शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

पिके वाचविण्यासाठी शेतकºयांची केविलवाणी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:51 IST

शासनाच्या महत्वाकांक्षी अशा जलयुक्त शिवार अभियानात करडी व बेटाळा जि.प. क्षेत्रात २०१५-१६ व २०१६-१७ या दोन वर्षात मोठे काम झाले.

ठळक मुद्देअत्यल्प पावसाचा फटका : प्रकल्पांत जलसाठा नगण्य, हजारो एकर शेती पडीत

युवराज गोमासे।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : शासनाच्या महत्वाकांक्षी अशा जलयुक्त शिवार अभियानात करडी व बेटाळा जि.प. क्षेत्रात २०१५-१६ व २०१६-१७ या दोन वर्षात मोठे काम झाले. शासन-प्रशासनाने मेहनत घेतली. मागील वर्षी या योजनांतील पाण्याचा वापर करून शेती पिकविली गेली. कोरड्या दुष्काळावर मात करता आली. मात्र यावर्षी सरासरीपेक्षा अतिशय कमी पाऊस झाल्याने, जलयुक्त शिवारातील जलस्त्रोत कोरडी पडल्याने परिस्थिती बिकट आहे. रोवणी अभावी हजारों एकर शेती पडित तर रोवणी झालेले पीक उन्हाने करपली आहेत. अत्यल्प पावसाचा फटका बसल्याचे दिसून येत आहे.ग्लोबल वार्मिंगमुळे दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे. कमी अधिक पर्जन्यमान, अनियमितता यामुळे शेती नेहमी संकटात सापडते. शेतीतील संकटावर कायम स्वरूपी मात करता यावी, पर्जन्यवाढीसाठी उपाय योजनाबरोबर जलसंचयाला, स्त्रोतांच्या बळकटीकरणाला व पाण्याच्या योजनाबद्ध नियोजनाला प्राधान्य देण्याचा विचार शासनाने केला. पाण्याचा ताळेबंद प्रभाविपणे राबविण्याचा विचार पुढे आला. त्यातूनच गावांच्या गरजेनुसार योजना आखण्याला प्राधान्यक्रम देण्यात आले. लोकसहभागाचा उपयुक्त वापर करण्याकडेही प्रयत्न सुरू झाले. जलयुक्त शिवार योजनेने आकार घेत योजना कार्यान्वीत करण्यात आली. सन २०१५-१६ वर्षापासून विविध विभागांच्या यंत्रणांनी मृद व जलसंधारणाचे, जलस्त्रोत बळकटीकरण, खोलीकरण, पाण्याचे योग्य वितरण व अपव्यय टाळण्यासाठी पाटांच्या दुरूस्त्या व सिमेंटीकरण, बांधबंधाºयांची दुरूस्ती, पाळ व गेटचे नुतनीकरण व मजबुतीकरण, भुजलसाठ्यात वाढ तसेच वृक्ष लागवड तसेच लोकसहभागातूनही अनेक तलाव बोड्यांचे पुनर्जिवन करण्यात आले. कृषी विभाग, पाटंबंधारे, वनविभाग, पंचायत समिती, जलसंधारण व सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने जिल्ह्यात विविध जलसंधारण व मृद संधारणाच्या कामांना गती देण्यात आली. उथळ व गाळाने बजबजलेल्या तसेच अतिक्रमण झालेले तलावांनी मोकळा श्वास घेतला. अतिक्रमण झालेले नाले व बंधाºयांचे खोलीकरण करण्यात आले.नाला व बंधाºयांचे खोलीकरण करण्यात आल्याने पाण्याचा साठा वाढीस लागला. तुटलेले बंधारे दुरूस्त करून बळकटीकरणाला गती देण्यात आली. जलसंधारण विभागाच्या वतीने सुद्धा जलयुक्त शिवार योजनेत कामे झाली. सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्ष लागवड व संगोपनात मोलाचे कार्य पार पडतील.करडी जि.प. क्षेत्रात मागील वर्षी जलयुक्त शिवार योजनेतून अनेक कामे करण्यात आली. यात साठविलेल्या पाण्याचा वापर करून रोवणी झालीत. धानाची शेती पिकविली. मात्र यावर्षी कमी पावसामुळे नाले, तलाव कोरडी असून बरीच रोवणी झालेली नाहीत. तर रोवणी झालेले पीक करपू लागले आहेत.-निलिमा इलमे, जि.प. सदस्या करडी.बेटाळा जि.प. क्षेत्रात पावसाअभावी हाहाकार आहे. शेती पडीत तर रोवणे झालेले धान वाचविण्यासाठी पाण्याची बोंबाबोंब आहे. जलयुक्त शिवार योजना कोरड्या पडल्याने परिसरावर भीषण दुष्काळाचे सावट उभे ठाकले आहे. .-सरिता चौरागडे, जि.प. सदस्या बेटाळा क्षेत्र.