शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
3
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
4
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
5
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
6
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
7
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
8
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
9
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
10
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
11
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
12
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
13
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
14
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
15
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
16
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
17
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
18
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
19
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
20
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळातील ग्रामीण स्तरावरील कर्मचाऱ्यांचे कार्य उल्लेखनीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:36 IST

आजही कोरोना काळात शासनाच्या ५० लाख विमा योजनेच्या संरक्षणासाठी वीज कर्मचारी, कृषी कर्मचारी यांना संघर्षच करावा लागत आहे. त्यामुळे ...

आजही कोरोना काळात शासनाच्या ५० लाख विमा योजनेच्या संरक्षणासाठी वीज कर्मचारी, कृषी कर्मचारी यांना संघर्षच करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने ग्रामीण पातळीवर एकत्र काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव करू नये, तसेच सर्वांनाच सरसकट विमा योजनेचा लाभ देऊन सर्वांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव करण्याची गरज आहे. खरीप हंगाम जवळ आल्याने कृषी कर्मचारी दररोज हजाराे शेतकऱ्यांच्या संपर्कात येत आहेत. वीज कर्मचाऱ्यांनीही आपला जीव धोक्यात घालून कुठेही वीज पुरवठा खंडित होणार नाही, यासाठी आपले कर्तव्य निभावले आहे. मात्र, शासन मात्र स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव करीत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

बॉक्स

शेतकऱ्यांच्या हक्काचे कर्मचारी कृषी सहायक, तलाठीच

जिल्ह्यात कोरोना धोका वाढला आहे. मात्र, खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकऱ्यांची खरिपासाठी धावपळ सुरू आहे. त्यामुळे पीक कर्ज असो की खरिपातील खते, बियाणे व पीक पद्धती बदलाविषयी मार्गदर्शन असो शेतकऱ्यांसाठी कोणतेही काम असो ग्रामीण स्तरावर काम करणारे तलाठी, कृषी सहायक हेच शेतकऱ्यांसाठी आजही कोरोना काळातही हक्काचे कर्मचारी आहेत. आज अनेक तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक हे कोरोनाने संक्रमित झाले असून ते आपल्या कुटुंबासह स्वतःचा जीव धोक्यात घालून तरीही कर्तव्य निभावतच आहेत. मात्र, वरिष्ठ स्तरावर याच कृषी सहायक व वीज कर्मचाऱ्यांना तात्काळ शासनाने विम्याचा लाभ देण्याची गरज आहे.

कोट

ग्रामीण पातळीवर कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठी, वीज कर्मचारी एकमेकांच्या समन्वयातून एकत्रित कामे करतात. शासनाने मात्र तलाठी, ग्रामसेवकांना कोविड काळात ५० लाखांच्या विम्याचा लाभ दिला आहे. मात्र, शासन कृषी कर्मचाऱ्यांवर अन्याय करत आहे. अनेक कृषी कर्मचारी आज मृत्यूशी झुंज देत आहेत. खरीप हंगामातील कोरोनाचा धोका लक्षात घेऊन तात्काळ विम्याचा लाभ दिलाच पाहिजे.

-गणेश शेंडे,

कृषी पर्यवेक्षक, लाखनी