शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
11
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
12
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
13
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
14
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
15
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
16
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
17
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
18
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
19
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
20
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं

वित्तीय कंपन्यांकडून महिलांची पिळवणूक

By admin | Updated: September 16, 2014 23:32 IST

ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांना कर्ज देण्यासाठी काही खासगी कंपन्यांचे काम सुरू आहे. याचे अधिकची रक्कमही वसुल करतात. कर्जाची परतफेड दर आठवड्याला करण्यात येते. यासाठी महिलेने

असहायतेचा फायदा : कारवाईची मागणीमोहाडी : ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांना कर्ज देण्यासाठी काही खासगी कंपन्यांचे काम सुरू आहे. याचे अधिकची रक्कमही वसुल करतात. कर्जाची परतफेड दर आठवड्याला करण्यात येते. यासाठी महिलेने उपस्थित राहावे, अशी सक्तीही करण्यात येते. तुमसर शहरात जवळपास पाच ते सहा अशा फायनांस कंपन्यांनी आपले दुकान थाटले आहेत. या फायनांस कंपन््यांचे एजेंट तुमसर आणि मोहाडी तालुक्यातील ग्रामीण भागातील अतिगरजु कुटूंब शोधून त्यांना कर्ज देतात. कर्ज देताना कुटूंबातील फक्त महिलांनाच कर्ज मंजूर करण्यात येतो. मात्र त्यात पतीच्या संमतीचीही अट असते. या फायनांस कंपन्या एका महिलेला कर्ज देत नाही त्यासाठी पाच पासून दहा महिलांचा एक गट तयार करूनच त्यांना एकमुश्त कर्ज देण्यात येतो. त्या गटातील प्रत्येक महिला एक दुसऱ्याची जामीनदार असते. या फायनांस कंपन्यांचा व्याजदर २४ ते २६ टक्के असतो. तसेच प्रोसेसिंग फी, विमा, सेवाकर इत्यादी प्रकारचे चार्जेस लावून अधिकचे पैसे उकळले जातात. दिलेल्या कर्जाची परतफेड कर्जानुसार २५० रूपया पाूसन ६५० रूपयापर्यंत दर आठवड्याला त्यांनी निश्चित केलेल्या दिवशी व ठिकाणी कर्ज घेणाऱ्या गटातील सर्व महिलांनी उपस्थित होऊन द्यावी लागते.समूहातील एखादे महिलेने कर्जाची रक्कम पाठविली मात्र उपस्थित झाली नाही तर वसुली एजंट इतर महिलांना धमकावतो व दंडसुद्धा वसूल करतो. एवढेच नाही तर पुढील आठवड्यात एखादा सण किंवा सुट्टी येत असली तर त्या आठवड्याची किस्त याच आठवड्यात भरण्याची शक्ती सुद्धा करण्यात येते. एकाच आठवड्यात दोन दोन किस्त भरताना या ग्रामीण महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या फायनांस कंपन्या सुलभ पद्धतीने कर्ज वाटप करीत असल्याने ग्रामीण जनता व्याजाचा दर न पाहता त्यांच्या आमिषाला बळी पडतात. मात्र कर्ज परतफेड केल्यावर कर्जाचे व्याजदर ३० ते ४० टक्के दराने द्यावे लागले हे नंतर समजते.घरातील समस्या सोडविण्यासाठी किंवा काही कामे करण्यासाठी ग्रामीण जनता सुलभ पद्धतीने मिळणाऱ्या या कर्जाकडे वळतात. तसेच या फायनांस कंपन्यांच्या व्याजाकडे पाहात नाही. नंतर तीन किंवा चार फायनांस कंपन्या कडूनही कर्ज काढली जातात. यामुळे ग्रामीण भागातील जनता व्याजाच्या व कर्जाच्या डोंगराखाली दबत चालली आहे. एकाचे कर्ज फेडण्यासाठी दुसऱ्या कंपनीकडून व दुसरीचे कर्ज फेडण्यासाठी तिसऱ्या फायनांस कंपनीकडून कर्ज काढण्याची पद्धत वाढत चालली आहे. मात्र यामुळे त्या महिला शेवटपर्यंत कर्जातच राहणार याचे त्यांना भान नाही. (शहर प्रतिनिधी)