शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

हदयविकाराच्या धक्क्याने पतीनंतर पत्नीचे निधन; दोन चिमुकले झाले पोरके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 17:10 IST

पतीला आलेल्या हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचे निधन झाल्यानंतर अवघ्या काही तासात पत्नीचेही हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याची घटना येथे मंगळवारी ( दि. २४) घडली.

संजय साठवणेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पतीला आलेल्या हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचे निधन झाल्यानंतर अवघ्या काही तासात पत्नीचेही हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याची घटना येथे मंगळवारी ( दि. २४) घडली. सात वर्षांपूर्वी अग्नीला साक्षी मानून हे दोघेजण विवाहबंधनात अडकले होते. त्यांच्या संसारवेलीवर दोन फुले उमलली. सुखाचा संसार सुरु असताना अचानक पतीला सोमवारी संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच मृत्यू झाला. पतीचा मृत्यू झाल्याचे कळताच पत्नीला दु:ख अनावर झाले आणि यातच तिचाही हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. त्यांचे दोन चिमुकले मात्र आईवडीलांच्या मायेला कायमचे पारखे झाले. साकोली तालुक्यातील वडद गावावर या घटनेने शोककळा पसरली आहे. दोघांच्याही चितेला लहानग्या मुलाने भडाग्नी दिला तेव्हा उपस्थितांना अश्रू अनावर झाले.घनश्याम केशव कापगते (३८) आणि देवांगणा घनश्याम कापगते अशी पतीपत्नीची नावे आहेत. अवघ्या सहा तासाच्या अंतरात पती पत्नीचा मृत्यू झाला. घनश्याम हा वडद ग्रामपंचायतीत परिचर म्हणून कार्यरत होता. सोमवारी आपले कार्यालयीन काम आटोपून तो सायंकाळी घरी आला. रात्री कुटूंबासह भोजन घेतले. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला. साकोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेतच मृत्यू झाला. घनश्यामचा मृतदेह पहाटे घरी आणताच पत्नी देवांगणाने एकच हंबरडा फोडला. दु:ख आवेगात तिलाही हृदयविकाराचा झटका आला. तात्काळ साकोलीच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने भंडारा येथे नेण्याचा सल्ला देण्यात आला. भंडारा येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच तिचाही मृत्यू झाला.हृदय सुन्न करणारी ही घटना मंगळवारी साकोली तालुक्यात घडली तेव्हा प्रत्येक जण हळहळताना दिसत होता. अंत्यसंस्कारासाठी दोघांचेही मृतदेह घरी आणण्यात आले. पतीच्या बाजूला पत्नीचा मृतदेह ठेवण्यात आला होता. दोन चिमुकल्यांना तर आपल्या आईबाबाला काय झाले हेही कळत नव्हते. अंत्यसंस्काराची तयारी झाली. परिसरातील शेकडो नागरिक अंत्ययात्रेत सहभागी झाले. पतीपत्नीची अंत्ययात्रा स्मशानभूमीत पोहचली. पाच वर्षीय आदित्यने आपल्या आईवडीलांच्या चितेला भडाग्नी दिला.आदित्य आणि जागृती झाले पोरकेघनश्याम आणि देवांगणा या दांपत्याला आदित्य (५) आणि जागृती (साडेतीन) ही दोन मुले आहेत. सुखाचा संसार सुरु असताना अचानक पतीपाठोपाठ पत्नीचाही मृत्यू झाला. आदित्य आणि जागृती कायमचे पोरके झाले. या चिमुकल्यांचा सांभाळ आता करायचा तरी कसा असा प्रश्न उपस्थितांपुढे निर्माण झाला. पतीपत्नीच्या मृत्यूने वडद गावावर स्मशानशांतता पसरल्याचे दिसत होते.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू