शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

महिनाभरातच अग्निकांड विस्मृतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 05:00 IST

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ९ जानेवारीच्या पहाटे अग्नीकांड घडले. दहा निरागस जीवांचा बळी गेला. या घटनेने प्रत्येकाचे हृदय हेलावून गेले. अनेकांचे डोळे पाणावले. या घटनेतील दोघींना निश्चितच शिक्षा होईल, अशी सर्वांना आशा होती. परंतु आता घटनेला जवळपास महिना होत आला तरी अद्याप कोणतीच ठोस कारवाई झाली नाही. घटना घडल्यानंतर संपूर्ण सरकारच जणू भंडाऱ्यात दाखल झाले होते.

ठळक मुद्देन्यायवैद्यक अहवालाची प्रतीक्षा : राज्यपाल, मुख्यमंत्री आलेत पण कारवाई काय?

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अग्नीकांडात दहा निरागस चिमुकल्यांचा बळी गेला. राज्यपाल, मुख्यमंत्र्यांपासून डझनावर मंत्री भंडाऱ्यात आले. दोषींवर कारवाई होईल, अशी गर्जना करण्यात आली. देश हादरविणाऱ्या या घटनेला आता महिना पूर्ण होत आहे. महिनाभरात ही घटना विस्मृतीत गेली काय, असा प्रश्न आता निर्माण होत आहे. डॉक्टर आणि परिचारिकांचे निलंबन करून प्रशासनाने आपली जबाबदारी झटकली. अद्यापही न्यायवैद्यक अहवाल प्राप्त झाला नाही. जणू या घटनेचे गांभीर्य संपले काय, असा सवाल आता उपस्थित होत आहे.भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ९ जानेवारीच्या पहाटे अग्नीकांड घडले. दहा निरागस जीवांचा बळी गेला. या घटनेने प्रत्येकाचे हृदय हेलावून गेले. अनेकांचे डोळे पाणावले. या घटनेतील दोघींना निश्चितच शिक्षा होईल, अशी सर्वांना आशा होती. परंतु आता घटनेला जवळपास महिना होत आला तरी अद्याप कोणतीच ठोस कारवाई झाली नाही. घटना घडल्यानंतर संपूर्ण सरकारच जणू भंडाऱ्यात दाखल झाले होते. या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे सांगण्यात आले होते. एवढेच नाही तर उच्चस्तरीय चौकशी समितीही नियुक्त करण्यात आली. या समितीच्या अहवालावरून जिल्हा शल्यचिकीत्सकांसह डॉक्टर, परिचारीकांवर कारवाई करण्यात आली.मात्र या घटनेकडे कुणीच गांभीर्याने बघितले नाही, असे दिसून येते. विरोधी पक्षातील लोकांना काही मागण्या केल्या परंतु त्याचाही फारसा प्रभाव पडला, असे आता म्हणता येत नाही. ज्या कुटुंबातील दहा बालकांचा या अग्नीकांडात बळी गेला त्यांचे सांत्वन करण्यात आले. तातडीने आर्थिक मदतही करण्यात आली. मात्र या घटनेला असलेले मुळ कारण अद्यापही पुढे आले नाही. न्यायवैद्यक अहवालाची सर्वांना प्रतीक्षा आहे. या अहवालात काय येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या अहवालावरूनच पुढील कारवाईची दिशा ठरविली जाणार, असे सुरूवातीला बोलले जात होते. परंतु आता तो विषयही जणू विस्मृतीत गेल्याचे दिसून येते.कुणावर कारवाई झाल्याने गेलेले दहा जीव परत येणार नाही. परंतु भविष्यात अशा घटना होवू नये यासाठी दोषींना शिक्षा होणे गरजेचे असते. परंतु येथे निर्ढावलेली आरोग्य यंत्रणा कुणाच्यातरी दबावात वावरत असल्याचे दिसत आहे. भंडारा ठाण्यात केवळ या दहा बालकांच्या मृत्यूची आकस्मिक म्हणून नोंद करण्यात आली. दहा जीवांना न्याय देण्यासाठी कोणी तरी गांर्भीयाने या विषयावर रस्त्यावर उतरायला हवे, परंतु आता महिनाभरानंतर या घटनेतील गांभीर्य संपले की काय, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

जिल्हा रुग्णालय सुधरता सुधरेना जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या अग्नीकांडानंतर येथील आरोग्य यंत्रणा अलर्ट होईल, अशी अपेक्षा होती. सुरूवातीच्या आठ दहा दिवसात ही यंत्रणा सक्षमपणे काम करताना दिसतही होती. परंतु आता पुन्हा स्थिती जैसे थे झाली आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना येथे मनस्ताप सहन करावा लागतो. वेळेवर कुणीही भेट नाही. अनेकदा तर रुग्णांच्याच नातेवाईकांना स्टेचर ओढर रुग्णाला वॉर्डात न्यावे लागते. पट्टीबंधन कक्षातही अशीच अवस्था आहे. एका रुग्णाला तर स्वत:च ड्रेसिंग करण्याचा सल्ला देण्याची घटना दोन दिवसापुर्वी घडली.

 

टॅग्स :fireआग