शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
2
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
3
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
4
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी
5
भारताच्या डावपेचामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; ८ हजार किमी सीमेवर युद्धाचं सावट, काय घडतंय?
6
IND vs AUS : सूर्याचं 'ग्रहण' सुटलं! हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री; MS धोनीचा विक्रमही मोडला
7
Fact Check: कंडोममुळं तुंबली गर्ल्स हॉस्टेलची पाईपलाईन? व्हायरल व्हिडीओमुळे नको ‘त्या’ चर्चा!
8
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
9
८ व्या वेतन आयोगाचा केव्हापासून मिळणार फायदा, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार? जाणून घ्या
10
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
11
VIDEO: बकरीसोबत रील बनवत होती एक मुलगी, अचानक बकरीने जे केलं... पाहून तुम्हालाही येईल हसू
12
'कांतारा'फेम ऋषभ शेट्टीने साकारला होता 'घाशीराम', गाजलेल्या मराठी नाटकाशी आहे 'हे' कनेक्शन
13
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
14
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
15
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
16
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
17
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
18
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
19
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
20
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 

शिक्षकांना 'टीईटी' परीक्षा का ठरतेय डोकेदुखी? सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या शिक्षकांसाठी अग्निपरीक्षा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 18:47 IST

Bhandara : सर्वोच्च न्यायालयाच्या १ सप्टेंबरच्या निर्णयानुसार इयत्ता पाहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गाना शिकवणाऱ्या शिक्षकांना टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा पास करणे बंधनकारक आहे. अन्यथा नोकरी सोडावी लागणार आहे.

भंडारा : सर्वोच्च न्यायालयाच्या १ सप्टेंबरच्या निर्णयानुसार इयत्ता पाहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गाना शिकवणाऱ्या शिक्षकांना टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा पास करणे बंधनकारक आहे. अन्यथा नोकरी सोडावी लागणार आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आता सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या शिक्षकांसाठी ही टीईटी एक अग्निपरीक्षा असून, शिक्षकांना सक्तीने सेवानिवृत्त करण्याचा घाट असल्याची शिक्षकांची प्रतिक्रिया आहे.

यात पाच वर्षे सेवा शिल्लक असलेल्या शिक्षकांना सूट मिळाली असून, पदोन्नतीसाठी टीईटी आवश्यक आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे मुलांना शिकवून त्यांच्या परीक्षा घेणाऱ्या वयाची पन्नाशी ओलांडलेल्या शिक्षकांनाही आता स्वतः अभ्यास करून परीक्षा पास करण्याचे आव्हान आहे. त्यामुळे शिक्षकांच्या मागे लागलेला परीक्षेचा ससेमिरा संपता संपेना, अशी शिक्षकांची दैनावस्था झाली आहे. या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी असून, शिक्षक संघटनांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टीईटी पदवीशिवाय कोणीही शिक्षक होऊ शकत नाही. मग आतापर्यंत शिक्षक बनण्यासाठी आवश्यक असलेल्या डी. एड., बी.एड., डी. एल. एड. किंवा इतर अनेक प्रशिक्षण अभ्यासक्रम पदव्यांचा उपयोग काय? असा सवाल उपस्थित झाला आहे. ही परीक्षा म्हणजे सक्तीची सेवानिवृत्ती अभियानाचा एक भाग आहे.

गुणवत्तापूर्ण शिक्षणाची जबाबदारी सांभाळून जनगणना, निवडणुका, नवसाक्षरता अभियान, शाळाबाह्य सर्वेक्षण, यु-डायस प्लस, शालेय पोषण आहार, आधार कार्ड, विविध समित्यांचे रेकॉर्ड, शिष्यवृत्ती परीक्षा इत्यादी १२०पेक्षा अधिक प्रकारच्या ऑनलाइन -ऑफलाइन रात्र - दिवस कामाच्या ओझ्याखाली दबलेल्या शिक्षकाची परीक्षा घेणे हास्यास्पद आहे.

"तीस वर्षापूर्वी दुय्यम सेवा मंडळाची परीक्ष पास करणारे बहुतेक आता शिक्षक पन्नास ते पंचावन्न वयोगटातील आहेत. भरमसाठ अशैक्षणिक कामे सांभाळून निष्ठेने ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. टीईटीच्या परीक्षेने अशा शिक्षकांच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करणे म्हणजे जुन्या अनुभवी शिक्षकांना घरी बसविणे होय."- मुबारक सय्यद, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, भंडारा

"शैक्षणिक, कौटुंबीक व सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळून २५ ते ३० वर्षे सेवा करणाऱ्या शिक्षकांची आता सेवानिवृत्तीच्या काळात परीक्षा घेणे योग्य नाही. यावर पुनर्विचाराची गरज आहे."- कैलास चव्हाण, आदर्श शिक्षक पुरस्कार

"२५ ते ३० वर्षे सेवा करून सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या शिक्षकांना परीक्षा देण्यास भाग पाडणे म्हणजे शिक्षकांची थट्टाच होय. त्यामुळे परीक्षेची सक्ती नकोच."- राजेश धुर्वे, जिल्हा कार्यवाह विमाशि

टॅग्स :bhandara-acभंडाराEducationशिक्षणTeacherशिक्षकTeachers Recruitmentशिक्षकभरती