकांनी त्यांचा वापर करणे बंद केल्याने हे हातपंप कायमचे विस्मरणात जाण्याच्या मार्गावर आहे. ग्रामीण भागातील बहुतांश हातपंपांचीही हीच स्थिती आहे.दरम्यान, काही ठिकाणीतर हे हातपंप पूर्णत: जमीनत गाडल्या गेल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत जिल्हा परिषद आणि पालिकांचा देखभाल दुरुस्ती करणारा विभाग नेमके करतो तरी काय?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरी भागातील पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात एकमेव मलकापूर पालिकेने १२० पैकी ९८ हातपंप सुस्थितीत असल्याची लिखीत स्वरुपात माहिती दिली आहे. मात्र उर्वरित १२ पालिकांनी त्याचा विसर पडल्याचे चित्र आहे.१९८० च्या दशकात टंचाईवर मात करण्यासाठी प्रामुख्याने गावोगावी, शहरांमध्ये विंधन विहीरी घेऊन हातपंप बसविण्याचे एक मोठे फॅडच आले होते. साधारणत: २५० लोकसंख्येचा विचार करून हे हातपंप तेव्हापासून देण्यात येत आहे. अगदी आमदार निधी, जिल्हा परिषद सदस्यांना मिळणारा निधी, खासदार निधीचा यासाठी मोठ्या प्रमाणावर वापर झाला होता. मात्र ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ अशा भूमिकेतून नागरिकांसोबतच प्रशासनानेचही या हातपंपांकडे दुर्लक्ष झाले आहे. बंद पडलेल्या या हातपंपाच्या माध्यमातून २०० फुटाखालील अ‍ॅक्वीफोर अर्थात जलधर खडक रिचार्ज करण्याचा प्रयत्नही प्रशासकीय पातळीवर किंवा सामाजिकस्तरावर दिसून आलेला नाही. एक प्रकारे जलसाक्षरेबाबतची संशोधक वृत्तीच आज नष्ट होऊ पाहते की काय? अशी स्थिती निर्माण होऊ पाहत आहे.  कधी काळी याच हातपंपांनी शहरी तथा ग्रामीण भागातील अख्ख्या गावाची तहान भावगली होती. मात्र घटता भूजलस्तर पाहता हे हातपंप आज अडगळीत पडले आहे. तसे पाहता यासाठी झालेला कोट्यावधी रुपयांच्या खर्चाचीही सध्या यंत्रणेला जाण राहलेली नाही. गेल्या दोन दशकामध्ये अगदी गल्ली बोळात हातपंप घेण्यात आले होते. मात्र आज घरपोच आरोचे पाणी पोहोचत असल्याने हातपंप अडगळीत पडले आहेत.बोअर घेताना २०० फुटांची मर्यादावास्तविक बोअर घेताना शासनाने २०० फुटांची मर्यादा घालून दिलेली आहे. शासकीय यंत्रणा हा नियम पाळत असल्या तरी खासगीस्तरावर त्याबाबत फारसे नियंत्रण नाही. त्यामुळे अशा हातपंपांजवळ खासगी व्यक्तीने घेतलेला बोअर हा अडीशे ते साडेतीनशे फुटापर्यंत घेतल्या जातो. परिणामी जमिनीखालील जलधर खडकातील ( अ‍ॅक्वीफोर) संपूर्ण पाणी खेचल्या जाते आणि भूजल पातळी खालावते. दुसरीकडे शासकीयस्तरावरून घेण्यात आलेले बोअर हे २०० फुट खोलीची मर्यादा आणि महिलांची पाणी हापसण्याची शारीरिक क्षमता विचारा घेऊन मर्यादी स्वरुपातच खोल घेतल्या गेलेले आहेत असे भुजल सर्व्हेक्षण विभागातील सुत्रांनी स्पष्ट केले. त्यामुळे उन्हाळ््यात बहुतांश हातपंप कोरडे पडून नंतर त्यांचा वापर होणेच बंद होते.

जिल्हा परिषदेतंर्गत ग्रामीण भागातील हातपंप सुरळीत सुरू आहेत. काही ठिकाणी अडचण असल्यास तक्रार प्राप्त होताच ते सुरळीत करण्यात येतील. जेथे पाणीच उपलब्ध नाही तेथे समस्या राहू शकते- मोहन भटउपयभियंता, यांत्रिकी विभाग, जि.प. बुलडाणा.

भिलवाडा परिसरातील पाच हातपंप सुरू केले आहेत. काही भागातील जुने हातपंप बंद झालेले आहेत. मात्र तक्रार प्राप्त झाल्यास त्यांची दुरुस्ती केली जाईल.- राहूल मापारी,पाणीपुरवठा अभियंता,नगर पालिका, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाwater scarcityपाणी टंचाई